Headlines

Admin

गारे पालमा खाणीतून पहिला कोळसा रॅक नागपुरात दाखल:राज्याच्या ऊर्जा सुरक्षिततेला मिळणार गती, मुख्यमंत्री उपस्थित

राज्याच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या छत्तीसगडमधील गारे पालमा कोळसा खाण प्रकल्पाला गती मिळाली आहे. या खाणीतून कोळशाचा पहिला रेल्वे रॅक नागपूर येथील कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात दाखल झाला आहे. यामुळे भविष्यातील वीज निर्मितीला स्थैर्य मिळणार असून, राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी रेल्वे रॅकला हिरवी झेंडी दाखवून प्रकल्पाची…

Read More

गोंदियात कठडा नसलेल्या विहिरीत पडून वाघाचा मृत्यू:शिकारीच्या किंवा पाण्याच्या शोधात आल्याची शक्यता, तपास सुरू

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा वनपरिक्षेत्रातील माल्ही बीट अंतर्गत कोडेलोहारा परिसरात एका शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पडून एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार सकाळी १० वाजता उघडकीस आली. मृत वाघ सुमारे ४ ते ५ वर्षांचा होता. ग्रामस्थांना विहिरीत वाघाचा मृतदेह तरंगताना दिसताच त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, हा वाघ शिकारीच्या किंवा पाण्याच्या शोधात फिरत…

Read More

साताऱ्यात भटक्या कुत्र्याची दहशत!:जकातवाडीत एकाच दिवशी 11 जणांवर हल्ला; दोन चिमुरड्यांसह अनेकजण गंभीर जखमी

सातारा तालुक्यातील जकातवाडी परिसरात रविवारी भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामुळे एकाच दिवशी ११ जण जखमी झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. जखमींमध्ये दोन लहान मुलींचा समावेश असून काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. दुपारच्या सुमारास जकातवाडी ते साठेनगर या परिसरात हा प्रकार घडला. संबंधित कुत्रा आक्रमक बनून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर अचानक झडप घालत होता. त्यामुळे काही वेळ…

Read More

इंदूरमध्ये गेले आशा भोसले यांचे बालपण:सराफाचे गुलाबजामुन आणि रबडीची विशेष आवड; सिहोरच्या शरबती गव्हाच्या पोळ्या पसंत

भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले यांचे 92 व्या वर्षी निधन झाले. रविवारी दुपारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी संध्याकाळी त्यांना येथे दाखल करण्यात आले होते. मध्य प्रदेशशी त्यांचे सखोल आणि भावनिक नाते होते. त्यांचे बालपण इंदूरच्या छावणी परिसरातील मुराई मोहल्ल्यात गेले, ज्याच्या आठवणी त्या अनेकदा शेअर करत असत. इंदूरची…

Read More

आशाताईंच्या निधनाने सचिन तेंडुलकरही गहिवरला:म्हणाला – आमच्यासाठी त्या कुटुंबाचाच भाग होत्या, तुमची खूप आठवण येईल

भारतीय संगीताचा सुवर्णकाळ आपल्या आवाजाने अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. या दुःखद प्रसंगी क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अत्यंत भावूक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सचिन आणि आशाताईंमधील नाते हे केवळ कलाकार आणि चाहता असे नव्हते, तर ते एका आई आणि मुलासारखे घट्ट होते. आशाताईंच्या…

Read More

Women Reservation Change Misleading Nation; Govt Wants Caste Census Buried

Marathi News National Jairam Ramesh: Women Reservation Change Misleading Nation; Govt Wants Caste Census Buried नवी दिल्ली2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी रविवारी सांगितले की, केंद्र सरकारला जात जनगणना बासनात गुंडाळायची आहे. तसेच, महिला आरक्षण कायद्यात बदल करून देशाची दिशाभूल करत आहे. जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की,…

Read More

गुन्हे कसे मागे घेत नाहीत, मी बघतोच:मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा; उपसमितीच्या कारभारावरून विखे पाटलांवरही हल्लाबोल

मराठा आरक्षणाच्या लढ्यातील नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. “सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. तर राज्यामध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन उभे करू आणि सरकारला गुन्हे मागे घेण्यास भाग पाडू. गुन्हे कसे मागे घेत नाहीत, मी बघतोच.” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी…

Read More

अयोध्येत कारसेवकांवर गोळी कोणी चालवली?:माजी आयएएस म्हणाले- 90 टक्के निर्णय राजकीय असतात; अखिलेश यांनाही दिले उत्तर

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे मुख्य सचिव राहिलेले नृपेंद्र मिश्रा यांनी अयोध्येतील वादग्रस्त ढाचा पाडण्याशी संबंधित घटनांवर भाष्य केले. त्यांनी कारसेवकांवर गोळीबार केल्याच्या आरोपांवरही आपले मौन सोडले. माजी आयएएस नृपेंद्र मिश्रा यांनी शनिवारी अयोध्येत सांगितले की, अशा प्रकारचे निर्णय मुख्य सचिवांच्या स्तरावर घेतले जात नाहीत. असे जवळपास 90…

Read More

राहुरीत 'राजकीय बॉम्ब'!:मी भाजपमध्ये गेलोच नाही, अजूनही मविआतच; प्राजक्त तनपुरेंच्या विधानाने महायुतीच्या गोटात धाकधूक

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे रणमैदान तापलेले असतानाच, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी टाकलेल्या एका ‘राजकीय बॉम्ब’मुळे महायुती आणि भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. “मी अजून महाविकास आघाडी सोडलेली नाही आणि भाजपमध्येही प्रवेश केलेला नाही,” असे स्पष्ट करत तनपुरे यांनी भाजपच्या अस्वस्थतेत भर घातली आहे. त्यांच्या या विधानाचा थेट परिणाम भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या मतदानावर…

Read More

प्रियंका चोप्राने गोल्डन टेंपलमध्ये दर्शन घेतले:लंगर हॉलमध्ये खरकटी भांडी घासली, अमृतसरमध्ये शूटिंग करत होती; 12 दिवसांत दुसऱ्यांदा आली

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा अमृतसरमधील गोल्डन टेंपलमध्ये पोहोचली. येथे तिने दरबार साहिबमध्ये डोके टेकवले. त्यानंतर ती लंगर हॉलमध्ये गेली, जिथे तिने सुमारे दीड तास भांडी धुण्याची सेवा केली. तसेच लंगरच्या इतर कामांमध्येही तिने सहकार्य केले. प्रियंका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून अमृतसरमध्ये तिच्या आगामी ‘अमरी’ चित्रपटाचे शूटिंग करत होती. काल रात्री तिचे शूटिंग पूर्ण झाले आणि…

Read More