नसरापुरातील घटनेनंतर नागरिकांचा रास्ता रोको:मुंबई-सातारा हायवे 'ठप्प'; मुख्यमंत्री येईपर्यंत महामार्ग न उघडण्याचा आंदोलकांचा पवित्रा
भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर ६५ वर्षांच्या नराधमाने केलेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपीला तात्काळ मृत्युदंडाची शिक्षा मिळावी यासाठी नसरापूरमधील हजारो ग्रामस्थांनी पुणे-सातारा (मुंबई-बंगळुरू) महामार्गावर वडगाव पुलावर प्रचंड ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दोन तासांपासून महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प…