कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयात रंगला सत्कार सोहळा:विद्यार्थ्यांनी स्वतःला पैलू पाडत सिद्ध करणे हीच खरी गुणवत्ता- सागर जाधव
यश मिळवणे म्हणजे केवळ गुण मिळवणे नव्हे, तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाला ओझे न समजता सातत्य ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडून स्वतःला सिद्ध करणे, हीच खरी गुणवत्ता आहे, असे प्रतिपादन जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सागर जाधव यांनी केले. येथील कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (इयत्ता १० वी) आपल्या उज्ज्वल यशाची…