Headlines

वेरूळचा विकास म्हणजे स्वच्छता व पुनर्वसन:जिल्हाधिकारी विनय गौडा यांची ग्वाही; पिंपरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट

जगप्रसिद्ध वेरूळ येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी विकास म्हणजे केवळ मोठमोठ्या इमारती व लक्झरी घरे नव्हे, तर स्वच्छ परिसर, शुद्ध वातावरण आणि मन प्रसन्न करणारे शहर म्हणजे खरा विकास होय, अशी स्पष्ट भूमिका जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज वेरूळ येथे मांडली. नियोजित दौऱ्यानुसार जिल्हाधिकारी गौडा यांनी वेरूळला भेट देऊन स्थानिक दुकानदारांसोबत बैठक घेतली….

Read More

अर्भक मृत्यू प्रकरणात निष्काळजीपणा भोवला:एक वैद्यकिय अधिकारी निलंबीत, एकाची वेतनवाढ थांबवली; सीईओंचे आदेश

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेस रुग्णवाहिका उपलब्ध न करून दिल्याने अर्भकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात निष्काळजीपणाच्या कारणावरून एक वैद्यकिय अधिकारी निलंबीत करण्यात आला असून एकाची वेतनवाढ थांबविण्यात आली तर चालकास कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील एक गरोदर…

Read More

'ऑपरेशन ब्लू स्टार'वरून गिरीश महाजन वादाच्या भोवऱ्यात:केंद्रीय नेतृत्वाची व संघाची नाराजी, तर देवेंद्र फडणवीसांकडून बचाव!

पंजाबमध्ये ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात सहभागी होत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी या कारवाईचा ‘काळा दिवस’ असा उल्लेख केल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाजनांची ही भूमिका निव्वळ वैयक्तिक असून ती पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट करत, कदाचित त्यांना या विषयाची पूर्ण माहिती नसल्याने त्यांच्याकडून असे विधान झाले असावे,…

Read More

तोतया पोलिसाने शेतकाऱ्याला लुटले:56 हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास, गुन्हा दाखल; हिंगोलीतील घटना

हिंगोली ते सेनगाव रोडवर सवड शिवारात एका तोतया पोलिसाने शेतकऱ्याची फसवणूक करून त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध बुधवारी ता १० गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हिंगोली तालुक्यातील हनवतखेडा येथील रहिवासी असलेले शेतकरी गोविंद लक्ष्मण मूटकुळे मंगळवारी ९ कामा निमित्त हिंगोली येथे…

Read More

तुम्ही मोठी माणसं आहात, मी साधा माणूस..:उसाच्या पंचनाम्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याची कृषिमंत्री भरणेंकडून थट्टा? VIDEO

नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील बळीराजाची लोकप्रतिनिधींकडून कशी थट्टा केली जाते, याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खडकवासला परिसरातील जळालेल्या उसाच्या पिकाचे पंचनामे करून तातडीने मदत मिळावी, या आशेने कृषिमंत्र्यांच्या दारात पोहोचलेल्या एका हताश शेतकऱ्याची राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी थट्टा केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल…

Read More

जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये ग्रेनेडचा स्फोट:महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण, राज्यभरातून हळहळ व्यक्त

जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ ग्रेनेड स्फोट झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण आल्याची माहिती आहे. नवी मुंबई आणि साताऱ्यातील दोन्ही जवानांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरच्या कमलकोट भागात मंगळवारी सायंकाळी अचानक ग्रेनेडचा स्फोट झाला. या दुर्घटनेत भारतीय लष्करातील दोन जवान गंभीर जखमी झाले….

Read More

मनोज जरांगेंचा फडणवीस-विखेंना थेट इशारा:आम्ही वारंवार आंदोलन करायचं आणि सरकारने हलक्यात घ्यायचं?; मराठा-ओबीसी दरी वाढवण्याचा प्रयत्न का केला जातोय?

मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारकडून वारंवार आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात निर्णय घेतले जात नाहीत, असा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना थेट इशारा दिला आहे. “आम्ही वारंवार आंदोलन करायचं आणि…

Read More

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला भरभरून दिले:कागदावर दिसणारे प्रकल्प प्रत्यक्षात पाहायला मिळाले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो की, आज त्यांनी देशाचे सर्वाधिक काळ कार्य करणारे निर्वाचित पंतप्रधान म्हणून ४ हजार ३९९ दिवस पूर्ण करत नवीन किर्तीमान स्थापित केला आहे. ४३९९ दिवस हा केवळ काळ नाहीये. हा भारताच्या प्रगतीचा आलेख ज्या काळात लिहिला गेला, असा सुवर्ण काळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान मोदींचा…

Read More

माझी बदनामी करण्यासाठी कट रचला गेला:अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा संताप, कायदेशीर कारवाईचा इशारा

अशोक खरात प्रकरणावरून आपल्यावर आणि कुटुंबावर करण्यात आलेले आरोप अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगत माजी मंत्री रुपाली चाकणकर यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. “संपूर्ण वस्त्रातील स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न काही विकृत लोकांनी केला,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त करत बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच अनेकांना कायदेशीर नोटिसाही पाठवल्याचे त्यांनी स्पष्ट…

Read More

उबाठा संपवण्याची स्क्रिप्ट तयार:राऊत राहुल गांधींची सुपारी घेऊन उबाठा-पवार गट संपवण्याच्या मोहिमेवर- नवनाथ बन

उद्धव ठाकरेंना नेतृत्व करता येत नाही आणि आदित्य ठाकरे घरात बसून आहेत उबाठाचे अस्तित्व टिकून ठेवायचे असेल तर आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला पाहिजे, अशी भूमिका संजय राऊत घेतील. उबाठाचे लोकसभेचे 9 आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे 10 खासदार वेगवेगळ्या पक्षात जाणार आहेत. काही जण संजय राऊत यांच्यासोबत काँग्रेसमध्ये जातील तर काही जण शिंदेंचे…

Read More