Headlines

सोलापूर विधान परिषदेत हायव्होल्टेज ड्रामा!:कॉंग्रेस उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप; प्रणिती शिंदे म्हणाल्या- आदित्य फत्तेपूरकरवर दबाव आणला गेला

सोलापूर विधानपरिषदेत कॉंग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आल्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर तसेच आमदारांसमोर जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली आहे. बहुमत असून सुद्धा हे सरकार आम्हाला घाबरत असल्याची टीका कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर सकडून टीका केली आहे. त्या…

Read More

अंतरवालीतील आश्वासनाची पूर्तता, मृत आंदोलकांच्या वारसांना नोकरीचा मार्ग मोकळा:विखे पाटलांची माहिती; आणखी सकारात्मक निर्णयांची ग्वाही

मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना औद्यगिक विकास महामंडळा मध्ये नोकरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने घेतला आहे.अंतरवाली सराटी येथील आंदोलना दरम्यान दिलेल्या आश्वासनाची कार्यवाही या निर्णयातून झाली असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षण आणि वेगवेगळ्या मागण्यासाठी मनोज जरांगे…

Read More

अब्दुल सत्तार-अंबादास दानवे आमनेसामने; गळाभेटीनंतर विलीनीकरणाच्या चर्चांना नवे बळ:समृद्धीवर योगायोग की संकेत?

शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना सोमवारी आणखी खतपाणी मिळाल्याचे चित्र दिसून आले. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांची समृद्धी महामार्गावर अचानक भेट झाली. विशेष म्हणजे, अवघ्या एक दिवसापूर्वी दोन्ही नेत्यांनी शिवसेनेचे दोन गट भविष्यात एकत्र यावेत, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे त्यांच्या या भेटीकडे राजकीय…

Read More

भंडाऱ्यात कोणती ग्रामपंचायत मारणार बाजी?:वाशिमच्या चमूकडून जिल्ह्यात पंचायत राज अभियानाचे मूल्यांकन

17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे मूल्यांकन भंडारा जिल्ह्यात सुरू झाले असून अभियानाच्या मूल्यांकनासाठी वाशिम जिल्ह्याची चमू 1 जुन रोजी दाखल झाली आहे. या अभियानात भंडारा जिल्ह्यातील सात तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीची तपासणी केली जाणार आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागा मार्फत हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे…

Read More

इतिहासातील चुका टाळायला हव्यात:ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे प्रतिपादन, ब्राह्मण सांस्कृतिक संघ आणि 'हर घर सावरकर' संस्थेतर्फे व्याखानाचे आयोजन

ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी भारतीय समाजाने इतिहासातून बोध घेऊन भूतकाळातील चुका टाळाव्यात, असे प्रतिपादन केले. ब्राह्मण सांस्कृतिक संघ आणि ‘हर घर सावरकर’ संस्थेतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. तत्कालीन समाज स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांच्या बाजूने ठामपणे उभा न राहणे ही एक मोठी चूक होती, असेही त्यांनी नमूद केले. राम मंदिराच्या उभारणीमध्ये शहीद…

Read More

पुण्यात मानवतच्या तरुणाची आत्महत्या:लिव्ह-इन पार्टनरसह चौघांना अटक, गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकी देत पैशांसाठी सुरू होता त्रास

पुण्यात एका तरुणाने गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी त्याच्या लिव्ह-इन पार्टनरसह चौघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना खराडी भागात घडली असून, आरोपींनी पैशांसाठी तरुणाला त्रास दिला होता. करण बाळासाहेब कांबळे (वय २८, मूळ रा. खरबा, मानवत, जि. परभणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी प्रीती अनिकेत बोढर्डे उर्फ…

Read More

गडकरींचे टाटांना पत्र:नागपूर-मुंबई विमानसेवा पूर्ववत करण्याची मागणी, एअर इंडियाने फेऱ्या रद्द केल्याने औद्योगिक विकासावर परिणाम

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना पत्र लिहून नागपूर-मुंबई विमानसेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. एअर इंडियाने नागपूरहून मुंबईसाठीच्या विमानांची संख्या कमी केल्याने आणि काही फेऱ्या रद्द केल्याने विदर्भाच्या औद्योगिक विकासाला बाधा येत असल्याचे गडकरींनी पत्रात म्हटले आहे. नागपूर येथील ‘असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट’ या…

Read More

मोबाईलच्या दुनियेत हरवताना मनमोहन श्रीकृष्णाला विसरू नका:रेवतीनंदन दास यांचे आवाहन, शुद्ध बुद्धी भगवंताच्या चरणी समर्पित करा‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर आजचा माणूस मोबाईलच्या आभासी दुनियेत इतका हरवून गेला आहे की, तो मनमोहन श्यामसुंदरला विसरला आहे. आपली बुद्धी शुद्ध आणि पवित्र आहे, ती या जन्मातच श्रीकृष्ण चरणी समर्पित करा. वसुदेव-देवकीसारखे मन आणि बुद्धी देवाच्या चरणी लावली, की जीवनातील सर्व अंधःकार दूर होईल, असे आवाहन ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यांनी केले. येथील नवीन…

Read More

अहिल्यादेवींचे कार्य जगभरात गौरवास्पद – प्रांजल चिंतामणी:जामखेड नगर परिषदेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

प्रतिनिधी | जामखेड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा जामखेड तालुक्याला लाभला आहे. अशा महान भूमीत सामाजिक व राजकीय कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्यातून मिळते, हे आपले भाग्य आहे. अहिल्यादेवींचे कार्य केवळ एका राज्यापुरते मर्यादित नसून ते जगभरात गौरवाने ओळखले जाते. त्यांनी पाणवठे, पाणीसाठे, धर्मशाळा, उद्योग-व्यापार आणि अन्नछत्रांच्या माध्यमातून समाजकल्याणाचा आदर्श घालून दिला. त्यांच्याच प्रेरणेने जामखेड…

Read More

शिवसेना पुन्हा एकत्र येणार का?:अब्दुल सत्तारांच्या विधानानंतर रंगलेल्या चर्चांवर एकनाथ शिंदेंची भूमिका; संजय राऊतांचाही टोला

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान आता शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबतही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केल्यानंतर या चर्चांना आणखी वेग मिळाला. त्यानंतर दोन्ही शिवसेना गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता व्यक्त…

Read More