Headlines

आरोग्य विभागाचा 'रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन' प्रकल्प:'गोल्डन अवर'मध्ये मिळणार जीवदान, 5 ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात

राज्यात ग्रामीण भागातील स्ट्रोक रुग्णांना “गोल्डन अवर” मध्ये तातडीने आणि अत्याधुनिक उपचार देण्यासाठी “रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” हा दूरस्थ पद्धतीने रोबोटिक उपचार सुविधा देणे बाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आरोग्य खात्याने दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत स्ट्रोक (पक्षाघात) रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अशा रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टर व आधुनिक…

Read More

Maharashtra Land Breach Regularization Powers Shift to Collectors; Sand Policy Revamped

सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारे दोन ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. जमिनीच्या शर्तभंग नियमितीकरणाचे मंत्रालयातील अधिकार आता स्थानिक पातळीवर सोपवण्यात आले असून, राज्याच्या रेती व वाळू धोरणातही गरिबांच्या फायद्यासाठी महत . अनेकदा शेती किंवा घराशी संबंधित शर्तभंगाच्या (Breach of Conditions) अतिशय जुजबी प्रकरणांसाठी नागरिकांना मुंबईत मंत्रालयाचे फेरे मारावे लागायचे. यामध्ये सर्वसामान्यांचा वेळ…

Read More

आंदोलनाच्या इशाऱ्यापूर्वी मनोज जरांगेंची कुणीतरी भेट घेतली:भाजप नेते प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट; पाटलांना भेटणारा व्यक्ती कोण?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ३० मे पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली असली, तरी या घोषणेमागे मोठा राजकीय पूर्वग्रह आणि पडद्यामागच्या हालचाली असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते प्रसाद लाड यांनी केला आहे. “जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा देण्यापूर्वी त्यांची कुणीतरी गुप्त भेट घेतली होती आणि त्यानंतरच हे उपोषण जाहीर झाले,”…

Read More

पुण्यात खडकी बाजारात दोघांवर गोळीबार:पूर्ववैमनस्यातून घटना; दोघांना अटक, पिस्तूल उगारून दहशत

पुण्यातील खडकी बाजार परिसरात पूर्ववैमनस्यातून दोघांवर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात दहशत माजली होती. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी सुदर्शन अडसूळ (वय २५, रा. गवळवाडा, खडकी बाजार) आणि त्याचा साथीदार रचिन्मय (वय २५) यांना अटक करण्यात आली आहे. आकाश संजय वाघमारे (वय २४, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

Read More

NEET पेपरफुटीचे धक्कादायक नेक्सस:लातूरचा पी.व्ही.सूत्रधार, आधी टेलिग्राम-व्हॉट्सअपवरून टेस्टचे आमिष, नंतर 10 लाखांना विकले पेपर

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात आता रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला हा प्रकार केवळ लातूरपुरता मर्यादित असल्याचे मानले जात होते, मात्र तपास पुढे जाताच नांदेड, पुणे, नाशिक, वाशीम, जयपूर, गुरुग्रामसह अनेक शहरांमध्ये या रॅकेटची पाळेमुळे पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार…

Read More

देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न:आजच्या राजकारणात अर्थकारणाशिवाय काही चालत नाही- गणेश नाईक

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागले आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला असतानाच, दुसरीकडे महायुतीचे नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी फडणवीसांची जोरदार पाठराखण केली आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्वसमावेशक भूमिकेचे असतानाही केवळ ते ‘ब्राह्मण’ असल्यामुळेच त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात…

Read More

राष्ट्रवादीत सुप्त संघर्ष सुरू झालाय का?:सुनेत्रा पवारांसाठी नाजूक काळ; तटकरे -पटेल नाराज झालेत का? पवारांनी डाव टाकलाय का?

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हालचाली पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कार्यकारिणीतून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना डावलल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंत्री अनिल पाटील यांनी हे वृत्त फेटाळले असले, तरी त्यानंतर घडलेल्या राजकीय भेटीगाठी व सूचक विधानांमुळे या…

Read More

राज्यात तासाला एका महिलेवर अत्याचार:महिला अपहरणात महाराष्ट्र देशात पहिला! पक्ष एकत्रीकरणाचा विषय आम्ही बाजूला ठेवलाय- रोहित पवार

उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्र महिलांसाठी सर्वात असुरक्षित राज्य बनत चालले असून, राज्यात तासाला एका महिलेवर अत्याचार होत आहे, महिला अपहरणात महाराष्ट्र देशात पहिला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. ‘शक्ती कायद्या’ची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करत त्यांनी 31,141 गायब झालेल्या मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. रोहित पवार…

Read More

'एल निनो'च्या धोक्यामुळे हिंगोली प्रशासन सतर्क:जलसंधारणाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका- जिल्हाधिकारी

हिंगोली जिल्ह्यात एल निनोच्या पार्श्वभुमीवर जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे सुरु करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. या शिवाय आगामी काळात टंचाई भासणाऱ्या गावांमधून टँकर सुरू करण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या आहेत. हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एल-निनो प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More

माझा 42 वर्षांचा राजकीय अनुभव:मला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा मी नक्की बोलेन; सुनील तटकरेंचे सूचक विधान, वादावर मोठे संकेत

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेतृत्वाची धुरा सुनेत्रा पवार यांनी आपल्या हातात घेतली आहे. मात्र, पक्षात सर्वकाही सुरळीत नसल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. नव्या संघटनात्मक बदलांनंतर पक्षात अंतर्गत नाराजी वाढत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर अनेक वरिष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण…

Read More