Headlines

भारत-व्हिएतनाम बिझनेस फोरममध्ये महाराष्ट्राचा पुढाकार:छत्रपती संभाजीनगर ते हो चि मिन्ह सिटी विमानसेवेचा प्रस्ताव, CM फडणवीसांची माहिती

भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज आहे. व्हिएतनाम सोबत सांस्कृतिक, आर्थिक आणि परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्या एक दिवसीय मुंबई भेटीदरम्यान आयोजित इंडिया-व्हिएतनाम बिझनेस फोरमला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले….

Read More

तोंडाच्या शस्त्रक्रियांचा 'जनआरोग्य' योजनेत समावेश:ग्रामीण भागात सेवा देण्याचे हसन मुश्रीफ यांचे आवाहन

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि जनजागृती मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत तोंडाच्या शस्त्रक्रियेशी संबंधित दंत उपचारांचा समावेश करण्यात आला आहे, हे सुलभ मौखिक आरोग्यसेवेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे ते म्हणाले. तोंडाचा कर्करोग, दातांमधील कीड आणि हिरड्यांचे आजार यांसारख्या समस्यांवर लक्ष केंद्रित…

Read More

सायबर चोरट्यांकडून चार जणांची 22 लाखांची फसवणूक:पुण्यात विविध पोलीस ठाण्यांत आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल

पुण्यात सायबर चोरट्यांनी चार वेगवेगळ्या घटनांमध्ये २२ लाख १५ हजार ६४३ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (IT Act) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत, सहकारनगर येथील २७ वर्षीय अजय अंकुश रसाळ यांची टास्क पूर्ण करण्याच्या आमिषाने ७ लाख २ हजार रुपयांची फसवणूक झाली. सायबर…

Read More

मोठी बातमी:बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; 73 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात मोठी कारवाई

बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि मावेजा घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करत पोलिसांनी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक केली आहे. लातूरमधून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी दिली. या अटकेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या भूसंपादन घोटाळ्याला आता नवे वळण मिळाले आहे. अविनाश पाठक यांना…

Read More

छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांवरून संताप:अंबादास दानवेंनी सरकारला धारेवर धरलं; नितीन गडकरींना थेट पत्र

छत्रपती संभाजीनगर ते नाशिक महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. विशेषतः वैजापूरजवळील चार ते पाच किलोमीटरचा पट्टा अत्यंत धोकादायक बनला असल्याचे…

Read More

पुण्यात सराफ व्यावसायिकाला दीड कोटींचा चुना:20 वर्षांच्या ओळखीचा गैरफायदा घेत 1 किलो सोन्याचा अपहार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे शहरातील एका सराफ व्यावसायिकाकडून दीड कोटी रुपयांचे शुद्ध सोने घेऊन अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सराफ व्यावसायिकाने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश उमेश संचेती, मंगला उमेश संचेती आणि उमेश तिलोकचंद संचेती (तिघे रा. आदर्शनगर, पुणे-सातारा रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

नागपूर हादरले:इन्स्टाग्रामवरील 'प्रेम त्रिकोण' ठरला जीवघेणा, कळमना परिसरात 17 वर्षीय मुलाची क्रूर हत्या

सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतील आकर्षण जेव्हा टोकाच्या द्वेषात बदलते, तेव्हा त्याचे परिणाम किती भयावह असू शकतात, याचा धक्कादायक अनुभव नागपूरच्या कळमना परिसरात आला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या प्रेमातून निर्माण झालेल्या वादाने अवघ्या 17 वर्षांच्या जोहरान मुस्तफा शेख या तरुणाचा बळी घेतला आहे. मैत्रीच्या नावाखाली ‘डेथ कॉल’ घटनेची सुरुवात झाली ती सोशल मीडियावरील मैत्रीतून. जोहरान आणि…

Read More

मंत्र्यांच्या ओएसडीवर पत्नीचा गंभीर आरोप, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल:अतुल सावेंनी स्पष्ट केली भूमिका; चौकशीचे आदेश

पुण्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारे प्रकरण समोर आले आहे. भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी असलेले विजय धुलचंद कारंडे यांच्याविरोधात पत्नीने गंभीर आरोप करत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पत्नीला मारहाण करून तिचा गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कारंडे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात…

Read More

नाशिक रिंगरोडवरून नवा वाद:महिलांवर दडपशाही? संजय राऊतांचा संताप; शेतकरी महिलांच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांना सुनावलं

नाशिक शहरातील प्रस्तावित 66 किलोमीटरच्या रिंगरोड प्रकल्पावरून आता मोठा राजकीय संघर्ष उभा राहिला आहे. रिंगरोडसाठी सुरू असलेल्या भूसंपादन आणि मोजणी प्रक्रियेदरम्यान मातोरी आणि मुंगसरे परिसरातील शेतकरी महिलांवर पोलिसांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, शिवसेना ठाकरे गटानेही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. महिलांनी खासदार संजय…

Read More

मुंबईच्या रस्त्यांचे 7 हजार कोटी गेले कुठे?:हिंदी परीक्षेची स्थगिती पुरेशी नाही, ती कायमची रद्द करा, आझमी प्रसिद्धीसाठी हापापलेला मूर्ख माणूस- संदीप देशपांडे

मुंबईमध्ये स्त्यांसाठी यापूर्वी 7 ते 8 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले ते कुठे गेले? ते सुशोभीकरणासाठी लायटिंग लावण्यात आले ते कुठे गेले? असा सवाल मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केला आहे. मुंबईमध्ये महापौर, उपमहापौर नाल्याचे पाहणी दौरे करत आहेत पण त्यातून नाले तुंबणार नाही याची शाश्वती ते देणार का? केवळ बातम्यासाठी महापौर-उपमहापौरांचे दौरे…

Read More