रासायनिक खतांच्या महागाईने शेतकरी पोळला:शेणखताच्या किंमतीमध्ये वाढ, खतांच्या किमतीत 500 रुपयांची वाढ, बळीराजा पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळला
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता मोहोळच्या शिवारापर्यंत उमटू लागले आहेत. इंधन दरवाढीपाठोपाठ रासायनिक खतांचा तुटवडा आणि गगनला भिडलेल्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या महागाईने जगाच्या पोशिंद्याला जेर . जागतिक युद्धाच्या सावटाने कच्च्या मालाचा पुरवठा खंडित झाला आहे. युरिया, १०:२६ आणि १८:४६ सारख्या प्रमुख खतांच्या किमतीत पोत्यामागे ४०० ते ५००…