Headlines

ईव्हीएमची 'अग्निपरीक्षा':इतिहासात पहिल्यांदाच 17 तारखेला मतदान यंत्राची होणार 'डायग्नोस्टिक टेस्ट'; नेमके काय होणार? वाचा

निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम (EVM) यंत्रांची १६ आणि १७ एप्रिल रोजी ‘डायग्नोस्टिक टेस्ट’ केली जाणार आहे. माजी मंत्री नसीम खान यांनी निवडणूक निकालाला कायदेशीर आव्हान दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, देशाच्या निवडणूक इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच तांत्रिक तपासणी…

Read More

सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी बोलावले तर जाण्याचे सुप्रिया सुळेंचे संकेत:म्हणाल्या- रिश्ते मायने रखते है, संपूर्ण कुटुंब वहिनींच्या पाठीशी

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. रिश्ते मायने रखते है, असे म्हणत त्यांनी कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले. पैसा आणि सत्ता यापेक्षा नातेसंबंध अधिक महत्त्वाचे असतात, असे सांगताना त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराबाबतही सूचक भूमिका मांडली आहे. त्यामुळे बारामतीतील राजकारणात वेगळाच रंग भरला आहे. सुनेत्रा पवार यांच्या…

Read More

देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली:संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा; ऑपरेशन टायगरवर पलटवार

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची चिन्हे दिसत आहेत. ऑपरेशन टायगर या नावाने सुरू असलेल्या चर्चांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हालचालींमुळे राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, शिवसेना ठाकरे गटाने मात्र या दाव्यांना जोरदार विरोध दर्शवला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

Read More

संख्या पडताळणी अभियान:अमरावती जिल्ह्यात 4.83 लाख विद्यार्थी, बोगस संख्या लवकरच कळणार, तीन टप्प्यात पटपडताळणी

अमरावती जिल्ह्यात विद्यार्थ्यांची खरी संख्या पडताळण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष अभियान सुरू केले आहे. शनिवार, ११ एप्रिल रोजी या पटपडताळणीचा पहिला टप्पा सुरू होत असून, यामुळे शाळेच्या पटावरील खोट्या विद्यार्थी संख्येचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. ही पटपडताळणी तीन टप्प्यांत केली जाईल. ११ एप्रिलनंतर उर्वरित शाळांची पडताळणी १५ आणि २२ एप्रिल रोजी होणार आहे. जिल्ह्यात मराठी, हिंदी,…

Read More

समाज कल्याण विभागाच्या समता सप्ताहाला प्रारंभ:14 एप्रिलपर्यंत जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाने ‘समता सप्ताह’ सुरू केला आहे. हा सप्ताह १४ एप्रिलपर्यंत चालणार असून, या अंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहादरम्यान भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, वक्तृत्व, निबंध स्पर्धा, पथनाट्ये, कार्यशाळा, मेळावे आणि व्याख्यानांचा समावेश आहे. शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे तसेच सामाजिक समता, न्याय आणि बंधुता…

Read More

महाराष्ट्रातील भाविकांच्या बसला यूपीमध्ये अपघात:कारला वाचवताना प्रयत्नात बस रेलिंगला धडकली, 2 महिलांचा मृत्यू, 35 जखमी

तीर्थटनासाठी उत्तर प्रदेशात गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांवर काळाने भीषण घाला घातला आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन आध्यात्मिक आनंदाने नेपाळच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या खासगी बसचा वाराणसी-गोरखपूर महामार्गावर उत्तर प्रदेशातील नादगंज जवळील नवसारा येथे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More

इंदापूरमध्ये जय भवानी सोसायटीच्या सचिवला लाच घेताना अटक:नवीन पीक कर्ज मंजूर करण्यासाठी 1000 रुपयांची लाच स्वीकारली

पुणे, प्रतिनिधी: इंदापूर येथील पंधारवाडी येथील जयभवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा सचिव नाना चंद्रकांत बोराटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना रंगेहात पकडले. नवीन पीक कर्ज मंजूर केल्याच्या मोबदल्यात त्याने एका शेतकऱ्याकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारली. ही कारवाई पंधारवाडी येथील सहकारी सोसायटीच्या आवारात करण्यात आली. नाना चंद्रकांत बोराटे (वय 43, रा. मु. पो….

Read More

खाण परवानग्यांचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे:परवानगी नियमात आवश्यक ते बदल करण्यात येणार, महसूल मंत्री बावनकुळेंचा निर्णय

राज्यभरात मोठ्या प्रमाणावर होत असलेले अवैध उत्खनन आणि नियमबाह्य स्टोन क्रशरवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने मोठा प्रशासकीय बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ५०० ते २००० ब्रासपर्यंतच्या खाणकामासाठी दिल्या जाणाऱ्या परवानग्यांचे अधिकार आता स्थानिक स्तरावर न ठेवता, ते थेट जिल्हाधिकारी स्तरावर सोपविण्यात येणार आहे. यासाठी नियमामध्ये बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे….

Read More

लासूरगावला यात्रोत्सव; दोन दिवसांत 20000 भाविकांनी घेतले देवीचे दर्शन:जातेगाव दिंडीतील 150 महिलांना साड्यांचे वाटप‎

मराठवाड्याचे कुलदैवत असलेल्या लासूरगाव येथील कुलस्वामिनी देवी दाक्षायणी मातेच्या यात्रोत्सवाला मंगळवारपासून (७ एप्रिल) उत्साहात प्रारंभ झाला. मंगळवार, बुधवार या दोन दिवसांत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सुमारे २० हजार भाविकांनी देवी दाक्षायणी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. यात्रेच्या पहिल्या, दुसऱ्या दिवशी सकाळ, दुपार, संध्याकाळच्या आरतीचा मान दर्शन रांगेतील सहा सपत्नीक भाविक दांपत्यांना मिळाला….

Read More

खुलताबादेत शांतता समिती बैठकीची सांगता‎:नागरिकांच्या मागणीनंतर आरोग्य, वीज, सुरक्षा व्यवस्थेवर ठोस निर्णय

खुलताबाद भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथे प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आरोग्य, वीज, सुरक्षा व्यवस्थेवर ठोस निर्णय घेण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, नगराध्यक्ष सय्यद आमेर पटेल यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी,…

Read More