Headlines

दाभा गावात तीव्र पाणीटंचाई:ग्रामस्थांना 20 दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा, महिलांचे निवेदन

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा गावात गेल्या १५ ते २० दिवसांपासून शासकीय नळयोजनेचा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, महिलांनी थेट नांदगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नळ योजनेद्वारे २० दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून, स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत…

Read More

उमेदवारी नाकारताना पक्षाने साधे विचारलेही नाही:अजितदादांच्या अपघातासंदर्भात प्रश्न विचारल्याचे हे फळ, अमोल मिटकरींनी व्यक्त केली खंत

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना अधिकृत उमेदवारी दिली असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. बाबा सिद्दीकी यांचे दुःखद निधन आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर, वांद्रे पूर्व परिसरात पक्षाची ताकद पुन्हा वाढवण्यासाठी झिशान यांच्यावर हा मोठा विश्वास टाकण्यात आला आहे. या जागेसाठी…

Read More

कौंडण्यपूर-पंढरपूर बस सेवा सुरू करण्याची मागणी:अधिक मासामुळे भाविकांना थेट प्रवासाची सोय उपलब्ध व्हावी

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडण्यपूर येथून थेट पंढरपूरसाठी एस.टी. बस सेवा सुरू करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आहे. पुरातन तीर्थक्षेत्र असलेल्या कौंडण्यपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दर्शनानंतर भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी ही सेवा अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येत्या १७ मे ते १७ जून या कालावधीत अधिक मास येत आहे. या काळात पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या…

Read More

अंदाज समितीने अधिकाऱ्यांना फटकारले:कोणार्क, पोषण आहार, कंपोस्ट डेपो आगीच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले

विधीमंडळ अंदाज समितीने गुरुवारी जिल्हा प्रशासनातील विभागप्रमुखांची पुन्हा एकदा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात झालेल्या या बैठकीत शहरातील कचरा विल्हेवाट लावणारी कोणार्क कंपनी, शालेय पोषण आहार आणि सुकळी येथील कंपोस्ट डेपोला वारंवार लागणाऱ्या आगीचे मुद्दे केंद्रस्थानी होते. आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत एकूण २९ सदस्य आहेत. अमरावतीत ११ प्रतिनिधी दाखल झाले होते,…

Read More

Anil Ambani Arrest Questioned in SC; ED Responds

नवी दिल्ली34 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अनिल अंबानी यांच्या कंपन्यांशी संबंधित ४०,००० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. याचिकाकर्ते वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयात विचारले की, जेव्हा सेबीने (SEBI) स्वतः अनिल अंबानी यांना या संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार म्हटले आहे, तर मग त्यांना आतापर्यंत अटक का करण्यात आली नाही? या प्रश्नावर अंमलबजावणी संचालनालयाच्या…

Read More

इच्छामरणाचा सल्ला नाकारला:पुण्यातील डॉक्टरांनी 85 टक्के किडनी निकामी 'शेल्बी'ला दिले जीवदान

८५ टक्के किडनी निकामी झाल्याने इच्छामरणाचा सल्ला दिलेल्या ‘शेल्बी’ नावाच्या ५ वर्षांच्या जर्मन शेफर्डला पुण्यातील डॉक्टरांनी डायलिसिसच्या मदतीने नवे आयुष्य दिले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात, याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे. बेळगावी येथील डोड्डनवर कुटुंबाचा सदस्य असलेला शेल्बी काही दिवसांपासून अशक्त आणि शांत दिसत होता. त्याला उलट्या होणे, खाणे-पिणे बंद…

Read More

Bihar CM Orders Strict Action on Crimes Against Girls

Marathi News National Bihar CM Orders Strict Action On Crimes Against Girls | Samrat Chaudhary Meeting पाटणा31 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी गुरुवारी अधिवेशन भवनात DM-SP सोबत बैठक घेतली. यावेळी सम्राट म्हणाले- मुलींशी संबंधित गुन्ह्यांमध्ये त्वरित कारवाई करा. मृत मुलींच्या तेराव्यापूर्वी गुन्हेगारांच्या फोटोला हार घाला. यासोबतच मुख्यमंत्री सम्राट म्हणाले की, उद्योजकांना सुरक्षा…

Read More

शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबावी, राजू शेट्टींची कृषी आयुक्तांना मागणी:खतांचा सुरळीत पुरवठा; आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा आणि त्यांची आर्थिक लूट थांबावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे कृषी आयुक्त सुरज मांढरे यांची पुण्यात भेट घेतली. औषध कंपन्यांकडून आंबा बागायतदार शेतकऱ्यांची झालेली फसवणूक आणि त्यांना नुकसानभरपाई मिळावी, यावरही त्यांनी भर दिला. राज्यात सध्या शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत….

Read More

हिंगोलीत वनविभागाचे दोन ठिकाणी छापे:दोन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

औंढा नागनाथ तालुक्यात वन विभागाचे पथकाने दोन ठिकाणी शुक्रवारी तारीख 29 टाकलेल्या छाप्यामध्ये दोन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभाग अंतर्गत औंढा वनपरिक्षेत्रातील मौजे जवळा बाजार येथील एका पेट्रोल पंपाजवळ आमराई मध्ये सागवान व इतर अधिसूचित वृक्ष प्रजातीचे वृक्ष तोड करुन लाकडांचा साठा केला…

Read More

महाराष्ट्र पोलिस दलात बदल्यांचा धडाका:अनेक जिल्ह्यांना मिळाले नवीन पोलिस अधीक्षक, 1 मेच्या पूर्वसंध्येला गृह विभागाचा निर्णय

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या गृह विभागाने पोलिस दलात मोठे फेरबदल केले असून, अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या शासन निर्णयानुसार जालना, अमरावती ग्रामीण, नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर, परभणी, नंदूरबार, चंद्रपूर, ठाणे ग्रामीण आणि वाशिम या जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. तसेच ‘फोर्स वन’चे पोलिस अधीक्षक गजानन…

Read More