Headlines

सोने आज ₹382 ने वाढून ₹1.61 लाखांवर:या वर्षी ₹28 हजार महाग झाले आहे, चांदी आज ₹370 स्वस्त झाली

आज म्हणजेच १४ मे रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ३८२ रुपयांनी वाढून १.६१ लाख रुपयांवर पोहोचला आहे. तर, १ किलो चांदीचा भाव आज ३७० रुपयांनी घसरून २.८७ लाख रुपयांवर आला आहे. यावर्षी सोने २८ हजार आणि चांदी ५७ हजार रुपयांनी महागले यावर्षी सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत…

Read More

वीजपंप जळाल्याने मलकापूर वाढीव‎वस्तीत चार दिवसांपासून पाणी नाही‎:मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांची पाण्यासाठी होतेय वणवण‎

प्रतिनिधी | अकोला शहराच्या मलकापूर परिसरातील वाढीव वस्ती भागाला पाणीपुरवठा करणारा बुस्टर वीजपंप जळाल्याने मलकापूर गावठाणासह सुरेखा नगर, व्हीएचबी कॉलनी, बसेरा कॉलनी, भांडे कॉलेज आणि एमआयडीसीला लागून असलेला परिसर, बुद्ध विहारालगतचा परिसर, आकृतीनगर, दीपाली ले-आऊट, राजरत्न कॉलनी, आरोग्यधाम परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांन नगरसेवक पराग गवई यांच्याकडे तक्रार केली होती. या…

Read More

एमएमसी निवडणुकीत अमरावतीत कमी प्रतिसाद:केवळ 18.9 टक्के मतदान, 2 हजार 565 पैकी 464 डॉक्टरांनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील डॉक्टरांनी अत्यंत कमी प्रतिसाद दिला. एकूण २,५६५ मतदारांपैकी केवळ ४६४ डॉक्टरांनीच मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३२२ पुरुष आणि १४२ महिला डॉक्टरांचा समावेश आहे, ज्यामुळे मतदानाची टक्केवारी केवळ १८.९ टक्के राहिली. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, अमरावतीतील वाढलेले तापमान (४६.८ अंश सेल्सिअस)…

Read More

वैशाख वणव्याने पशू-पक्षी व्याकूळ, तहानलेल्या जिवांसाठी पुढाकार घ्या:वाढत्या उन्हामुळे जलस्रोत आटले, घराघरांत कृत्रिम पाणवठे तयार करण्याची गरज‎

. वैशाख वणव्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून उन्हाची दाहकता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. दैनंदिन तापमानाचा पारा सरासरी ४० अंशांच्या पुढे गेल्याने मानवासोबतच आता भटक्या प्राण्यांसह पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी सामाजिक संस्था, संघटना आणि पक्षीप्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरी…

Read More

विवाह मोडल्याने तरुणीचा खून:आरोपीला जन्मठेप, पुणे सत्र न्यायालयाचा निकाल; २० हजार रुपये दंडही ठोठावला

विवाह मोडल्याच्या कारणावरून एका तरुणीवर चाकूने वार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीला पुणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी हा निकाल दिला. शरीफ रज्जाक शेख (वय २७, रा. अश्रफनगर, कोंढवा बुद्रुक) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. २०१८ मध्ये शेख याचा नाझनीन सादिक शेख (वय १८, रा. गणेश…

Read More

बुलढाणा मेडिकल कॉलेजला राजमाता जिजाऊंचे नाव:राज्य शासनाचा मोठा निर्णय; राजमातांच्या जन्मभूमीचा आणि स्मृतींचा गौरव

बुलढाण्यातील 100 विद्यार्थी क्षमता आणि 430 खाटांचे संलग्न रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आता ‘राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा’ असे नामकरण करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित करून या नामकरणाला मंजुरी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असल्याने, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला…

Read More

बारावीचा आज निकाल:दुपारी 1 वाजता ऑनलाईन होणार जाहीर; 'असा' पाहा तुमचा निकाल अन् डाऊनलोड करा मार्कशीट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, 2 मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी ठीक 1 वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाहता येतील. गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. यंदा राजभरातून एकूण 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी…

Read More

पंढरपूर कॉरिडॉर, उजनी पर्यटन विरोधात एल्गार‎:अधिकारी आणि पालक मंत्र्यांकडून उपोषणाची दखल नाही

उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, जल पर्यटन प्रकल्प व अतिरिक्त संपादित जमिनींच्या मोजणी विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाचा उद्या तिसरा दिवस असून शासनाने कसलाच प्रतिसाद न दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. माढा तालुका उजनी धरणग्रस्त शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत मागण्यांकडे लक्ष…

Read More

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शिट्टी वाजवल्याने शाहरुख खान संतापला होता:वानखेडे वादावर माजी एसीपी म्हणाले- मला सांगण्यात आले की शाहरुख गोंधळ घालत होता

२०१२ साली मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या वादावर तत्कालीन एसीपी इक्बाल शेख यांनी नुकतेच सांगितले की, शाहरुख खान आणि एमसीए अधिकाऱ्यांमध्ये गैरसमजातून वाद झाला, तो वाढू नये म्हणून त्यांनी अभिनेत्याला घटनास्थळावरून बाहेर घेऊन जाण्यास सांगितले होते. हे प्रकरण २०१२ च्या आयपीएल सामन्यानंतर समोर आले होते, जेव्हा कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सला हरवले होते. सामन्यानंतर मैदानावर शाहरुख…

Read More

दिल्लीत 4 मजली इमारतीला आग, 9 जणांचा मृत्यू:AC मध्ये स्फोट होऊन आग लागली; दोन लोक जखमी, सुमारे 15 जणांना वाचवण्यात आले

दिल्लीतील शाहदरा परिसरातील विवेक विहारमध्ये रविवारी सकाळी एका चार मजली इमारतीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य आणि आग विझवताना इमारतीतून 10-15 लोकांना वाचवण्यात आले. या घटनेत दोन लोक किरकोळ जखमी झाले, त्यांना उपचारासाठी गुरु तेग बहादूर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आग दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील फ्लॅट्समध्ये लागली होती….

Read More