काँग्रेसने महिलांना संसदेत येण्यापासून रोखले:केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आरोप; देशभर रस्त्यावर उतरण्याचा इशारा
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर महिलांना संसदेत येण्यापासून रोखल्याचा गंभीर आरोप केला आहे. महिला आरक्षण विधेयकामुळे सामान्य महिलांना संसदेत येण्याची संधी होती, मात्र विरोधी पक्षांनी हे प्रयत्न हाणून पाडले, असे आठवले म्हणाले. महिलांना लोकसभेत आरक्षण मिळवून देण्याच्या सरकारच्या चांगल्या प्रयत्नांना विरोधी पक्षांनी धुळीस मिळवले, असे आठवले यांनी सांगितले….