पाणीटंचाई,‘पाथरी’ योजना पूर्ववतची मागणी:बार्शीत विरोधी पक्षनेते आक्रमक, नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
ऐन उन्हाळ्यात बार्शीकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शहर तहानेले राहिले आहे. शहरात ७ ते ८ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा तातडीने सुधारण्याची मागणी केली आहे. यावेळी विरोधी गटाचे अनेक नगरसेवक व पदाधिकारी…