शासकीय विश्रामगृहातील पार्टीप्रकरणी केली तक्रार:प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सद्या संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. असे असतानाच तिवसा येथील साबांविच्या विश्रामगृहात एका राजकिय पक्षाच्या सुमारे दहा ते पंधरा जणांनी पार्टी केल्याचा आरोप आहे. उच्च पदस्थांसाठी आरक्षित असलेल्या व्हीआयपी सूटवर ताबा मिळवला आणि तिथे पार्टी आयोजित केल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याप्रकरणात आचारसंहितेचा भंग आणि निष्काळजीपणा करणाऱ्या जबाबदार…