Headlines

जळगाव विद्यापीठासमोर भीषण अपघात:भरधाव कारच्या धडकेत नवविवाहितेचा मृत्यू, काका गंभीर




लग्न होऊन सहा दिवस झालेली ‎‎नववधू तिच्या ‎‎काकांसोबत‎‎ दुचाकीने माहेरी‎ ‎जात असताना,‎ ‎मागून येणाऱ्या ‎‎एका भरधाव ‎‎कारने‎ त्यांच्या ‎‎दुचाकीला धडक ‎दिली. विद्यापीठासमोर महामार्गावर‎ सोमवारी दुपारी 4 वाजता या भीषण‎ अपघातात नववधूचा जागीच मृत्यू‎ झाला. वैशाली भाऊसाहेब पाटील‎ (रा. कोळपिंप्री, ता. पारोळा ) असे‎ मृत नवविवाहितेचे नाव आहे. या‎ अपघातात तिचे काका गंभीर ‎जखमी झाले आहेत.‎ मृत वैशाली पाटील हिचा विवाह ‎7 जुलै रोजी जळगावातील देवराम‎नगर येथील पोलिस कर्मचारी विजय‎ काशिनाथ पाटील यांच्याशी झाला‎ होता. विवाहानंतर हे नवीन जोडपे ‎नुकतेच देवदर्शन करून परतले होते. ‎सोमवारी वैशालीला माहेरी ‎नेण्यासाठी तिचे काका प्रवीण‎ सूर्याजी पाटील (वय 40, रा.‎कोळपिंप्री) हे जळगावात आले ‎होते. दुपारी जेवण आटोपल्यानंतर ‎दोघेही दुचाकीने कोळपिंप्रीकडे ‎जात असताना हा अपघात झाला.‎ एसटीऐवजी दुचाकीने‎ जाण्याचा घेतला निर्णय‎ वैशालीच्या लग्नाला अवघे सहा‎ दिवस झाले होते, तिच्या हाताची ‎हळदही अजून फिटली नव्हती. ‎त्यातच पुढे अमावास्या येत‎ असल्याने नातेवाइकांनी काकांना‎ दुचाकीऐवजी एसटी बसने ‎जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र,‎काका-नववधू दुचाकीने निघाले‎ आणि वाटेतच हा काळाचा घाला‎ आला, ज्यामुळे परिसरात मोठी‎ हळहळ व्यक्त होत आहे.‎ जळगावात धावत्या रेल्वेचा धक्का ‎लागून प्रौढाचा मृत्यू‎ दुसरीकडे शिरसोली ते जळगाव रेल्वे ट्रॅक‎दरम्यान रेल्वेचा धक्का लागून एका‎ 47 वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू‎ झाला. सुभाष सीताराम महाजन‎ (47, रा. हरिविठ्ठलनगर) असे मृत ‎व्यक्तीचे नाव आहे. शिरसोली ते ‎जळगाव डाऊन रेल्वे रुळावरील ‎खांब क्रमांक 416/9 ते 11च्या‎ दरम्यान ही घटना घडली. रेल्वे उप‎स्टेशन प्रबंधकांच्या माहितीवरून ‎रामानंदनगर पोलिस ठाण्यात ‎अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात‎ आली आहे. याप्रकरणी पुढील‎ तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र‎ राठोड हे करीत आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *