Headlines

ड्रग्ज माफियांना आता कोणीही वाचवू शकणार नाही:फडणवीसांकडून धडाकेबाज कारवाया सुरू, खरात प्रकरणी पुरावे द्या, तपास भरकटवू नका- बावनकुळे




राज्य सरकार ड्रग्ज आणि अवैध धंद्यांच्या विरोधात अत्यंत संवेदनशील असून, दोषींवर कठोर कारवाई केली जात आहे, असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. मागील सरकारच्या काळात अशा कारवायांकडे दुर्लक्ष झाले होते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आता कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अशोक खरात प्रकरणावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सभागृहात या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. ज्यांच्याकडे या संदर्भात ठोस पुरावे आहेत, त्यांनी ते खुशाल प्रशासनाकडे द्यावेत, सरकार त्यावर कारवाई करण्यास समर्थ आहे. मात्र, पुरावे न देता केवळ चर्चेत राहण्यासाठी आणि तपास भरकटवण्यासाठी काही नेत्यांकडून चुकीची विधाने केली जात आहेत. अशा लोकप्रतिनिधींनी बेजबाबदारपणे न बोलता माहिती असल्यास ती थेट एसआयटी (SIT) कडे सोपवावी, असे आवाहन बावनकुळेंनी केले. नाशिक प्रकरणावर सरकारचे लक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नाशिकमध्ये समोर आलेल्या ‘कार्पोरेट जिहाद’ प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. ज्या कंपनीत हा प्रकार घडला, त्या कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या प्रकरणावर सरकारचे बारीक लक्ष असून दोषींची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बिल्डरांच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू; महसूल मंत्र्यांचा कडक इशारा दुसरीकडे नाशिकमधील गृहनिर्माण क्षेत्रात उघड झालेल्या कथित म्हाडा घोटाळ्याने राज्यभरात खळबळ उडवली असून आता या प्रकरणात मोठी कारवाई सुरू झाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिकमधील बिल्डर लॉबीमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *