Headlines

पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस:सत्ताधाऱ्यांमधील 'UCC' वादाचे पडसाद आणि बीड हत्याकांडावरून आज पुन्हा सभागृह तापणार!




महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (बुधवार) तिसरा दिवस असून, पहिल्या दोन दिवसांतील राजकीय घडामोडी पाहता आजचे कामकाजही अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे. काल, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘तिहेरी तलाक’ आणि ‘समान नागरी कायद्या’वरून (UCC) सत्ताधारी महायुतीमध्येच उडालेला भडका, बीड हत्याकांडावरून मुंडे बंधू-भगिनींनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि मुख्यमंत्र्यांचा लोडशेडिंगबाबतचा दावा यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. आज विरोधक याच मुद्द्यांवरून आणि पहिल्या दिवशी मांडलेल्या 97 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी करत आहेत. कालच्या महत्त्वाच्या घडामोडी… सत्ताधाऱ्यांमध्येच खडाजंगी: ‘तिहेरी तलाक’ आणि ‘UCC’चा मुद्दा काल विधानसभेत समान नागरी कायदा (UCC) आणि तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी मांडत मुस्लीम महिलांवरील अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदार सना मलिक यांनी अत्यंत आक्रमक प्रत्युत्तर दिले. “बहुपत्नीत्व केवळ मुस्लीम धर्मात नाही. भारतातही कुराणच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली. सना मलिक यांच्या या विधानावर भाजपच्या आमदारांनी जोरदार आक्षेप घेत, “हा देश संविधानावर चालतो, कुराणवर नाही!” असा पलटवार केला. आज विरोधक महायुतीमधील या अंतर्गत वैचारिक दुफळीचा फायदा घेत सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. बीड हत्याकांडाचे पडसाद: मुंडे बंधू-भगिनी आक्रमक बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या विलास घुले हत्याकांडाचे तीव्र पडसाद काल विधानसभेत उमटले. परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत, “हत्येमागील मास्टरमाईंडचा पोलिसांकडूनच बचाव सुरू आहे,” असा गंभीर आरोप केला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत सखोल तपासाची मागणी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गृह विभागाला तात्काळ योग्य चौकशीचे निर्देश दिले आहेत. आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय निवेदन देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा: “राज्यात कुठेही लोडशेडिंग नाही” राज्यातील पाणीटंचाई आणि वीज कपातीवरून विरोधकांनी केलेल्या आरोपांना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर दिले. “काही औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे बंद पडले होते, परंतु या आपत्कालीन परिस्थितीतही राज्य सरकारने एकाही दिवशी अधिकृत भारनियमन (लोडशेडिंग) केलेले नाही,” असा ठाम दावा मुख्यमंत्र्यांनी केला. आजच्या कामकाजाचा प्रमुख अजेंडा: 97 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने दोन्ही सभागृहांत 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. आज या मागण्यांवर सविस्तर चर्चा आणि मतदान होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या निधीचे वाटप करण्यात आले आहे: शेती आणि समाजकल्याण निधी: कायदा व सुव्यवस्थेसाठी ‘बूस्टर डोस’: आज काय घडणार? आजच्या कामकाजात विरोधक मंत्र्यांच्या सभागृहातील अनुपस्थिती, महागाई, दुष्काळ आणि राज्यातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था या मुद्द्यांवरून आक्रमक राहतील. तसेच, ९७ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या म्हणजे केवळ ‘निवडणुकीची गाजरे’ असल्याचा आरोप विरोधकांकडून होण्याची दाट शक्यता आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी आज सभागृहात जोरदार खडाजंगी पाहायला मिळेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *