![]()
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे क्रांतिकारी पाऊल होते असे विचार सुधाकर इंगळे महाराज यांनी येथे बोलताना मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा राज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर कोकण कडा मित्र मंडळ, महाड व रायगड प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात त्यांचे किर्तन झाले. ते पुढे म्हणाले, राजमुद्रा ही संस्कृतमध्ये असावी हा निश्चय म्हणजे क्रांतिकारी निर्णय होता. या रायगडावर तीन राजांचे राज्याभिषेक झाले आहेत. हा किल्ला प्रमुख साक्षीदार आहे. रायगडाच्या राज सदरांवर स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तीचा न्याय निवाडा झाला. योग्य आणि प्रामाणिक न्याय ही स्वराज्याची ओळख होती. अशा राजसदरेवर कीर्तन करण्याचा योग आल्याचे त्यांनी नमूद केले. वारीनिमित्त निघणारा पालखी सोहळा हे सर्व फक्त शिवरायांच्या मुळेच होत आहे. अशा शिवरायांच्या जीवनातील सुवर्ण क्षण- ऐतिहासिक क्रांती म्हणजे राज्याभिषेक सोहळा आहे. त्यामुळे या दिवसाला हिंदू साम्राज्य दिन असे ओळखले जाऊ लागले आहे. या कार्यक्रमाचे रायगड प्रतिष्ठानचे प्रमुख शिवाजी भोसले, जोतिराम चांगभले, विठ्ठल मोलाणे यांनी नियोजन केले होते.
Source link
शिवरायांचा राज्याभिषेक हे क्रांतिकारी पाऊल:सुधाकर इंगळे महाराजांनीव्यक्त केले विचार