![]()
राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीयोजने’अंतर्गत आता जिल्हाधिकाऱ्यांच्याअध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचामहत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्जमुक्तीची प्रक्रियापारदर्शक, वेगवान आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभपोहोचण्याच्या अनुषंगाने समिती गठित करण्यात आलीआहे. पात्र तसेच अपात्र शेतकऱ्यांची यादी जवळपासतयार झाली आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या दोनकर्जमाफी योजनांमध्ये ८१ हजार शेतकरी वंचित राहिलेहोते. त्यामुळे आता नवीन योजनेतील अटी, निकषांचाफटका किती शेतकऱ्यांना बसणार, हे लवकरच समोरयेणार आहे. अनेक शेतकऱ्यांची धाकधूकही वाढलीआहे. शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने उपाययोजनासुचवण्यासाठी राज्य सरकारने //”मित्र//” संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्टोबर२०२५ मध्ये समिती गठित केली. शेती कर्जाची माहितीशासनाच्या पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया राबवण्यातआली. त्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीचीघोषणा करण्यात आली होती. केवायसीबाबतची प्रक्रियासुरू झाली. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरशेतकरी कर्जमुक्ती योजनेला २ जून रोजीमंत्रिमंडळाकडून मान्यता प्रदान करण्यात आली.दरम्यान, योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीयसमिती गठित करण्यात आली आहे. पात्रता, अपात्रता, तसेच अन्यमाहिती क्लिष्ट आहे. सेवा सहकारीसोसायट्यांकडून माहिती संकलितकरून घेतली जात आहे. यामाहितीचे सहकार विभागातीलअधिकारी लेखापरीक्षण करीतआहेत. एकूणच योजनेचीअंमलबजावणी करताना, पात्रलाभार्थींना लाभ देताना, सरकारीतिजोरीवर आणखी ताण येणारनाही, हे पाहिले जाणार आहे. समितीचे महत्त्वाचे काम म्हणजेपात्र आणि अपात्र लाभार्थींची अचूकछाननी करून यादी प्रसिद्ध करणे. यायोजनेअंतर्गत अपात्र असलेले नगरपालिका, मनपा, जिल्हा परिषद,पंचायत समितीतील पदाधिकारी,अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहितीपोर्टलवर अपलोड केली जाणारआहे. अपात्र लाभार्थ्यांवर नियंत्रणठेवले जाणार आहे. यामुळे अपात्रव्यक्तींना लाभ मिळण्याची शक्यताकमी होणार आहे. आधार लिंकनसलेल्या कर्ज खात्यांची माहितीजाहीर केली जाणार आहे.शेतकऱ्यांना आवश्यक पूर्तताकरण्यासाठी संधी देण्यात येणारआहे. पात्र शेतकऱ्यांची अधिकृतयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.अॅग्रिस्टॅक नोंदणी आणि आधारप्रमाणीकरणासाठी जिल्हास्तरावरविशेष मेळावे घेण्यात येणार आहेत.तक्रारींचे निवारण समिती करणारआहे. तिजोरीवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने कठाेर अंमलबजावणी सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळेसरकारच्या तिजाेरीवर ताण आला आहे.नवीन शेतकरी कर्जमुक्ती याेजनेंतर्गतहीअटी, निकष, कर्ज कालावधी यांचासमावेश आहे. यापूर्वी महाविकास वमहायुतीच्या काळात तीन कर्जमाफीयाेजना जाहीर झाल्या हाेत्या. त्यातीलअटी, निकष, दस्तावेजांचा फटकाशेतकऱ्यांना बसला असून एकूण ८१ हजार३३५ शेतकरी लाभापासून वंचित राहिलेहाेते. या याेजनांमध्ये १२९४ काेटी रुपयेलाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आलेहाेते. आता नवीन याेजनेंर्तगततपासणीसाठी सहकार विभागाच्या ३७अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्तीकरण्यात आली. अशी आहे समिती वसमितीची कार्यपद्धती जिल्हास्तरीय समितीतजिल्हाधिकारी अध्यक्ष तर सहकारीसंस्थांचे जिल्हा उपनिबंधक सदस्यसचिव आहेत. सदस्य म्हणून जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेमुख्य कार्यकारी अधिकरी, जिल्हाअग्रणी बँकेचे व्यवस्थापक, व्यापारीबँकांचे जिल्हा जिल्हा समन्वयकआहेत.
Source link
शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हास्तरीय समिती:अटींचा बसणार फटका; पात्र लाभार्थी, अपात्र शेतकऱ्यांची यादी होणार जाहीर