Headlines

संजय राऊतांच्या शिवीगाळीनेच उबाठावर ही वेळ:रावसाहेब दानवेंची टीका, म्हणाले- तोडफोड करणे ही भाजपची संस्कृती नाही




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उबाठा गटातील सध्याच्या परिस्थितीसाठी भाजप नव्हे, तर पक्षातील अंतर्गत मतभेद आणि संजय राऊतांची आक्रमक भाषा जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला. यामध्ये भाजपचा कुठलाही हस्तक्षेप नाही..
माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले, उबाठा गटाचे सहा खासदार फुटले, त्यामध्ये भाजपचा कुठलाही हस्तक्षेप नाही. त्यांच्या अंतर्गत वादातून खासदार पक्ष सोडत आहेत आणि त्यासाठी भाजपला जबाबदार धरले जात आहे. हा त्यांचा कमकुवतपणा आहे. राऊतांची भाषा चांगली असती तर… संजय राऊतांवर निशाणा साधताना ते म्हणाले, राऊतांची भाषा अधिक संयमी आणि सुसंस्कृत असती तर आज उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती. सततची शिवीगाळ आणि आक्रमक वक्तव्यांमुळेच पक्षातील नाराजी वाढली आहे. तोडफोड करणे ही आमची संस्कृती नाही – दानवे
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवरही दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. तोडफोड करणे ही भाजपची संस्कृती नाही. भाजपकडून कोणतेही ‘ऑपरेशन टायगर’ सुरू नाही, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. 6 जागा जिंकल्या, उरलेल्या 11 जागांवरही महायुतीचाच गुलाल
दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या 17 विधान परिषद जागांसाठी निवडणूक होत असून त्यापैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 11 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला. महायुतीची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील पाठबळ पाहता निकाल महायुतीच्या बाजूने लागेल, असा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज: ठाकरेंच्या शिवसेनेतील खदखद आता बाहेर पडतेय – बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जी खदखद अनेक दिवसांपासून होती, ती आता बाहेर पडत आहे. पक्षातील लोक का नाराज आहेत, खासदार आणि आमदार वेगळा विचार का करत आहेत, याचा गंभीरपणे विचार उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *