Headlines

हिंगोलीत जागा शासनाची आणि नागरिकांची पक्की घरे:125 जणांना जमीन मिळाली कशी? याबाबत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश




हिंगोली शहरातील उच्चभ्रू वसाहती भागात जमिनीचे पीआर कार्ड शासनाच्या नावाचे असताना त्यावर नागरिकांनी घरे उभे केल्याची चित्र आहे यावरून उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी 125 जणांना नोटीस बजावले आहेत. या प्रकरणात कागदपत्रे सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत हिंगोली शहरात महसूल विभागाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू केले जाणार आहे त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काही दिवसापूर्वी शहरातील काही अतिक्रमण भागाची पाहणी केली त्यानंतर उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या पथकाने पाहणी देखील केली होती. त्यानंतर उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी 125 जणांना नोटीसा बजावले आहेत. सदरील जागा शासनाच्या मालकीची असताना ही जागा आपणास कशी मिळाली या जागेची कागदपत्रे सादर करावी अशा स्पष्ट सूचना या नोटीसद्वारे देण्यात आले आहेत. त्यानंतर आता या नागरिकांनी जागा मिळाल्याबाबतच्या कागदपत्रांचा शोध सुरू केला आहे सदरील कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यावर उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या उपस्थितीत सुनावणी होणार आहे. त्या सुनावणी नंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान यानंतर आता रिसाला बाजार व फलटण भागात नागरिकांना नोटीस बजावले जाणार आहेत ज्या नागरिकांकडे त्यांना मिळालेली जागा कुठल्या पद्धतीने मिळाली याबाबतचा पुरावा नसेल त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची सूत्रांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *