Headlines

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार:वसमत शहर, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल




हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळया अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी वसमत शहर, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 14 वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार वसमत येथील गणेशपेठ भागातील सय्यद माजीद सय्यद नसीम (31) हे त्यांच्या दुचाकी वाहनावर वसमत ते मालेगाव रोडवर जात होते. यावेळी भारधाव वेगाने धावणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सय्यद माजीद हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या प्रकरणी शेख मतीन यांच्या तक्रारीवरून कार चालका विरुध्द वसमत शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 14 गुन्हा दाखल झाला आहे. जमादार शेख नय्यर पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, अपघाताच्या अन्य एका घटनेत औंढा नागनाथ तालुक्यात बेरुळा येथील नवनाथ दाभाडे (30) हे नांदखेडा शिवारातून जात असतांना भरधाव ट्रॅक्टरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात नवनाथ हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या प्रकरणी मनिषा दाभाडे यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिसांनी ट्रॅक्टर चालक प्रभाकर मात्रे याच्या विरुध्द मंगळवारी ता. 14 गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक दत्ता कानगुले पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *