Headlines

कळवणला 17 ग्रामपंचायतींची जालना जिल्ह्यातील परतूरच्या टीमकडून पाहणी:मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विकासकामांचे स्कॅनिंग‎

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कळवण तालुक्यातील एकूण १७ गावांची परतूर, जि. जालना टीमकडून तपासणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायत बिलवाडी येथे तपासणी व पाहणी कामासाठी आलेल्या मान्यवर टीमचे ग्रामपंचायतीच्या वतीने उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले . यावेळी उपस्थित जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची पाहणी करून मार्गदर्शन केले….

Read More

काश्मीरमध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह 1500 व्हिलेज गार्ड्सची फौज:5 जिल्ह्यांतील ग्रामीण जवानांसोबत 12-12 तास ड्युटी करत आहेत

ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी गावपातळीवर सुरक्षा व्यवस्था खूप मजबूत केली आहे. गेल्या एका वर्षात पाच जिल्ह्यांमध्ये 1500 हून अधिक व्हिलेज डिफेन्स गार्ड्स (VGD) ला प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात शस्त्रे चालवणे, रणनीतिक हालचाली, पाळत ठेवणे आणि आपत्कालीन प्रतिसाद यांचा समावेश आहे. तसेच, .303 रायफलऐवजी एसएलआर, बुलेटप्रूफ जॅकेट आणि वायरलेस कम्युनिकेशन सेट देखील दिले जात…

Read More

व्यसन-फॅशन सोडून प्रत्येकाने भारतीय संस्कृतीचा अंगीकार करणे काळाची गरज:ठाणगाव येथील कार्यक्रमात संतोष महाराज जाधव यांचे निरूपण‎

मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्लभ आहे. मात्र, सध्या व्यसन आणि फॅशनच्या नावाखाली पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत चालला आहे. याचे दुष्परिणाम म्हणून हिंदू समाजातील माता-भगिनी संकटात सापडत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येकाने पुन्हा एकदा भारतीय संस्क . ठाणगाव (ता. सिन्नर) येथे श्री स्वामी समर्थ अ ध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रातर्फे आयोजित श्री स्वामी समर्थ संगीतमय चरित्र कथा…

Read More

निषेध:50 रुपये भाव पुकारल्याने आंदोलन; नंतर तो कांदा 175 दराने खरेदी, सटाणा बाजार समिती प्रवेशद्वारासमोर कांदा फेकून देण्याचा पवित्रा‎

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला अवघा ५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्याने संताप व्यक्त करीत अन्यायकारक दराच्या निषेधार्थ बाजार समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर मध्यस्थी करीत १७५ रुपये दराने कांदा खरेदी केल्याने आंदोलन स्थगित झाले. बुधवारी (दि. ६) सटाणा बाजार समितीत कऱ्हे येथील शेतकरी जितेंद्र बाळू…

Read More

वातावरणात बदल:10 दिवसांत पारा 6 अंशांनी घसरला, निफाड @ 37 अंश, एप्रिल महिन्यात 43 अंशापर्यंत गेले हाेते तापमान

एरव्ही थंड तालुका म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कडाक्याचे ऊन पडत असल्यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेच्या झळा सोसाव्या लागल्या. एप्रिल महिन्यात ४३ अंशांपर्यंत गेलेल्या तपमानाला कुठेतरी आता ब्रेक लागला असून, दहा दिवसानंतर निफाडचे तापमान ३७ अंशांवर येऊन पोहोचले आहे. सहा अंशांनी पारा घसरल्याने नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी तापमानाची नोंद…

Read More

पालक स्वतः ठरवतील आता शाळेचे बजेट आणि विकास:स्वतः तयार करतील तीन वर्षांचा मास्टर प्लॅन, केंद्राच्या 15 लाख शाळांमध्ये होईल बदल

केंद्र सरकारने सरकारी शाळांच्या व्यवस्थेत बदल करत मे 2026 पासून नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक बदलांतर्गत, देशातील सुमारे 15 लाख शाळांचे व्यवस्थापन आता थेट पालकांच्या हातात असेल. नवीन नियमांनुसार, शाळा व्यवस्थापन समितीला (एसएमसी) 30 लाख रुपयांपर्यंतची बांधकाम कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) मंजुरीशिवाय स्वतः करण्याची आर्थिक शक्ती देण्यात आली आहे….

Read More

येवला-एरंडोल रस्त्यावर गतिरोधकांची गरज:पादचाऱ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास

नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात येवला ते एरंडोल या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या नवीन रस्त्यावर कुठेही गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली असून, गावानजीक तातडीने गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचे काम सुरू असून, वेहळगाव ते नांदगाव…

Read More

पेहेचान प्रगती फाऊंडेशनचा 4 राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव, महिला सक्षमीकरण, सामाजिक कार्याची‎ दखल‎

इंदूर येथे आयोजित अखिल भारतीय दिगंबर जैन महिला परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात इगतपुरीच्या ‘पेहेचान प्रगती फाऊंडेशन’ने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला जैन व प्रांतीय अध्यक्षा टीना पांड्या (मुंबई) यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या या संस्थेने चार प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केले. संस्थेच्या अध्यक्षा प्रगती अजमेरा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या सामाजिक कार्य व महिला…

Read More

पावसाळा तोंडावर; ‘जलतारा’चे आदेश नाहीत:सिल्लोडमध्ये 3600 शोषखड्ड्यांचे प्रस्ताव रखडले, शेतकऱ्यांत नाराजी‎

तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘जलतारा’ उपक्रमाची कामे अद्याप सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यंदा तालुक्यात सुमारे ३ हजार ६०० जलतारा खड्डे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र संबंधित कामांचे कार्यारंभ आदेश अद्याप देण्यात आले नसल्याने प्रत्यक्ष कामांना सुरुवात होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होण्यास अवघा महिनाभराचा…

Read More

National Current Affairs | Govt Job Prep 2026 Updates

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जाणून घ्या आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. बिहार मंत्रिमंडळात 22 मंत्र्यांनी शपथ घेतली 7 मे रोजी बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मेगा इव्हेंटमध्ये नितीश यांचे पुत्र निशांत कुमार यांच्यासह 32 मंत्र्यांनी सम्राट मंत्रिमंडळात समावेश झाला. नवीन मंत्रिमंडळात भाजपचे…

Read More