Headlines

वृक्षतोडीमुळे उन्हाच्या झळा:सोलापुरात झाडी असलेल्या व्हीआयपी रोडवर दुपारी 1.30 वाजता पारा 40 अंश, 500 मीटरवरील रेल्वे स्टेशन मार्गावर मात्र 43 वर

‘झाडे लावा, झाडे वाचवा’ हा संदेश सातत्याने दिला जातो. मात्र तो गांभीर्याने घेतला जात नाही. आपल्या भागात, शहरात झाडे का आवश्यक आहेत? याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने एक प्रयोग केला. कडक उन्हात दुपारी 1.30 ते 2 या वेळेत आम्ही थर्मामीटरच्या सहाय्याने शहरातील दोन प्रमुख रस्त्यांवरील तापमान मोजले गेले. संगमेश्वर कॉलेजपासून ते जुना एम्प्लॉयमेंट चौकापर्यंत…

Read More

Delhi Tops Crimes Against Women & Elderly in 2024; 13,396 Cases Nationwide

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (एनसीआरबी) ने 2024 मध्ये देशात झालेल्या गुन्ह्यांचा अहवाल जारी केला आहे. यानुसार, राजधानी दिल्लीत महिला आणि वृद्धांच्या सुरक्षेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अहवालानुसार, 2024 मध्ये मेट्रो शहरांमध्ये महिलांविरोधी गुन्ह्यांच्या बाबतीत दिल्ली अव्वल स्थानी राहिली आहे. 2024 मध्ये महिलांविरोधात 13,396 गुन्हे दाखल झाले, जे 2023…

Read More

सुनेत्रा पवारांच्या जागेसाठी राष्ट्रवादीत जोरदार लॉबिंग:राज्यसभेसाठी पाच बडे नेते रिंगणात; महिला आयोगाच्या पदावरही चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाला संधी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी या जागेसाठी रस दाखवल्याने राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत स्पर्धा वाढल्याचे चित्र दिसत आहे. राज्यसभेच्या जागेसोबतच पक्षातील इतर महत्त्वाच्या रिक्त पदांवरही लवकरच निर्णय होण्याची…

Read More

यूपीसह 9 राज्यांमध्ये पाऊस:बिहारमध्ये गारपीट, वीज पडून 2 जणांचा मृत्यू; राजस्थानच्या जयपूरमध्ये रस्त्यांवर पाणी शिंपडले

उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचा जोर कायम आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशात बुधवारी पाऊस झाला. तर बिहार, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात गारपीटही झाली. उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये गोदामात ठेवलेले 100 क्विंटल गहू भिजले. राज्यात कमाल तापमान 40°C च्या खाली आले आहे. आज 44 जिल्ह्यांमध्ये वादळी…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:गावातले लोक आपल्या मुलांना घराबाहेर खेळण्यासाठीही पाठवत नाहीत, चिमुकलीवर अत्याचाराची सहा दिवसांनंतरही नसरापूर गावात दहशत कायम

पुणे-सातारा महामार्गावरील 3500 लोकसंख्येचं नसरापूर गाव… गावात सिमेंटचे गुळगुळीत लांबलचक रस्ते. पण रस्त्यांवर चिटपाखरूही नाही. एकही मूल खेळताना दिसत नाही. सुरुवातीला असं वाटलं वैशाखातील रखरखत्या उन्हामुळं आई-बाप मुलांना घराबाहेर पाठवत नसावेत. पण हळूहळू गावकरी बोलू लागतात. त्यांच्या बोलण्यातून कळतं की, आई-बापच मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी पाठवत नाहीयेत. कारण सहा दिवस उलटून गेले तरी या गावात त्या…

Read More

उन्हाच्या झळा सोसत उद्धवने रिक्षावरच फिरवले नशिबाचे चाक:माळेगावच्या तरुणाची रसवंतीतून गरुडझेप; तरुणांसमोर ठेवला स्वावलंबनाचा आदर्श‎

उन्हाळ्याचा पारा चाळीशी पार जात असताना अंगाची लाहीलाही होत आहे. अशा कडक उन्हात सर्वसामान्य नागरिक शीतपेयांचा आधार घेत आहेत. मात्र, याच उन्हात स्वतः घाम गाळत इतरांना तृप्त करणारा माळेगावचा २२ वर्षीय तरुण उद्धव मच्छिंद्र गाडेकर कौतुकाचा विषय ठरत आहे. त्याची रिक्षावरील रसवंती केवळ तहान भागवत नाही, तर बेरोजगार तरुणांना आत्मनिर्भरतेचा ‘गोड’ संदेशही देत आहे. उद्धवचे…

Read More

राजकारणात येऊन चुकलो का? महिलांवरील अत्याचारांवर रोहित पवारांची खंत:फास्टट्रॅक कोर्ट तरी न्याय कुठे? व्यक्त केली नाराजी

जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे एका पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील महिला सुरक्षेवर गंभीर चिंता व्यक्त केली. लहान मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबाबत बोलताना त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. राजकारणात असूनही जर चिमुकल्या मुलींना आणि महिलांना न्याय देता येत नसेल, तर आपण कुठेतरी फसलो किंवा चुकलो आहोत,…

Read More

सोनगाव-सात्रळ,धानोरेत चोरट्यांची दहशत:काठ्या घेत नागरिकांची गस्त, महिलांमध्ये भीतीचे सावट; स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी

गेल्या दोन आठवड्यांपासून प्रवरा परिसरातील सोनगाव-सात्रळ-धानोरे या पंचक्रोशीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सततच्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असून, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या अपुऱ्या गस्तीमुळे नागरिक आता स्वतःच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरले असून, रात्री गस्त घालत आहेत. सोनगाव, सात्रळ आणि धानोरे ही गावे संगमनेर, राहाता व राहुरी अशा तीन तालुक्यांच्या सीमेवर आहेत. भौगोलिकदृष्ट्या…

Read More

प्रशिक्षण शिबिरांतून मिळते शिस्त अन् आत्मविश्वास:नगरमध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, विद्यार्थ्यांना घेतला उत्साहाने सहभाग‎

आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शिक्षणाबरोबरच खेळही महत्त्वाचे आहेत. ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आहे, मात्र योग्य मार्गदर्शन व सुविधा मिळाल्या नाहीत तर ही प्रतिभा दडपून जाते. हेच लक्षात घेऊन शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरातून खेळाडूंना केवळ खेळाचे तंत्र नव्हे, तर शिस्त, आत्मविश्‍वास आणि संघभावना यांचे शिक्षण मिळणार आहे. प्रशिक्षकांकडून मिळणारे मार्गदर्शन आत्मसात करून…

Read More

सुदृढ आणि निरोगी जीवनासाठी मैदानी खेळ आवश्यक- वाकळे:महापौर उद्यानात समर कॅम्पला उत्साहात प्रारंभ, चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎

सुदृढ व निरोगी जीवनासाठी मुलांनी बालवयातच मैदानी खेळांची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. आजची मुले ही उद्याच्या भारताचे उज्ज्वल भविष्य असून त्यांच्यात योग्य संस्कार आणि क्रीडावृत्ती निर्माण करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले. संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी यांच्यावतीने महापौर उद्यान येथे ‘प्रिशा समर कॅम्प’चे आयोजन करण्यात आले असून…

Read More