Headlines

"मजीप्रा'त ठिय्या; अभियंत्यांना नळ, पाइप, माठ दिला भेट:बांगड्या घालण्याचाही प्रयत्न; 5 दिवसांनी पाणी देण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन‎

उन्हाळा तीव्र होत असतानाच २५ दिवसांनंतरही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने अकोला तालुक्यातील ग्रामस्थांनी बुधवारी आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी ग्रामस्थांना सोबत घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजीप्रा) कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन केले. पाण्यासाठी असलेले पाइप, नळ व माठ अभियंत्यांना भेट देत अनोख्या पद्धतीने पाणी मिळत नसल्याचा निषेध केला. अभियंत्यांना धारेवर धरत जाबही…

Read More

हिंगणी तलाव परिसरात 60 शेतकऱ्यांच्या विद्युत केबल्स लंपास:लाखोंचे नुकसान, वैराग पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान, 15 दिवसांत केबल चोरीची दुसरी घटना‎

बार्शी तालुक्यातील पिंपरी (पा) व परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसवणारी केबल चोरीची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. हिंगणी मध्यम प्रकल्पाच्या तलाव परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ९८०० फूट लांबीची व सुमारे १ लाख १७ हजार ६०० रुपयांची विद्युत क . पिंपरी (पा) येथील शेतकरी चेतन जयकुमार काशिद (वय ३७) यांनी वैराग पोलीस ठाण्यात दिलेल्या…

Read More

खरिपातही सोयाबीनच किंग, रेणापुरात 41 हजार हेक्टरवर पेरा होण्याचा अंदाज:तालुक्यात खरीपपूर्व मशागतीला वेग; 45 हजार 900 हेक्टरचे नियोजन‎

एप्रिल महिना संपताच रेणापूर तालुक्यातील शेतकरी आगामी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. तालुक्यात यंदा ४५ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी प्रस्तावित आहे. यामध्ये नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचा पेरा सर्वाधिक, म्हणजेच तब्बल ४१ हजार १ . सध्या शिवारात ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी व मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, ट्रॅक्टरचे भाडे प्रतिएकर ३ ते…

Read More

105 रुपयांचा विक्रमी दर! श्रीगोंद्याच्या मातीत पिकली "कोटींची द्राक्षं':पारगाव सुद्रिक येथील युवा शेतकरी मोहन जगताप यांची यशोगाथा

जिद्द, चिकाटी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर मातीतून सोनं उगवता येतं, हे श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील प्रगतशील शेतकरी मोहन ईश्वर जगताप यांनी सिद्ध करून दाखवले आहे. कोरोनाचे संकट, अवकाळी पावसाचा तडाखा आणि कोसळलेले बाजारभाव अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जगताप यांनी द्राक्ष शेतीतून कोटींची उलाढाल केली. सध्या संपूर्ण परिसरात त्यांच्या यशाची चर्चा…

Read More

शिरेगाव जि. प. शाळेस 15 हजारांची पुस्तके भेट‎:प्रा. कुकलारे यांचा पुढाकार, शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी होणार मदत

लासूर स्टेशन गंगापूर तालुक्यातील शिरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी बुक बँक उभारण्यात आली आहे. यासाठी शिरेगावचे भूमिपुत्र व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. प्रा. नंदकुमार कुकलारे यांनी बुक बँकसाठी १५,००० रुपयांच्या पुस्तकांची मोफत भेट दिली. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके…

Read More

डोंगरगाव येथे आयोजित मृद आरोग्य कार्यशाळेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद:शेतातील मातीचे परीक्षण करून घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन‎

सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता निर्देशांक या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर तालुका स्तरीय कार्यशाळा डोंगरगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यशाळेत मंडळ कृषी अधिकारी परीक्षित पाटील यांनी शेतकऱ्यांना सखोल व प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी माती व पाण्याचे नमुने वैज्ञानिक पद्धतीने कसे घ्यावेत, नमुना घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी,…

Read More

विद्यार्थ्यांनो, अभ्यासासोबतच कलागुण आत्मसात करा- पोलिस निरीक्षक सानप:कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात‎

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच ईतरही कलागुणांना आत्मसात करावे. पुढील काळ स्पर्धेचा, ताणतणावाचा असल्याने कला आपल्याला समाधान देते असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक रघुनाथ सानप यांनी येथे केले. कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक आर.बी. सानप तर प्रमुख पाहुणे म्हणून रामनाथ टेकाळे, कृषीतज्ञ चंद्रकांत क्षीरसागर उपस्थित होते. मान्यवरांचे प्रभारी प्राचार्य बी.सी. सरोज…

Read More

तापलेल्या ओट्यावर जाताच बालकाचे भाजले पाय:जामनेरात तापमानाचा पारा 42 अंश पार; डॉक्टरांकडून काळजी घेण्याचे आवाहन‎

वाकी रोड परिसरात कडक उन्हामुळे एका दोन वर्षीय बालकाचे पाय अक्षरशः भरताच्या वांग्यासारखे भाजले गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. नक्ष अजय पोमनानी असे या चिमुकल्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात उन्हाच्या तीव्रतेबाबत मोठी खळबळ उडाली आहे. नक्ष हा बालक शनिवारी दुपारी खेळता-खेळता विना चप्पल घराबाहेर ओट्यावर गेला. दुपारच्या प्रखर उन्हामुळे तापलेल्या…

Read More

107 कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण स्थगित:घाेटी टाेलनाक्यावर नवीन कंत्राटदार नेमेपर्यंत नोकरी कायम ठेवण्याचे आश्वासन‎

मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टोलनाक्यावरील कार्यरत असणाऱ्या १०७ स्थानिक कामगारांना कमी केल्यानंतर या कामगारांनी सुरू केलेले साखळी उपोषण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा इगतपुरी नगरपरिषदेचे गटनेते फिरोज पठाण यांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. घोटी टोलनाक्यावर नवीन कंत्राटदार येईपर्यंत सध्याचेच कामगार कायम ठेवण्याचे आश्वासन मिळाल्याने कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. घोटी येथील टोलनाका इगतपुरी एक्स्प्रेस…

Read More

सुख आणि दुःखाच्या प्रवाहामध्ये जो समाधान मानतो तोच जीवनात सुखी:ठाणगावमध्ये कथाकार संतोष महाराज जाधव यांचे निरूपण‎

सुख आणि दुःखाच्या प्रवाहात जो व्यक्ती समाधान मानतो, तोच जीवनात खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो, असे निरुपण कथाकार संतोष जाधव यांनी केले. येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रातर्फे आयोजित श्री स्वामी चरित्र कथेच्या कार्यक्रमात ते बोलत हो . पुढे बोलताना कथाकार जाधव यांनी प्रत्येकाला आयुष्यात चांगल्या-वाईट काळाचा सामना करावाच लागतो. मात्र, चांगले दिवस…

Read More