![]()
एका नामांकित कंपनीच्या ब्रॅण्डचा गैरवापर करून बोगस उडीद बियाणे बाजारात विक्रीसाठी आणून शासन व शेतकऱ्यांची दिशाभूल, फसवणूक व आर्थिक नुकसान केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी रत्नाकर रघुनाथ कोले यास अटक करण्यात बार्शी शहर पोलीसांना अपयश आले आहे. घटनेला १० दिवस उलटले तरी पोलीसांना अदयाप त्याचा ठावठिकाणा सापडलेला नाही हे विशेष. खरीप हंगाम जवळ आला की शेतकरी हंगामाच्या तयारीला लागलेला असतो. ‘शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे म्हटले जाते. अलिकडील काळात शेतकरी आधुनिकतेकडे वळला आहे. चांगले उत्पादन मिळावे यासाठी बी-बियाणे खरेदी करताना अधिकची किंमत मोजावी लागली तरी कृषी विदयापीठांनी विकसीत केलेले, उगवणक्षमता तपासलेले, बीजप्रक्रिया केलेले व नामांकित कंपन्यांनी बाजारात आणलेले वाण घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. अगदी घरातील दागिने गहाण टाकून, उधार-उसनवारी करून तो हंगामाची तयारी करतो कारण त्यावर त्याचे वर्षभरातचे आर्थिक गणित अवलंबून असते. परंतु, याच काळात नामांकित कंपन्यांच्या वाणांची हुबेहुब नक्कल करून शेतकऱ्यांची फसवणूक करून आपल्या काळया कृत्यांनी घरे भरणारे भामटे टपून असतात. बार्शी शहर व अक्कलकोट शहरात नुकताच अशा काळ्या कृत्याचा भांडाफोड झाला. शासनाने बियाणे विक्री केंद्र तपासणी, बियाणे नमुने काढणे, तपासणीसाठी पाठविणे, विक्री बंद आदेश देणे यासाठी बियाणे निरीक्षक नेमले आहेत. बार्शी शहर व तालुक्यात आलेल्या बोगस बियाण्यांची खबर कृषी विभागाला अगोदर लागायला हवी होती. परंतु, तक्रार आल्यानंतर कृषी विभाग कारवाईसाठी सरसावला व बोगस बियाणे जप्त करून रत्नाकर कोलेवर गुन्हा दाखल केला. अक्कलकोट मध्येही कृषी विभागाने शहरातील संत हरळय्या शॉपींग सेंटर कांदा बझार येथील आबा कृषी सेवा केंद्राची तपासणी करून सुमारे ८ लाख ४६ हजार रूपये किंमतीचे बोगस उडीद बियाणे जप्त केले. या दुकानचा तुकाराम मोरे याने रत्नाकर कोले, स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र शेळगांव याचेकडून हे बियाणे खरेदी केले होते. याप्रकरणी तुकाराम मोरे व रत्नाकर कोले याच्यावर गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी रत्नाकर कोले याचे कृत्य शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणारे, बोगस बियाण्यामुळे उत्पादन व गुणवत्तेवर फरक पडून त्यांच्या एकूण उत्पन्नावर घाला घालून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे असे गंभीर परिणाम करणारे आहे. कोले याला लवकर अटक केले तर त्याने आणखी किती प्रकारचे बोगस बियाणे बनविले आहे? ते कोठे वितरीत केले आहे, याचा हंगाम सुरू होण्याच्या अगोदर छडा लागणे गरजेचे आहे. परंतु, १० दिवस उलटले तरी बार्शी शहर पोलीसांना रत्नाकर कोले याला अटक करण्यात अपयश आले आहे. त्यावरून शहर पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारीवरून कृषी विभागाने बार्शी शहरातील कासारवाडी रोड पवार प्लॉट येथील स्वराज्य कॉलनी येथे रत्नाकर कोले याने भाडेतत्वावर घेतलेल्या गाळयातील व विक्री केलेले असे सुमारे साडेसात लाख रूपयांचे बोगस उडीद बियाणे जप्त केले व याप्रकरणी प्रोपायटर रत्नाकर रघुनाथ कोले याच्यावर बार्शी शहरात गुन्हा दाखल केला. तक्रारीनंतरच कृषी विभाग सरसावला अक्कलकोटमधील कारवाई बार्शीतील कारवाईत गुन्हा
Source link
बोगस उडीद बियाणे घोटाळ्यातील आरोपी आठवड्यानंतरही गायबच:" कृषी''च्या भूमिकेबद्दलही संशय, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह