Headlines

ठाण्यात टायर गोदामाला भीषण आग:धुराचे लोट पाहून नागरिकांची धावपळ; आगीचे कारण अस्पष्ट, जीवितहानी नाही




ठाणे जिल्ह्यातील मुंब्रालगतच्या शिलफाटा परिसरात आज एका टायर गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून दूरवरूनही धुराचे प्रचंड लोट दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिलफाटा परिसरातील टायर साठवणूक गोदामात अचानक आग लागली. टायर आणि ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने वेगाने संपूर्ण गोदामाला विळखा घातला. घटनेनंतर परिसरात अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी युद्धपातळीवर बचाव आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. धुराचे दाट लोट आणि उष्णतेमुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागत आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र गोदामातील साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जयपूरमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग, 3 ठार जयपूरमधील खोह नागोरियान परिसरात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात मंगळवारी सकाळी 11 वाजता भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 5 मजूर गंभीर जखमी झाले. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. जखमींमध्ये समावेश असलेल्या आजीम खान, नासीर खान, समीर खान, बिलाल, अब्दुल वाहिद यांना एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालय सूत्रांनुसार, बहुतांश जण 90 टक्क्यांपर्यंत भाजले आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *