![]()
मृग नक्षत्र उजाडूनही कडक उन्हाची तीव्रता कायम असल्याने नागरिक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशातच सोमवारी ८ जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तिवसा तालुक्यातील वरखेड, उंबरखेड आणि भारसवाडी परिसरात अचानक आलेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने प्रचंड थैमान घातले. या वादळाचा सर्वाधिक फटका उंबरखेड आणि भारसवाडी गावांना बसला असून, शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील छप्परे उडाल्याने गरिबांचा संसार उघड्यावर आला आहे. सोमवारी दुपारी झालेल्या या जोरदार वादळामुळे उंबरखेड येथील शेतकरी कुंदन आनंद कळंबे यांच्या संत्रा बागेचे अतोनात नुकसान झाले. त्यांच्या बागेतील भरघोस उत्पादन देणारी तब्बल ७४ संत्रा झाडे मुळासकट उन्मळून पडली. झाडांवर आलेली संत्रा फळेही उर्वरित,पान.४ टीनपत्रे सुमारे १०० मी. अंतरावर जाऊन पडली उंबरखेड गावामध्ये आलेल्या या वादळाची तीव्रता एवढी भीषण होती की, गावांमधील अनेक घरांवरील आणि गुरांच्या गोठ्यांवरील टीनपत्रे उडून १०० मी. दूर जाऊन पडली. अचानक छप्परे उडाल्यामुळे अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला असून घरात ठेवलेले अन्नधान्य व साहित्याचे नुकसान झाले आहे. वादळामुळे गावातील अनेक विद्युत पोल वाकले तर काही ठिकाणी उन्मळून पडले.
Source link
घरांची छप्परे उडाली, संत्रा बागांचे अतोनात नुकसान,:उंबरखेड, भारसवाडीत वादळी वाऱ्याचा बसला तडाखा, शेतकरी आणि ग्रामस्थ झाले हवालदिल