Headlines

शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी खंबीरपणे शिक्षकांच्या पाठीशी राहीन:आदर्श शिक्षक, शाळा पुरस्कार वितरणप्रसंगी माजी आ. सावंत यांचे प्रतिपादन‎



“शिक्षण हे सर्व विकासाचे मूळ आहे. समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यामुळे त्यांच्या रास्त मागण्यांसाठी आणि हक्कासाठी लढणे ही आपली जबाबदारी आहे. जुनी पेन्शन योजना, टीईटी सक्ती आणि टप्पा अनुदान यासारख्या प्रलंबित प्रश्नांवर मार्ग काढण्यासा

.

​या वेळी माजी आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले, मी आमदार असताना शिक्षण क्षेत्रातील असंख्य जटील प्रश्न लोकशाही व प्रशासकीय मार्गाने शासन दरबारी लावून धरले होते. चिकाटीमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हजारो शिक्षकांच्या विविध समस्या मार्गी लागल्या होत्या. या वेळी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पतसंस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमान लक्ष्मणराव पवार विद्यालय रोपळे, श्री. गणेश विद्यालय पिंपळनेर, नवभारत विद्यालय दारफळ, संभाजीराव चव्हाण विद्यालय विठ्ठलवाडी, जय जगदंब विद्यालय ढवळस, बबनराव शिंदे विद्यालय बैरागवाडी

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष द्यावे या वेळी सावंत म्हणाले, “शिक्षण क्षेत्रातील सध्याच्या अडचणींमुळे शिक्षकांचे मनोबल कमी होता कामा नये. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करावे. शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी मी केवळ आमदार असतानाच नव्हे, तर कायमच शिक्षक बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शासनाशी चर्चा करून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच अग्रभागी असेन.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *