शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी नागपूरला हिंदुत्वाची राजधानी म्हटले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याबद्दल आदर असल्याने त्यांना ‘रामरक्षा पठण’ कार्यक्रमाचे निमंत्रण देणे आपले कर्तव्य असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. नागपूर
.
राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रामभक्त आणि कारसेवक म्हणून या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. हे काही लग्नाचे आमंत्रण नसून, मुख्यमंत्री संपूर्ण राज्याचे असतात. त्यामुळे अशा कार्यक्रमाला राजकीय विरोध करणे मूर्खपणाचे आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः नागपुरात येऊन या कार्यक्रमात सहभागी होणार असून, विदर्भातून शेकडो रामभक्त उपस्थित राहतील. सरसंघचालकांना उपस्थित राहणे शक्य नसल्यास त्यांनी आपला प्रतिनिधी पाठवावा, अशी विनंतीही राऊत यांनी केली.
यावेळी राऊत यांनी भाजपवरही निशाणा साधला. केंद्रात मोठे फेरबदल झाल्यास देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावले जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला. अशा स्थितीत राज्यातील भाजपमधील एखादा वरिष्ठ नेता मुख्यमंत्री होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
राऊत यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारवर टीका केली. गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणावर पंतप्रधानांनी ठोस पावले उचलावीत, असे ते म्हणाले. सरकारची संवेदनशीलता संपल्याचा आरोपही त्यांनी केला.
जयंत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर बोलताना राऊत यांनी, राजकीय नेत्यांच्या अशा भेटी म्हणजे पक्षांतर नव्हे, असे स्पष्ट केले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाचा संदर्भ देत, ट्रम्प यांनी भारतीय मतांचा अभ्यास केल्यास त्यांना पंतप्रधान मोदींची खरी ताकद समजेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
हे ही वाचा…
उद्धव ठाकरेंचे रामरक्षा पठण केवळ ढोंग:अयोध्या निमंत्रण नाकारले, आता जनाधार गेल्यावर रामाची आठवण; बावनकुळेंची टीका

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उबाठा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नागपूर येथील उद्धव ठाकरे यांचे ‘रामरक्षा पठण’ म्हणजे निव्वळ ढोंगीपणा असल्याचे बावनकुळे म्हणाले. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. सविस्तर वाचा…