मुंबईतील आंदोलनादरम्यान विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप होत आहे, यावर पोलिसांनी बोलले पाहिजे आणि त्याच्यावर काय कारवाई करणार हे सांगितले पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्यासारखे असंवेदनशील नाहीत. अमित शहा जसे गुंडाप्रमाणे वागतात तसे देवेंद्र
.
संदीप देशपांडे म्हणाले की, मुंबई पोलिसांनी काय झाले याची चौकशी केली पाहिजे. मुंबई पोलिस असंवेदनशील नाहीत ते असे का वागत आहेत काय माहिती? कालही आम्ही सही मोहिम राबवली तिथे येत याला पकड त्याला पकडण्याचे काम सुरू होते. केंद्र सरकारने एकदा देशात लोकशाही आहे का हुकुमशाही आहे हे सांगितले पाहिजे म्हणजे आम्हाला कसे डील करायचे ते समजते.
..त्या पद्धतीने आंदोलन करू
संदीप देशपांडे म्हणाले की, लोकशाही आहे म्हणून आम्ही सर्व जण लोकशाहीच्या मार्गाने आंदोलने करत आहोत. केंद्र सरकारने जर सांगितले की लोकशाही संपली आणि हुकुमशाही सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टसुद्धा तुमचे ऐकणार नाही, तुमच्यावर काय अत्याचार झाला हे ऐकूण घेण्यासाठी कोर्टाला वेळ नाही. मग आम्हाला लक्षात येईल की लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करायचे की भगतसिंह यांच्या मार्गाने आंदोलन करायचे.
प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे
संदीप देशपांडे म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. जयदीप धनखड यांचा राजीनामा सरकारने का घेतला हे लोकांना समजले का? कारण ते तुमच्या अंगाशी आले होते म्हणून तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला. तर प्रधान देशाच्या अंगाशी आले आहेत त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही. धनखड यांचा राजीनामा का घेतला? याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले पाहिजे.
मोदींनी लोकं काय म्हणतात ऐकावं
संदीप देशपांडे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी घराबाहेर पडले पाहिजे. लोकं त्यांच्याबद्दल काय म्हणतात हे ऐकले पाहिजे. किमान मोबाईलवर तरी लोकं काय म्हणतात हे त्यांनी पाहिले पाहिजे. जमावबंदी म्हणून पोरांना उचलण्याचे काम सुरू आहे. आता काय पोरांनी कुठे बसायचे पण नाही का? पोलिसांपक्षा पोरं खूप पुढे आहेत. पोलिसांना पोरं काय करतील कळणार सुद्धा नाही.
विद्यार्थी तर पाकिस्तानी नाहीत
संदीप देशपांडे म्हणाले की, पाकिस्तानी लोकांनी जर आंदोलनाविषयी ट्विट केले तर त्यामध्ये मुलांचा काय दोष आहे. ते पाकिस्तानी आहेत का? तुम्ही जसे 40 पैसे पोस्ट देतात तसे मुलांना कोणी पैसे थोडी पुरवत आहे. हे प्रकरण सरकारच्या हाताबाहेर गेले आहे.
हे ही वृत्त वाचा
मुंबईतील आंदोलनादरम्यान विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप:व्हायरल व्हिडिओवरून विरोधक आक्रमक, पोलिसावर कारवाईची मागणी

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात झालेल्या विविध आंदोलनांदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. दादरमधील आंदोलनावेळी एका विद्यार्थिनीला पकडताना सिव्हिल ड्रेसमधील पोलिस कर्मचाऱ्याने गैरवर्तन केल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. या व्हिडिओच्या आधारे संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. वाचा सविस्तर