Headlines

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर भाकपची मागणी




अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (NICU) लागलेल्या आगीप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) केली आहे. भाकपच्या अमरावती महानगर कौन्सिलने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन ही मागणी केली. २४ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास नवजात शिशु कक्षामध्ये आग लागली होती. या दुर्घटनेत तीन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला, तर सहा बालके गंभीर जखमी झाली. जखमींपैकी एका बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासनाच्या चुकांमुळे ही घटना घडल्याचा आरोप भाकपने केला आहे. भाकपने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, दोषींची तत्काळ ओळख पटवून त्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळावा. रुग्णालयातील वीज जोडणीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पूर्वीच्या जुन्या इमारतीमधून नव्याने बांधलेल्या इमारतीमध्ये स्त्री रुग्णालय नुकतेच स्थलांतरित करण्यात आले होते. नव्याने उभारलेल्या इमारतीतच एवढी मोठी प्राणघातक दुर्घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे भाकपने नमूद केले आहे. निवेदन देताना भाकपचे नेते अशोक सोनारकर, जिल्हा सहसचिव सुनील घटाळे, तालुका सचिव निळकंठ ढोके, बांधकाम कामगार युनियनचे नंदकुमार नेतनराव आणि हॉकर्स युनियनचे गजानन दरेकर उर्फ भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते. भाकपने या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. नवीन इमारतीत वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे होते का, इमारतीमध्ये आवश्यक त्या सर्व सुरक्षेच्या बाबी आणि साहित्य बसवण्याचे नियम पाळले गेले होते का, तसेच कंत्राटदाराने बांधकामाचे नियम व करारातील अटी योग्य प्रकारे पाळल्या होत्या का, असे प्रश्न भाकपने विचारले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *