Headlines

Admin

उमरीत गोठ्याला आग; दीड लाखाचे साहित्य खाक:सीसीटीव्ही फुटेजमुळे संशयित आरोपी कैद, गुन्हा दाखल

दर्यापूर तालुक्यातील उमरी (ममदाबाद) येथे सोमवारी मध्यरात्री एका गोठ्याला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत सुमारे दीड लाख रुपयांचे शेती साहित्य जळून खाक झाले. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी रोहन विश्वास वडतकर (वय २९) आणि त्यांचे चुलत भाऊ विकास सुरेश वडतकर यांनी रहिमापूर पोलीस ठाण्यात…

Read More

शिरजगावात वीज कर्मचाऱ्याविरोधात संताप:8 दिवसांत बदली न केल्यास आंदोलनाचा इशारा, ग्रामस्थांचे सहायक अभियंतांना निवेदन

तिवसा तालुक्यातील शिरजगाव येथील महावितरणचे वीजतंत्री (लाईनमन) भूषण गाडगे यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या आठ दिवसांत त्यांची बदली न झाल्यास ‘धडक आंदोलन’ करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, संबंधित लाईनमन अनेक दिवसांपासून मुख्यालयी राहत नाहीत. वीज बिघाड झाल्यास ते फोन उचलत नाहीत किंवा त्यांचे फोन बंद असतात. यामुळे तांत्रिक अडचणी…

Read More

बेमुदत संपामुळे नागरिकांपुढील अडचणी वाढल्या:महसूलचे 100%, आरोग्य विभागाचे 70% कर्मचारी संपावर; दाखले, रुग्णसेवा प्रभावित

अमरावती: जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांनी मंगळवार, २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे महसूल विभागाचे १०० टक्के तर आरोग्य विभागाचे ७० टक्के कर्मचारी कामावर नाहीत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी तहसील कार्यालयातून दिले जाणारे दाखले मिळू शकले नाहीत. दुसरीकडे, आरोग्य विभागातील…

Read More

महसूल कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी संपावर:संभाजीनगरमध्ये 835, मराठवाड्यात 5 हजार 620 कर्मचारी सहभागी

राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार, २१ एप्रिलपासून राज्यव्यापी संपावर गेले आहेत. या संपामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महसूल विभागाचे ८३५ कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या या संपात राज्यातील १७ लाख कर्मचारी सहभागी झाले…

Read More

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला:वरळीतील गोंधळावरून विजय वडेट्टीवारांचा बोचरा वार, रोहित पवारांचीही टीका

वरळी येथे महायुतीच्या ‘आक्रोश मोर्चा’मुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना खरीखोटी सुनावली. या प्रकरणावरून आता विरोधकांकडून भाजपवर निशाणा साधण्यात येत आहे. “भाजपच्या फोकनाड घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा ‘इथून चालते व्हा’ हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला,” अशा बोचऱ्या शब्दांत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीकास्त्र…

Read More

पीएम व्हिजन टू आर्ट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा:युवकांमध्ये प्रचंड सृजनशीलता, नाविन्यता, कौशल्यता आणि कल्पकता – मंत्री आशिष शेलार

लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी मुंबई येथे राज्याचे संस्कृतीक कार्य मंत्री आशिष शेलार…

Read More

अमिताभ म्हणाले- परिस्थिती कशीही असो, एकट्याने लढावे लागते:म्हणाले- तुम्ही सर्वोपरी आहात आणि फक्त तुम्हीच महत्त्वाचे आहात

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ताज्या ब्लॉगमध्ये एकटेपणा आणि स्वतःच्या शक्तीला ओळखण्यावर गंभीर विचार मांडले आहेत. त्यांनी सांगितले की कठीण काळात माणसाला स्वतःच खंबीरपणे उभे राहावे लागते आणि त्याची आंतरिक शक्तीच त्याचे सर्वात मोठे शस्त्र असते. अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, जीवनात परिस्थिती कशीही असो, त्यांच्याशी लढण्यासाठी माणूस शेवटी एकटाच असतो. बिग बींच्या मते,…

Read More

बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत मोठी कारवाई:अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 32 बालविवाह रोखले, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

राज्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने ‘स्पेशल फोर्स’च्या माध्यमातून मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळवले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. बाल विवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ नुसार १८ वर्षांखालील मुलगी व २१ वर्षांखालील मुलाचा विवाह लावणे हा दंडनीय गुन्हा असून, बाल विवाह…

Read More

महायुतीच्या मोर्चामुळे वरळीत वाहतूक कोंडी:संतप्त महिलेने गिरीश महाजनांनाच झापले, मैदानात जाऊन आंदोलन करा म्हणत संताप व्यक्त

महिला आरक्षण विधेयक संमत न झाल्याच्या निषेधार्थ आज वरळीत महायुतीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मात्र, या मोर्चात एक वेगळाच पेच पाहायला मिळाला. मोर्चामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीत तासाभरापासून अडकलेल्या एका सामान्य महिलेचा संयम सुटला आणि तिने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला. “लोकांना वेठीस धरून रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा बाजूच्या मैदानात जा,” अशा…

Read More

वीजपुरवठा खंडित झाल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा:महावितरणचे ग्राहकांना आवाहन; वेळेत निराकरणासाठी ऑनलाइन पर्याय वापरा

वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा वीजबिलासंबंधी तक्रारींसाठी थेट वीज कर्मचाऱ्यांना फोन करण्याऐवजी टोल फ्री क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे. 1912, 1800-233-3435 आणि 1800-212-3435 या 24 तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकांवर तक्रारी नोंदवाव्यात, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्यासाठी महावितरणची यंत्रणा 24 तास कार्यरत असते. राज्यात सुमारे तीन कोटी…

Read More