हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे:म्हटले – स्फोटके तयार करणाऱ्या कंपन्यांतील स्फोटांत गरिबांचेच बळी जातात म्हणून सरकार उदासीन
स्फोटके तयार करणाऱ्या कंपन्यांत होणाऱ्या स्फोटांत गरिबांचेच बळी जातात. त्यामुळे सरकार अशा घटनांवर उदासीन असते, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्फोटकांच्या कंपन्यांत होणारे स्फोट व त्यावर सरकारकडून होणाऱ्या कथित कारवाईवर ताशेरे ओढले आहेत. गत काही वर्षांत स्फोटके तयार करणाऱ्या कंपन्यांत अनेक स्फोट घडले. त्यात अनेकांचे बळी गेले. पण त्यावर सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई…