चंद्रपूर जिल्ह्यातील बरंडघाट परिसरात वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू:जिल्ह्यात 23 वा बळी, वन विभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील बरंडघाट परिसरात सोमवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राजेंद्र तिमाजी भोयर (५०, रा. बरंडघाट) असे मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षातील हा २३ वा बळी ठरल्याने वन विभागाच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र भोयर हे विश्वनाथ भोयर यांच्यासोबत…