Headlines

Admin

जीवघेण्या हल्ल्यातील आरोपींना अटक न झाल्याने रस्ता रोको:माळीबाभूळगाव ग्रामस्थांचे उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन‎

माळीबाभूळगाव येथील युवकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी बुधवारी पाथर्डी–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर माळीबाभूळगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. माळीबाभूळगाव येथील रहिवासी अक्षय रमेश भडके यांच्यावर २९ मे रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात…

Read More

मृदा परीक्षण अन् सेंद्रिय शेती काळाची गरज:शिंगणापुरात घुमला आधुनिक शेतीचा संदेश, कृषीदिंडीचे नागरिकांकडून ठिकठिकाणी स्वागत, कृषी दिन उत्साहात साजरा

कृषी दिनानिमित्त ‘रावे’ कार्यक्रमांतर्गत शनैश्वर माध्यमिक विद्यालय शनिशिंगणापूर येथे विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेती, शेतकऱ्यांचे योगदान आणि शाश्वत कृषी पद्धतींबाबत जागरूकता निर्माण केली. का . यावेळी विद्यार्थ्यांनी कृषीदिंडीचे आयोजन करून कृषीविषयक घोषवाक्ये, माहितीपर फलक, शेतकरी संवाद तसेच विविध कृषी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली. या उपक्रमात कृषीकन्या भूमिका घुगे,…

Read More

मावशीच्या मुलीशी लग्न, परिणाम- मुलाला जेनेटिक आजार:सर्व हाडे वाकडी झाली, उपचारासाठी वार्षिक तब्बल 4 कोटींचा खर्च

8 वर्षांचा जावेद शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळत असताना अचानक पडला. मित्रांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो उठला नाही. तो जमिनीवर पडून कण्हू लागला. शिक्षक धावत आले, त्यांनीही त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. तो वारंवार म्हणत राहिला- माझ्या गुडघ्यात आणि कोपरात खूप दुखत आहे. पाय वाकतच नाहीत. मी उठू शकणार नाही. मी माझ्या पायांवर उभा राहू…

Read More

शालेय स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाची पंचसूत्री:महासमादेशक अनिल कुंभार यांचे आवाहन‎

विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक बळकट करण्यासाठी आरएसपी व सिव्हिल डिफेन्सचे प्रशिक्षण शालेय स्तरावर प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन राज्य महासमादेशक अनिल कुंभार यांनी केले. जळगाव येथील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित रस्ता सुरक्षा दल (आरएसपी) आणि नागरी संरक्षण (सिव्हिल डिफेन्स) विषयावरील एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. रस्ता सुरक्षा…

Read More

Bollywoods Rajkumars Bold Comments on Bappi Lahiris Jewellery & Amitabhs Style

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक “हा कोण आहे?” सलमान खानचा प्रश्न ऐकताच उत्तर आले- “जानी…, तुझ्या अब्बांना जाऊन विचार, आम्ही कोण आहोत.” हेच होते राजकुमार. ते अभिनेते, जे फ्लॉप चित्रपटानंतरही आपली फी वाढवत असत. म्हणत असत- ‘माझा चित्रपट चालो न चालो, मी फेल झालो नाही. कधी बप्पी लाहिरींच्या दागिने घालण्याची जाहीरपणे खिल्ली उडवत असत, तर कधी…

Read More

दुर्घटना:मुंबईत मॅनहोलमध्ये पडल्याने वृद्धाचा मृत्यू, उघड्या मॅनहोलप्रकरणी मुंबई मनपाच्या 4 अधिकाऱ्यांचे निलंबन

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसराला गुरुवारी अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, राज्यातील हा पावसाचा प्रभाव आगामी ७ जुलैपर्यंत कायम राहणार आहे. दरम्यान, मुंबईत गुरुवारी सकाळपर्यंत २४ तासांत ९ इंचांहून अधिक पावसाची नोंद झाली. साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी बृहन्मुंबई…

Read More

एमपी-यूपी, बिहारमध्ये वीज कोसळून 6 ठार:मुजफ्फरनगरात 7 फूट रस्ता खचला; उत्तराखंडात भूस्खलन, रस्ते बंद, केदारनाथ यात्रा रोखली

मध्य प्रदेशात गुरुवारी भोपाळसह 11 जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. सतना आणि झाबुआमध्ये पावसात वीज कोसळून 2 लोकांचा मृत्यू झाला. गर्ल्स स्कूल परिसरात झाड कोसळून 2 तरुणी जखमी झाल्या. दामोहच्या अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. यूपीच्या शामलीमध्ये दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवेवर पहिल्याच पावसात खड्डे पडले. मुझफ्फरनगरमध्ये जोरदार पावसात बाजारात रस्ता सात फूट खचला. सोनभद्रमध्ये नाल्याच्या जोरदार प्रवाहात आई…

Read More

चारी नसल्याने सांडपाणी तुंबले; आडगाव बुद्रुक येथे ग्रामस्थांचे पाण्यात आंदोलन:ग्रामस्थ संतप्त; प्रशासनाने दखल घेताच तात्काळ कामाला सुरुवात‎

तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आडगाव ते मालोदेवाडीदरम्यान रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र, आडगाव खुर्द भागात या रस्त्याची उंची प्रमाणापेक्षा जास्त वाढल्याने गावातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, गावातील मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी तुंबल्याने नागरिकांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे…

Read More

बोरटेंभेजवळ महामार्ग खचला; अपघाताचा धोका वाढला:इगतपुरी तालुक्यातील घटना;‎त्वरित दुरुस्तीची मागणी‎

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील इगतपुरीजवळील बोरटेंभे परिसरात रस्ता खचून महामार्गाच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसमोर अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला असून परिसरात चिंतेचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने खड्ड्याभोवती तातडीने बॅरिकेड्स उभारण्यात आले असून वाहनचालकांना सावधगिरीचा…

Read More

शेतकरी बांधवांनी शेती आधुनिक पद्धतीने करावी- सभापती बोंबले:पुढील वर्षांपासून 10 शेतकऱ्यांचा पंचायत समितीतर्फे गौरव‎

बदलत्या हवामानामुळे शेतीपुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यावर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जलसंधारण, पीक नियोजन, हवामानाशी सुसंगत शेतीपद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती वैशाली बोंबले यांनी केले. त्या माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती सभागृहात आयोजित कृषी दिन कार्यक्रमात बोलत होत्या. या वेळी उपसभापती संजय लघाने,…

Read More