Headlines

Admin

दिलीप वळसे-पाटील थेट शरद पवारांच्या भेटीला:'सिल्व्हर ओक'वरुन नवे राजकीय संकेत? राष्ट्रवादीत नेमकं शिजतंय तरी काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांभोवती चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे…

Read More

मुख्यमंत्री आमच्या मागण्यांवर सकारात्मक ते प्रयत्न करतायत:…तर सरकारविरोधात लढायला पुन्हा मैदानात उतरणार, मनोज जरांगेंचा इशारा

मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घेणार असे आम्हाला प्रशासनाने सांगितले होते. त्या संदर्भात माहिती मागवण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या तरी कामे होऊ लागले आहेत. आता ते दमतील असे वाटत नाही ते काम करतीलच. काही जणांच्या घरात एकाला प्रमाणपत्र दिले दुसऱ्याला नाही हा विषय आम्ही प्रशासनाला सांगितले. काही जणांकडे पुरावे नाही,…

Read More

शिवसेनेला जेमतेम 4 जागा, त्यातही बंडखोरी:मंत्री गुलाबराव पाटलांची भाजपवर नाराजी; दुपारपर्यंत बंड थंड करण्याचे भाजपचे आश्वासन

विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीतील धुसफूस थांबण्याचे नाव घेत नाहीये. अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर झाली असली, तरी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र भाजप नेत्यांकडून शिवसेनेच्या जागांवर होणाऱ्या बंडखोरीवरून आक्रमक पवित्रा घेत भाजपला सुनावले आहे. “आम्ही गुवाहाटीला जाऊन उठाव केला नसता, तर आज काय स्थिती असती?” असा संतप्त सवाल गुलाबराव पाटील यांनी भाजपला…

Read More

मूव्ही रिव्ह्यू- पेद्दी:ओळखीच्या लढाईला दमदारपणे दाखवणारा चित्रपट, राम चरणच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अभिनय, पहिला भाग संथ, पण कथा प्रभावी

स्टार- 3.5/5 रनटाइम- 3 तास 8 मिनिटे कलाकार- राम चरण, जान्हवी कपूर, जगपति बाबू अनेकदा काही चित्रपट कथेपेक्षा त्यांच्या भावनांसाठी लक्षात ठेवले जातात. पेद्दी हा असाच एक चित्रपट आहे. ही केवळ एका खेळाडूची कथा नाही, तर अशा लोकांचा आवाज आहे ज्यांची उपस्थिती सरकारी कागदपत्रांमध्येही नोंदलेली नाही. राम चरण आणि दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांनी एका…

Read More

सन्मान मिळवण्यासाठी लोकाभिमुख कार्य महत्त्वाचे:तहसीलदार रतनव यांचे प्रतिपादन, उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्यासह तिघांना निरोप‎

“प्रशासकीय खुर्चीत काम करताना जनताभिमुख निर्णय घेतल्यास त्याचे समाधान वेगळे असते. कर्तव्य बजावताना पदापेक्षा सेवेने आनंद मिळायला हवा. अशा सन्मानाची सेवापूर्ती खूप कमी लोकांच्या आयुष्यात येते आणि हा सन्मान मिळवण्यासाठी लोकाभिमुख कार्य पार पाडणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कर्जतचे तहसीलदार रवी सतवन यांनी केले. कर्जत पोलीस विभागातर्फे आयोजित सेवापूर्ती सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कर्जतचे…

Read More

आता जिल्हास्तरीय बहुमानासाठी सज्ज‎:"मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात' दहिगाव-शे ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम

शेवगाव राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पार पडलेल्या मूल्यमापन प्रक्रियेत शेवगाव तालुक्यातील दहिगाव शे. ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामपंचायतीने राबवलेली विविध विकासकामे, स्वच्छता मोहीम, लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे हा बहुमान मिळाला आहे. तालुका स्तरावरील या यशानंतर आता या गावाची निवड जिल्हास्तरीय…

Read More

पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

घातक शस्त्रांचा वापर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि सराईत गुन्हेगार सुभाष कोंडीबा चौधरी (रा. चौधरी मळा, काष्टी, ता. श्रीगोंदे) याला अखेर श्रीगोंदे पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत फरार होता. श्रीगोंदे पोलीस ठाण्यात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दाखल झालेल्या एका गंभीर गुन्ह्यापासून सुभाष चौधरी अटक…

Read More

जोर्वेत 411 नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा:प्रवराकाठच्या जोर्वे संस्कृतीचा जागतिक पातळीवर मोठा गौरव- माजी मंत्री थोरात‎

एक जून हा अनेकांचा अधिकृत वाढदिवस असतो; परंतु संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक जोर्वे गावाने एकत्र येत तब्बल ४११ महिला व नागरिकांचा फेटे बांधून, पारंपारिक पद्धतीने सामूहिक वाढदिवस साजरा करण्याचा एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. “हा उपक्रम आपली समृद्ध परंपरा जपणारा असून जोर्वे संस्कृतीचा जागतिक पातळीवर मोठा गौरव आहे,” असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी…

Read More

अहंकार त्याग केल्याशिवाय भगवंत कधी भेटणार नाही- रेवतीनंदन दास:इस्कॉनतर्फे आयोजित श्रीमद्भागवत कथा निरूपण सोहळ्याची सांगता‎

श्रीमद् भागवत कथेची सांगता होते, तेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्ण आपल्या जवळ आलेले असतात. आज घरात होम थिएटर, शाही सोफा सेट यांसारखी अत्याधुनिक सुखाची साधने उपलब्ध असूनही माणसाचे जीवन ‘अपसेट’ आहे. ताजमहालसारखा देखणा बंगला उभारला, तरीही मनात घमेंड आणि मीपणा असेल, तर तिथे श्रीकृष्ण कधीच येत नाहीत. आपण जेव्हा बासरीसारखे आतून पोकळ (अहंकाररहित) आणि खुले होऊ,…

Read More

संतांचे विचार साहित्याच्या माध्यमातून पुढे नेण्याचे कार्य करावे- प्रदीप निफाडकर

“ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ आणि चोखोबा या संतांनी अभंग-ओव्यांच्या माध्यमातून जनसामान्यांचे विचार मांडले. तोच भारतीयत्वाच्या मूळ अस्मितेशी जुळणारा विचार पुढे नेण्याचे कार्य आज साहित्याच्या माध्यमातून करायचे आहे,” असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नवनिर्वाचित कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी व्यक्त केले. इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स (नवी दिल्ली) व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे महामंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार…

Read More