मंत्रिमंडळ नोटवरून नवा वाद:कर्जमाफीसाठी कमी निधी लागावा म्हणूनच अटी घातल्या- रोहित पवार; वडेट्टीवार म्हणाले, 'कर्जमाफी फसवी'
राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्जमाफी योजनेतील अटी-शर्तींवरून सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या रोहित पवार यांनी आता थेट मंत्रिमंडळ बैठकीतील नोटच पुढे करत सरकारचा “फसवा चेहरा” उघड झाल्याचा आरोप केला आहे. महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी आहे. शेतकऱ्यांना सरसकट…