Headlines

मंत्रिमंडळ नोटवरून नवा वाद:कर्जमाफीसाठी कमी निधी लागावा म्हणूनच अटी घातल्या- रोहित पवार; वडेट्टीवार म्हणाले, 'कर्जमाफी फसवी'

राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्जमाफी योजनेतील अटी-शर्तींवरून सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या रोहित पवार यांनी आता थेट मंत्रिमंडळ बैठकीतील नोटच पुढे करत सरकारचा “फसवा चेहरा” उघड झाल्याचा आरोप केला आहे. महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी आहे. शेतकऱ्यांना सरसकट…

Read More

javed jaffrey wife habiba fraud case update bmc assistant commissioner suspended

मुंबई5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेते जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांची तब्बल 16 कोटी 24 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते…

Read More

शर्मिला ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे कुटुंब एकत्र:तेजस, रश्मी ठाकरे ‘शिवतीर्थ’वर दाखल; उद्धव ठाकरे येण्याची शक्यता

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ‘शिवतीर्थ’वर राजकीय आणि कौटुंबिक भेटीगाठींची लगबग पाहायला मिळत आहे. शुभेच्छा देण्यासाठी रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे तसेच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ‘शिवतीर्थ’वर भेट दिली. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती असल्याने राजकीय वर्तुळातही या भेटींची चर्चा रंगली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील…

Read More

पालघर हादरले!:दोन सख्ख्या बहिणींना जाळ्यात ओढून अत्याचार; आक्षेपार्ह व्हिडिओच्या बळावर ब्लॅकमेलिंग, आरोपी फरार

पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरातून नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणींच्या तक्रारीनंतर डहाणू पोलिसांनी नराधम आरोपीविरुद्ध 1 जून रोजी डहाणू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याचा…

Read More

सोया ढेप आयातीमुळे शेतकऱ्यांना ₹700 नुकसानीचा धोका:विजय जावंधियांचे पंतप्रधानांना पत्र, आयात थांबवण्याची मागणी

केंद्र सरकारने १५ लाख टन सोया ढेप आयात करण्यास मंजुरी दिल्यास देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२६-२७ च्या खरीप हंगामात प्रति क्विंटल ७०० रुपयांपेक्षा जास्त नुकसान सोसावे लागेल, अशी भीती ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही आयात तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. जावंधिया यांनी कृषी…

Read More

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:महिन्यात दुसरी दिल्लीवारी; शिवसेनेची बैठक, खासदारांशी खलबतं करणार, नाना चर्चांना उधाण

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले असून, त्यांच्या या वारीमुळे मुंबई ते दिल्ली अशा दोन्ही स्तरांवर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने शिंदे दिल्लीत दाखल झाले असले, तरी या दौऱ्यामागे…

Read More

मोदी येथे गेल्या वर्षी दूषित पाण्यामुळे दोघांचा जीव गेला:यंदाही तशीच स्थिती; आणखी जीव गेल्यावर जाग येणार का ? नागरिकांचा सवाल

मागील वर्षी मोदी परिसरातील जगजीवनराम झोपडपट्टी या ठिकाणी दूषित पाण्यामुळे दोन शाळेतील मुलींचा मृत्यू झाला होता. याच परिसरातील देवी मंदिराच्या परिसरात पुन्हा दूषित पाण्याचा विळखा पडला. ज्या दिवशी नळाला पाणी येते, त्या दिवशी ड्रेनेजचे चेंबर तुंबून सर्व घाण पाणी नागरिकांच्या घरात येत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार सांगूनसुद्धा महापालिका लक्ष देत नाही….

Read More

घटनाबाह्य पद्धतीने आरक्षणात उपवर्गीकरण लादता येणार नाही:अनुसूचित जाती उपवर्गीकरणावरील परिसंवादात उमटला सूर‎, 30 जूनला निषेध मोर्चा

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. घटनाबाह्य पद्धतीने उपवर्गीकरण लादता येणार नाही, असे म्हणत उपवर्गीकरणाला विरोध करण्यात आला. राज्यकर्त्यांनी उपवर्गीकरण लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील चर्मकार समाज हा धर्मांतराच्या दिशेने वाटचाल करण्याच्या मानसिकतेमध्ये असून २०३० पर्यंत बहुतांशी चर्मकार समाज हा बौद्ध धर्म स्वीकारेल, असे वक्तव्य राष्ट्रीय चर्मकार संघाचे…

Read More

राज्यसभेची जागा हातची गेली, मंत्रिपदही अधांतरी:छगन भुजबळांच्या ‘एका अटी’मुळे महायुतीतील समीकरणे कशी बदलली? पडद्यामागील राजकारण!

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा उमेदवारीचा विषय चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेत पाठवले जाईल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, शेवटच्या क्षणी चित्र बदलले आणि उमेदवारी राजेंद्र जैन यांच्या गळ्यात पडली. या घडामोडीमागे केवळ उमेदवारीचा प्रश्न नसून, भुजबळांनी घातलेली एक राजकीय अट आणि महायुतीतील सत्तासमीकरणे असल्याची चर्चा…

Read More

इंडिया आघाडी विखुरलेली नाही:दिल्लीतील बैठकीत 23 पक्ष एकत्र येणार, आगामी निवडणुकांवर होणार चर्चा- संजय राऊत

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असून आगामी राजकीय रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक तयारीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की, आजची बैठक अत्यंत महत्त्वाची असून…

Read More