Headlines

खाकीचे स्वप्न 2 मार्कांनी हुकले; तरुणीची आत्महत्या:नाशिकच्या घोटीमधील घटना, मिळाले 125 गुण

पोलिस भरतीत अवघ्या दोन गुणांनी अपयश आल्याने एका २० वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रतीक्षा शिवाजी सुरुडे (२०, रा. उभाडे, ता. इगतपुरी) असे या मृत तरुणीचे नाव आहे. वर्दी मिळवून घरची परिस्थिती सुधारण्याचे तिचे स्वप्न होते, मात्र नियतीने दोन गुणांच्या अंतराने घात केला. प्रतीक्षा ही गेल्या अनेक…

Read More

अमरावतीचा पारा 43 अंशांवर, सात वर्षांतील उच्चांक:अवकाळीनंतर अचानक वाढला उन्हाचा तडाखा, नागरिक हैराण

गेल्या दोन दिवसांपासून अमरावती शहराचे तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. सोमवारी (१३ एप्रिल) ४३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक आहे.गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र, या आठवड्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढल्याने दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. जलविज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी…

Read More

प्रतिभा चाकणकरांनी खोटे बोलून हात झटकले:KYC केलेले खाते बनावट कसे असू शकते? दमानियांचा सवाल; कॉल रेकॉर्ड्सचा डाटा सादर

नाशिकच्या बहुचर्चित अशोक खरात फसवणूक प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना चाकणकर यांनी “खाती बनावट असून सह्या देखील खोट्या आहेत” असा दावा केला होता. प्रतिभा चाकणकर यांच्या दाव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. “KYC केलेले खाते कधीही बनावट असू शकत नाही,” असे सांगत दमानिया…

Read More

रेशन दुकानदारांचा धान्य उचलण्यास नकार:परवाने निलंबित केल्याच्या निषेधार्थ निर्णय, अमरावतीतील 17 लाख नागरिकांच्या स्वस्त धान्याचा प्रश्न गंभीर

अमरावती जिल्ह्यात मे महिन्यापासून रेशन दुकानदारांनी स्वस्त धान्याची उचल व वितरण करण्यास नकार दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे १७ लाख नागरिकांच्या स्वस्त धान्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यात अंत्योदय योजनेचे १ लाख २९ हजार ४६६ कार्डधारक आणि प्राधान्य गटातील १५ लाख ५६ हजार १६ लाभार्थी समाविष्ट आहेत. गेल्या पंधरा दिवसांत जिल्हा प्रशासनाने काही रेशन दुकानदारांचे…

Read More

उष्णतेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज:नागपुरात उभारणार राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था – मंत्री गिरीश महाजन

वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये गारपीट तसेच वर्षभर विविध ठिकाणी पावसाच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. उष्णतेसारख्या आपत्तीचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी ठोस प्रणाली निर्माण केली जात असून यासाठी मानक कार्यपद्धती (SOP) तयार करण्यात आली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली….

Read More

वीजग्राहकांना बनावट मेसेज, सायबर भामट्यांकडून फसवणूक:वीजपुरवठा खंडित होण्याच्या धमक्या; महावितरणचे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

सायबर भामट्यांकडून वीजग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणने ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून आलेल्या फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. वीजग्राहकांना ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, त्वरित दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’ अशा…

Read More

इन्व्हेस्टिगेशन:भोंदू खरातची शक्तिपीठ महामार्गावर सोलापुरात 2.5 कोटींची जमीन खरेदी; कळमण गावात 11 एकरांहून जास्त भूखंड

महिलांवर लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि फसवणुकीचे तब्बल १७ गुन्हे दाखल असलेला भोंदूबाबा अशोक खरात याचे आता थेट ‘शक्तीपीठ महामार्ग’ कनेक्शन समोर आले. नियोजित बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गावरच खरातने सुमारे अडीच काेटींची जमीन खरेदी करून ठेवल्याचे भूसंपादनाच्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. खरातने साेलापूर जिल्ह्यातील कळमण गावात ज्या ठिकाणी जमीन खरेदी केली. त्याच ठिकाणाहून हा महामार्ग जाणार आहे….

Read More

कर्जमाफीचे काय झाले; आमदार ‎सत्तारांचा राज्य सरकारला प्रश्न‎:मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही स्पष्टीकरण नसल्याचा दावा‎

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च‎‎रोजी कर्ज भरले‎‎नसल्यामुळे आता ते‎‎थकबाकीदार झाले आहेत.‎‎ कर्जमाफीची तारीख‎‎ जून ऐवजी सप्टेंबर ‎‎ठेवल्यामुळे ‎मराठवाड्यातील १० लाख अतिवृष्टग्रस्त ‎शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार‎ असल्याची माहिती माजी कृषीमंत्री अब्दुल‎ सत्तार यांनी दिली. जाहीरनाम्यात दिलेल्या‎ कर्जमाफीच्या वचनाचे काय झाले, असा प्रश्न ‎शेतकरी विचारत असल्याचेही त्यांनी‎ सांगितले.‎ कर्जमाफीबाबत अद्याप निकषच स्पष्ट‎करण्यात आले नाहीत. त्यामुळे…

Read More

यंदा 'सरासरीपेक्षा कमी' पावसाची शक्यता:भारतीय हवामान विभागाने जारी केला पहिला अधिकृत अंदाज, मे महिन्यात दुसरा अंदाज जाहीर होणार

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसह संपूर्ण अर्थव्यवस्थेचे लक्ष लागून राहिलेल्या नैऋत्य मान्सून २०२६ चा पहिला अधिकृत अंदाज भारतीय हवामान विभागाने आज जाहीर केला आहे. यावर्षी देशात सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, हे प्रमाण ‘सामान्य पेक्षा कमी’ या श्रेणीत येते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा…

Read More

रांजणगाव महागणपती मंदिर 3 महिने बंद राहणार:जतन व संवर्धन कामांमुळे 15 एप्रिल ते 31जुलै 2026 पर्यंत भाविकांना प्रवेश नाही

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथे सुरू असलेल्या जतन व संवर्धन कामांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, १५ एप्रिल २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ही कामे अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या निधीतून हाती घेण्यात आली आहेत. पुरातत्त्व विभागामार्फत ही दुरुस्ती व संवर्धनाची कामे मागील तीन महिन्यांपासून…

Read More