Headlines

अमित शहा अन् फडणवीसांच्या आदेशानेच आंदोलकांवर क्रूर अत्याचार:महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हे तर शहाच- हर्षवर्धन सपकाळ

दिल्लीमधील आंदोलनात एकीकडे क्रुर तर दुसरीकडे विकृत असे वर्तन केंद्राच्या आणि राज्याच्या गृह विभागाकडून बघायला मिळाले. जर गृहविभाग असे कृत्य करतो आणि कोणतीच कारवाई होत नाही, त्यावेळी गृहमंत्र्यांचाच त्या कारवाईसाठी आदेश असेल याची शक्यता नाकारता येत नाही, ही शक्यता असल्याने कोणत्याच पोलिसांवर कारवाई करण्यात आली नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. देवेंद्र…

Read More

शिक्षणव्यवस्थेची वाट लावणाऱ्यांचे कौतुक कशाला?:प्रधानांच्या पाठीशी उभे राहणे हीच अंधभक्ती, फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर पवारांचा संताप

नीट पेपरफुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 25 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या कामाचे कौतुक करत संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे ट्विट केले होते. फडणवीसांच्या याच ट्विटचा समाचार घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित…

Read More

झुरळांनी बेगॉनला हरवलं:धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंचा मोदींवर निशाणा

दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनापुढे झुकत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. शनिवारी सोशल मीडियावर पत्र शेअर करत त्यांनी ही घोषणा केली. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, भाजप नेते प्रल्हाद जोशी यांच्याकडे हंगामी शिक्षणमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोशल…

Read More

पिंपळनेरात संत निळोबारायांच्या समाधी दर्शनासाठी उसळली गर्दी:संत निळोबाराय समाधीचे हजारो भाविकांकडून दर्शन‎

आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे वारकरी भक्तीचा महापूर आला होता.संत परंपरेतील अखेरचे संत निळोबाराय महाराजांच्या संजीवनी समाधीचे आणि निळोबारायांनी स्थापन केलेल्या स्वयंभू श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी हजारो वारकरी आणि भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. शनिवारी (२५ जुलै) सकाळी संत निळोबारायांचे वंशज बंडू भरत मकाशीर आणि नंदा गोपाळ मकाशीर…

Read More

आषाढी एकादशीनिमित्त पर्यावरण संवर्धानाचा संकल्प:रोपरुपी प्रसाद वाटप; 490 राेपं, कापडी पिशव्यांचे वितरण‎

पर्यावरण संवर्धन आणि वारकरी परंपरेचा सुरेख संगम साधत, “माय वसुधा विकास’ संस्थेच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त ४९० रोपं आणि कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.दरम्यान, “माय वसुधा विकास’ संस्थेतर्फे शनिवारी “प्लास्टिक मुक्त अकोला-महाराष्ट्र अभियान’ अंतर् . नागरिकांमध्ये जनजागृती प्लॅस्टिक डिस्पोजेबलचा वापर टाळावा म्हणून निःशुल्क ताट, ग्लास, चमचे, वाट्या, चहाचे पेले, नाष्टा प्लेट, मठ्ठा-पन्यासाठी पेले साहित्याच्या निःशुल्क उपलब्धतेचा प्रचार…

Read More

भाविकांची मांदियाळी:विठू नामाच्या गजराने दुमदुमली‎राजेश्वर नगरी; भाविकांची गर्दी‎, टाळ मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशी उत्साहात

एकिकडे पंढरीरायाच्या भेटीसाठी वैष्णवांचा थवा पंढरपूरात पोहोचला असतानाच दुसरीकडे राजेश्वर नगरीतही शनिवारी आषाढी एकादशीनिमित्त राजेश्वरी नगरी विठू नामाच्या गजराने दुमदुमली. विठ्ठल मंदिरांमध्ये ६ क्विंटल पेक्षा जास्त प्रसादरुपी साबुदाणा खिचडीचे व तीन हजारांपेक्षा जास्त केळीचे वितरण करण्यात आले. विविध मंदिरांमध्ये िवद्युत रोषणाई करण्यात आली. महापूजेनंतर विठ्ठू माऊलीच्या दर्शनासाठी भक्तांचा सागर लोटला. दरम्यान जुने शहरातील ३२२ वर्ष…

Read More

निंदणासाठी मजुर मिळेना; पाच तासांसाठी 250 रु. मजुरी:परिसरामध्ये पावसाने पिकांना नवसंजीवनी‎

महान व परिसरात सुमारे १२ दिवसांच्या मोठ्या उघडीपीनंतर गत १८ जुलैपासून पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. या पावसामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि ज्वारी यांसारख्या खरिपाच्या पिकांना मोठी नवसंजीवनी मिळाली असून संपूर्ण परिसर हिरव्यागार पिकांनी बहरला आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने मारलेल्या दडीमुळे आणि कडक उन्हामुळे पिके कोमेजून दयनीय अवस्थेत पोहोचली होती. मात्र, १८…

Read More

मेळघाटातील कुपोषण नियंत्रण करण्यासाठी उपाय केले जाणार:महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची ग्वाही‎

मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. याबाबत राज्य शासन सकारात्मक पावले उचलत असून गेल्या काळात कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. येत्या काळातही माता आणि बाल संगोपनासाठी विविध उपाययोजना करण्यात येऊन मेळघाटातील कुपोषण नियंत्रित करण्यावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. धारणी येथील तहसील…

Read More

अवैध सावकारीला कंटाळून 45 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या:मृत्युपुर्व चिठ्ठीत शेत हडपल्याचा आरोप, तिघांविरुद्ध गुन्हा‎

अवैध सावकारीच्या पाशात अडकलेल्या एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी २५ जुलैला सकाळी आठ वाजता उघडकीस आली. तरोडा (डोमक) येथे ही घटना उघडकीस आली आहे. पवन विश्वासराव भाकरे (४५, रा. तरोडा डोमक) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. भाकरे यांनी…

Read More

जिल्हा काँग्रेसची इर्विन चौकात निदर्शने:शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केले सादर‎

नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने शनिवारी, २५ जुलैला निदर्शने केलीू . इर्विन चौक स्थित डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करून आंदोलन केले. केंद्र शासनाविरुद्ध प्रदर्शन करतानाच शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकतेची मागणी यावेळी केली . आंदोलनाच्या शेवटी शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता दूर करून परीक्षा व प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशा मागणीचे निवेदन…

Read More