Headlines

SC-ST वर्गीकरणावरून प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका:जस्टिस बदर समितीचा अहवाल 'अवैज्ञानिक' असल्याचा केला दावा

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अनुसूचित जाती आणि जमातीच्या (SC/ST) आरक्षणाच्या उप-वर्गीकरणावरून महाराष्ट्र सरकार आणि जस्टिस बदर समितीवर निशाणा साधला आहे. या समितीने तज्ज्ञ संस्था किंवा लोकांचा सहभाग न घेता केलेले वर्गीकरण अशास्त्रीय असल्याचे सांगत, हे विभाजन केवळ ‘कास्ट’ पद्धतीने न होता ‘इक्वल डिस्ट्रिब्यूशन’च्या तत्त्वावर व्हायला हवे होते, असे मत आंबेडकरांनी व्यक्त केले…

Read More

नागपुरात दिव्यांग ज्येष्ठ नागरिकाची हत्या:घरात घुसून पैशांसाठी जीव घेतला; तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा, एकाला अटक

नागपूरच्या कृष्णानगर परिसरात पैशांसाठी एका दिव्यांग ज्येष्ठ नागरिकाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सहेसराम बाजीराव केवट (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णानगर परिसरात ही घटना घडली. विलास सुभाष चौधरी (वय २५) याला अटक…

Read More

देशातील पहिली 'ई-टीडीआर' प्रणाली 15 एप्रिलपासून कार्यान्वित:टीडीआर व्यवहार आता एका क्लिकवर! मुंबईतील नागरी विकासाला मिळणार गती

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या पुढाकारातून आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने हस्तांतरणीय विकास हक्क (Transferable Development Rights-TDR) व्यवहारांसंदर्भातील भारतातील पहिले एकात्मिक डिजिटल व्यासपीठ म्हणजेच ई टीडीआर प्रणाली सुरू करण्यात येत आहे. बुधवार, दिनांक १५ एप्रिल २०२६ पासून ही प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येत असून https://etdr.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ही प्रणाली उपलब्ध असेल. या प्रणालीमध्ये खरेदीदार आणि विक्रेत्यांसाठी…

Read More

राऊत पीडित महिलांसोबत की भोंदू बाबासोबत?:बिल्डरांना रेड कार्पेट टाकणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, मविआने अडीच वर्ष स्मारकाचं काम ठप्प ठेवले- नवनाथ बन

भोंदू बाबा खरातनंतर संजूबाबा राऊत हे रोज खोटे बोलण्याचा धंदा सुरू केला आहे. अंजली दमानियांना कुठून माहिती मिळाली याचा तपास सुरू आहे. कुणाला फोन केला म्हणून कोणी लगेच दोषी होत नसतो, राऊत तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? भोंदू खरात की ज्या पीडित महिला आहेत त्यांच्या हे पहिले स्पष्ट करा, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले…

Read More

जावई अशोक खरातला शिक्षा नको, पण आता वाचवणार कोण?:कल्पना कुठे माहिती नाही; मुलांसाठी मी इथे आले- पार्वती शिंदे

नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरातला एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या चौथ्या गुन्ह्याप्रकरणी आज पुन्हा नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असून, या प्रकरणात पोलिस त्याची पुन्हा कोठडी मागण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खरातची सासू पार्वती शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पार्वती शिंदे म्हणाल्या,…

Read More

जवळगावात ‘श्रीवर्धन प्रीमियर लीग हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा:श्रीवर्धन शुगर्स व एकदंत क्रिकेट क्लब, जवळगाव यांच्याकडून आयोजन‎

वैराग जवळगाव आत्मोन्नती फाउंडेशनच्या वतीने ‘ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त श्रीवर्धन प्रीमियर लीग २०२६’ अंतर्गत भव्य हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीवर्धन शुगर्स व एकदंत क्रिकेट क्लब, जवळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा शनिवार, दि. ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता सुरू झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मा.विक्रमसिंह देशमुख (सभापती, पंचायत समिती तुळजापूर)…

Read More

भाऊसाहेबांच्या कार्यामुळे माणसाला माणूसपण प्राप्त झाले- प्रा. डॉ. तायडे:जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात आयोजित व्याख्यानास प्रतिसाद‎

डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या सामाजिक कार्याचा आणि त्याद्वारे झालेल्या वर्तमानातील प्रगतीचा आढावा घेतल्यास भाऊसाहेबांचे विचार हे सदैव प्रेरणादायी आणि जीवनाला दिशा देणारे आहेत. समाज सुधारण्याची त्यांची तळमळ आजही अंतर्मुख करणारी आहे. असे मत प्रा. डॉ. प्रकाश तायडे यांनी येथे व्यक्त केले. येथील जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जीवनावर…

Read More

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादनासाठी गर्दी:राजकीय नेतेही हजर; जय भीमच्या घोषणा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच हजारो भीम अनुयायी अभिवादनासाठी स्मारक परिसरात दाखल होऊ लागले आहेत. विविध भागांतून अनुयायांचे लोंढे स्मारक परिसरात येताना दिसत असून, संपूर्ण परिसरात जय भीमच्या घोषणा घुमत आहेत. यंदाही मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती लावत बाबासाहेबांना अभिवादन केले. यंदाच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील स्मारकासमोर विशेष सेल्फी पॉईंट उभारण्यात…

Read More

विद्यार्थ्यांनी संकलित केल्या विविध वृक्षांच्या बिया, टिळक राष्ट्रीय विद्यालयाचा वृक्षप्रेमी निर्माण होण्याकरता बारा वर्षांपासून उपक्रम

विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेमी निर्माण होण्याकरिता व विद्यार्थी पर्यावरणाशी समरस होऊन परिसरातील इतरही वृक्षांच्या बियांच्या संकलनाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण होण्याकरता बारा-तेरा वर्षापासून अशा उपक्रमाचे आयोजन अरूण भगत गुरूजी यांच्याकडून टिळक राष्ट्रीय विद्यालयात केले जाते. आज रोजी संकलित झालेल्या बियांची लागवड पावसाळ्यामध्ये माळरानावर करण्यात येणार आहे. खामगाव येथील टिळक राष्ट्रीय विद्यालयाचे माजी संस्थाध्यक्ष मधुसूदन गाडोदीया, माजी संस्थाध्यक्ष अशोकभाऊ…

Read More

ग्रामपंचायतच गावच्या विकासाचे मुख्य साधन- भास्कर पेरे पाटील:जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम

गावातील व्यक्तींचा विकास करण्याचे मुख्य साधन ग्रामपंचायत आहे, असे प्रतिपादन पाटोदा येथील आदर्श माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. . येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त उत्सव समितीने रविवारी (दि. १२) आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. पेरे पाटील म्हणाले, गावाची ओळख, संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य जपण्याची जबाबदारी…

Read More