Headlines

मराठा आंदोलन पुन्हा पेटलं!:विखे पाटलांच्या बंगल्यावर ठिय्या; आश्वासने तातडीने पूर्ण करा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा

मराठा आरक्षण आणि समाजाच्या प्रलंबित मागण्यांवरून मराठा आंदोलक पुन्हा आक्रमक झाले आहेत. मराठा क्रांत ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी आज मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यात सरकारकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे…

Read More

लाडकी बहीण योजनेवरून रोहित पवार आक्रमक:म्हणाले- उद्या योजना गुंडाळली तरी आश्चर्य नाही, उज्ज्वलातील सिलिंडरची संख्या कमी केल्याचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. उज्ज्वला योजनेतील अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या कमी करण्यात आल्याचा आरोप करत, निवडणुका संपल्यानंतर सरकार योजनांच्या लाभार्थ्यांवर निर्बंध आणत असल्याचा दावा त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केला. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या आधी 12 वरून 9…

Read More

राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना नवनीत राणांचा पूर्णविराम:म्हणाल्या- मी भाजपची निष्ठावान कार्यकर्ता, विचारधारेशी तडजोड नाही

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चांना खासदार नवनीत राणा यांनी अखेर पूर्णविराम दिला आहे. कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठावान कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी पक्षांतराच्या सर्व शक्यतांना फेटाळून लावले. राज्यसभा उमेदवारीसंदर्भातील पडद्यामागील घडामोडींवरही त्यांनी प्रथमच भाष्य केले. सोशल मीडियावर पोस्ट करत नवनीत राणा…

Read More

श्रींच्या तीर्थक्षेत्रीय सप्ताहाकरिता पैठणला भाविकांची मांदियाळी:श्री ज्ञानेश्वरी व भावार्थ रामायणाचे ज्ञान सप्ताहाचा श्रीगणेशा‎

तीर्थ यात्रे सुखे जाऊ । वाचे विठ्ठलनाम घेऊ । संता संगे सेऊ । वासुदेव धणीवरी ॥ या अभंगोक्तिनुसार प्रतिवर्षी श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, श्रीक्षेत्र श्रद्धासागर, अकोटद्वारे एका तीर्थक्षेत्रावर जाऊन श्रींच्या तीर्थक्षेत्रिय ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षी श्रीक्षेत्र पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज मंदिरात सप्ताहाचा श्रीगणेशा झाला. पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी…

Read More

मेळघाटच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक:पुन्हा मोठे आंदोलन करण्याचा दिला इशारा, वीज प्रश्नावरही केला संताप व्यक्त

मेळघाटातील पाणी, वीज, आरोग्य,‎ शिक्षण, रोजगार, वनहक्क आणि‎ रस्त्यांच्या बिकट प्रश्नांसाठी दोन‎ महिन्यांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी ‎‎मेळघाट संघर्ष पदयात्रा काढली होती.‎मात्र, या पदयात्रेनंतरही मेळघाटातील ‎अनेक मूलभूत प्रश्न अद्याप जसेच्या तसे ‎‎कायम असल्याचा आरोप करत आमदार ‎‎बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा ‎‎प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा‎ घेतला आहे.‎ शिवसेना (शिंदे गट) आणि प्रहार‎जनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त जनसंपर्क‎…

Read More

"पुस्तकांचे गाव' ज्ञानकेंद्र म्हणून विकसित व्हावे- जिल्हाधिकारी

वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात ज्ञानाचा प्रसार व्यापक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘पुस्तकांचे गाव’ या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून उपक्रमाचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पुस्तकांचे गाव-विस्तार’ योजनेअंतर्गत जिल्ह्यात ‘पुस्तकांचे गाव’ उभारण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते….

Read More

खडक माळेगाव, टाकळी विंचूरला दोन बिबटे जेरबंद:शेतकऱ्यांच्या मदतीने वन विभागाने राबविली माेहीम‎

निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी (दि.८) शिंदे वस्ती परिसरात आढळलेल्या एका बिबट्याला वन विभागाने सुरक्षितरित्या जेरबंद केले, तर दुसरा बिबट्या सायंकाळी टाकळी विंचूर येथे जेरबंद करण्यात आला. दरम्यान, दोन शेतकरी आणि वन विभागाच्या एका कर्मचाऱ्यावर बिबट्याने किरकोळ हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. खडक माळेगाव येथील शेतकरी…

Read More

खेत बचाओ अभियानांतर्गत गेवराई सेमी येथे शेतकऱ्यांसाठी मेळावा:पीक संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, कृषी योजनांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎

बदलत्या हवामानामुळे शेतीपुढील आव्हाने वाढत असताना पिकांचे रोग व किडींपासून संरक्षण, उत्पादन खर्चात बचत आणि शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील शास्त्रज्ञ डॉ. जिंतूरकर यांनी केले. त्या गेवराई सेमी येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित खेत बचाओ अभियान अंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या….

Read More

जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या:भोकनगाव येथे घरात कोणी नसताना घेतला गळफास‎

कन्नड तालुक्यातील भोकनगाव येथे दीड वर्षापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहिता मयूरी सचिन खरे (२२) यांनी आपल्या राहत्या घरात सोमवार, ८ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास छताच्या लोखंडी हूकला गळफास लावून आत्महत्या केली. या संदर्भात कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होतो. मृत मयूरी सचिन खरे यांचा भाऊ ऋषिकेश संतोष आढाव यांनी माहिती दिली…

Read More

विदर्भातील शाळा 29 जूनपासून सुरू कराव्यात:शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची मागणी, मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भाला अभूतपूर्व उष्णतेचा सामना करावा लागला आहे. मे महिन्यापासूनच तापमानाचा पारा सतत 45 ते 47 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिला असून, देशातील सर्वाधिक तापमान नोंदविणाऱ्या शहरांच्या यादीत विदर्भातील अनेक शहरांचा समावेश होता. जून महिन्याची सुरुवात झाल्यानंतरही तापमानात अपेक्षित घट झालेली नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ….

Read More