Headlines

‘गजर विठ्ठलाचा’ कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध‎:महाराष्ट्रामध्ये पैठणनगरीचे विशेष धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व- अभिनेत्री अलका कुबल

संतपरंपरेची पावन परंपरा लाभलेल्या पैठणनगरीचे महाराष्ट्रात विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. संत एकनाथ महाराजांच्या भूमीत सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन होणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे मत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल यांनी व्यक्त केले. श्रीक्षेत्र पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या ४२७ व्या षष्ठीनिमित्त तसेच वरुथिनी एकादशीच्या पावन पर्वावर नाथषष्ठी सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला…

Read More

चाकणकरांची नेत्यांना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी:रुपाली ठोंबरे पाटील यांच्या दाव्याने खळबळ; पोलिसांवर अटक न करण्याचा आरोप

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अनेक नेत्यांना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे भोंदू अशोक खरात प्रकरणातील नवे कंगोरे समोर येण्याची शक्यता वाढली आहे. गत काही दिवसांपासून भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्याचे रान पेटले आहे. या प्रकरणी दररोज नवनवे…

Read More

उमरडच्या शिबिरात 800 प्रमाणपत्रांचे वाटप:महसूल विभागाच्या समाधान शिबिरामध्ये अनेक प्रलंबित दाखल्यांचा निपटारा‎

वाशिंबे करमाळा तालुक्यातील उमरड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित ‘समाधान शिबिर’ मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आपली रेंगाळलेली प्रशासकीय कामे एकाच ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन केले. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित या शिबिराप्रसंगी आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन वामन बदे, आदिनाथचे संचालक राजाभाऊ…

Read More

गुंतागुंतीची शस्त्रक्रिया; सुपरच्या डॉक्टरांना यश:स्वादुपिंडातील गाठीच्या त्रासामुळे शहरातील 12 वर्षीय मुलगी झाली होती त्रस्त‎

अमरावती स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल) शहरातील १२ वर्षीय मुलीच्या पोटातील गाठीची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. गाठीमुळे रुग्ण बालिकेचे पोट वरच्या बाजूस सरकले होते, त्यामुळे तिला अन्न घेण्यास अडचण येत होती तसेच गॅस्ट्रोस्कोपी करतानाही अडथळे येत होते. श्वास घेणे आणि चालणेदेखील तिच्यासाठी कठीण झाले होते. परिस्थिती गंभीर असल्याने तातडीने…

Read More

Navnath Ban Slams Aditya Thackerays Leadership; Predicts UBT Struggles in 2029

मनपा निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी चांगले काम केले तरी सत्ता मिळवता आली नाही असे संजय राऊत सांगत आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेला चांगले काम केले तरी काही फायदा झाला नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंच्या अपयशावर राऊतांनी बोट ठेवले आहे. ते कसे अपयशी आहेत, त्यांच . नवनाथ बन म्हणाले की, मतदारसंघ वाढीमुळे देशात आग लागणार नाही. विरोधी पक्षांमध्ये…

Read More

सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या जावयाच्या कंपनीसोबत फडणवीसांचा मोठा करार:साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक, रायगडमध्ये ऊर्जा प्रकल्प

राज्यातील ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार असल्याची महत्त्वाची घोषणा समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचे लवकरच लग्न होणार असताना, सारंग लखानी यांच्या कंपनीने राज्य सरकारसोबत मोठा सामंजस्य करार केला आहे. या कराराची एकूण किंमत सुमारे 5 हजार 760 कोटी रुपये असून, हा प्रकल्प राज्यातील वीज निर्मिती क्षमतेत मोठी…

Read More

सूर्याचा प्रकोप!:अकोला अन् कलबुर्गी ठरली जगातील सर्वाधिक उष्ण शहरे, पारा 44 अंशांवर

राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून सूर्याच्या प्रखर किरणांनी नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट असताना विदर्भावर मात्र सूर्याची विशेष वक्रदृष्टी पाहायला मिळत आहे. अकोला शहरात सलग तिसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, जागतिक नकाशावरही अकोल्याने मंगळवारी उष्णतेचा उच्चांक गाठला. ‘एल्डोराडो’ या जागतिक हवामान संकेतस्थळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी अकोला आणि…

Read More

डॉ. पंजाबराव देशमुख हे हरितक्रांतीचे जनक:डॉ. किशोर साबळे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘समता पर्व’निमित्त व्याख्यान‎

अमरावती3 तासांपूर्वी कॉपी लिंक देश स्वतंत्र झाला त्यावेळी आपल्या देशात अन्नधान्याचे उत्पादन ५० .८३ टक्के होते व दरदिवशी ३९५ ग्रॅम अन्नधान्य एका माणसाकरीता उपलब्ध होते. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी क्रांती घडवून आणली त्यामुळे आज देश अन्नधान्याच्या बाबतीत केवळ सक्षम झाल Source link

Read More

कैसा हराया डायलॉग गाजला, आता सहर शेख अडचणीत:बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात नगरसेवकपद धोक्यात; चार यंत्रणांची दिशाभूल?

ठाणे महानगरपालिकेतील मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्याविरोधात गंभीर आरोप समोर आले आहेत. निवडणूक लढवताना बनावट जात प्रमाणपत्र सादर करून त्यांनी शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जानेवारी…

Read More

महाराष्ट्राच्या फाळणीची ही तर मुहूर्तमेढ नाही ना?:विधानसभेच्या 400 जागांच्या नियोजनावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्रात लोकसभेच्या 72 जागा होत आहेत, पण मला वाटते जास्त जागा व्हायला हव्यात. विधानसभेच्या 400 जागा तयार होणार आहेत, त्यासाठी विधान भवन बांधण्यात आलेले नाही. 400 जागा झाल्यावर त्या जागेंच्या बहुमताच्या जोरावर महाराष्ट्राचे तुकडे या लोकांनी केले ही त्यांची तयारी आहे का? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की,…

Read More