Headlines

पर्यावरण दिनानिमित्त राज्यभर अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ:एसटी स्थानके व बसेसची दर चार तासांनी स्वच्छता होणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ आज मुंबईतील परळ बसस्थानक येथे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातील बसस्थानके, एसटी बसेस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे अधिक स्वच्छ, सुंदर व प्रवासी-अनुकूल बनविण्याचा महामंडळाचा संकल्प असल्याचे सरनाईक यांनी यावेळी…

Read More

'मी सावित्रीबाई जोतिराव फुले' मालिका बंद होणार?:अमोल कोल्हेंचा सेटवरील व्हिडिओ व्हायरल; मानधनाबाबत मोठा निर्णय, 'व्यावसायिक गणिते' की 'राजकीय दबाव'? चर्चा सुरू

मराठी मनोरंजन विश्वातून सध्या एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय आणि ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ बंद होणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. मालिकेचे निर्माते आणि मुख्य अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा सेटवरील एक अंतर्गत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना अधिकृत दुजोरा…

Read More

राजकारणाचा चिखल करणाऱ्या नेत्यांचा माज आता जनतेनेच उतरवावा:गाड्या, पैसा असणाऱ्यांना अन् मित्रांनाच उमेदवारी- अमित ठाकरे

राजकारणाचा सध्या जो चिखल झाला आहे, त्याकडे आता जनतेने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. राजकीय पक्ष ज्याला उमेदवारी देतील तो जिंकेलच, हा नेत्यांचा अवाजवी आत्मविश्वास लोकांनीच आता मोडून काढला पाहिजे. जनतेमुळेच आपण तिथे खुर्चीवर बसलो आहोत, याची जाणीव आता नेत्यांना करून देण्याची वेळ आली आहे, असे म्हणत मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र…

Read More

देशातील 57% जिल्हे जबर हानीच्या काठावर:आपण राहतो तिथे धड 8 महिने जगताही येत नाही याची खंत वाटत नाही? राज ठाकरेंचा सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वातावरणात होणाऱ्या बदलांविषयी निर्वाणीचा इशारा दिला आहे. आज देशातील 57 टक्के जिल्हे पर्यावरण बदलामुळे होणाऱ्या जबर हानीच्या काठावर आहेत. आपण जिथे जगतो तिथे 8 महिने आपल्याला धड जगताही येत नाही याची खंत आपल्याला वाटत नाही का? असा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे. राज ठाकरे…

Read More

विनायक राऊत शिंदे सेनेकडून दर महिन्याला रिचार्ज घेतात!:ते शिंदे सेनेचे हेर, त्यांनी मातोश्रीशी गद्दारी केली- बाळ माने, फडणवीसांचेही केले कौतुक

विनायक राऊत हे शिंदे सेनेच्या काही नेत्यांकडून दर महिन्याला रिचार्ज घेतात असा आरोप बाळ माने यांनी केला आहे. शिवसेनेचे अनेक नेते हेच बोलत आहेत. पक्षाच्या पदाधिकारी निवडीसाठी सुद्धा विनायक राऊत पैसे घेतात, त्यांनी मी विधान परिषद निवडणुकीत पैसे घेऊन माघार घेतली असे म्हणू नये, असा टोला बाळ माने यांनी लगावला आहे. ते नारायण राणेंची भेट…

Read More

दिव्य मराठी एक्स्पोज:ऑडिटरनीच घेतले ‘नाफेड’चे ठेके, एका संस्थेचे लेखा परीक्षक बनले दुसऱ्या संस्थेचे अध्यक्ष

केंद्र सरकारच्या कांदा दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत कांदा खरेदीच्या नावाने सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाचे पुरावे ‘दिव्य मराठी’च्या हाती लागले आहेत. बंद पडलेल्या सहकारी संस्थांनाच टक्केवारी देऊन या ठेक्यासाठी वापरल्याचे त्यातून पुढे येत आहे. विशेष म्हणजे सहकार विभागाचे अधिकृत लेखापरीक्षकच या घोटाळ्यात सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. कांदा खरेदीचा अनुभव नसाताना कापडी पिशव्या बनवण्यासाठी स्थापन झालेल्या स्त्री…

Read More

1200 लोकसंख्येच्या कापशीत 2800 झाडांचे ऑक्सिजन पार्क:सोशल मीडियावरील मेसेज ठरले प्रेरणादायी; गावात 3 एकरात करण्यात आली देशी झाडांची लागवड‎

. ‘भविष्यात शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळणार नाही’ अशा सोशल मीडियावरील केवळ चिंताजनक चर्चांवर न थांबता, जिल्ह्यातील कापशी गावाने प्रत्यक्ष कृतीतून एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. अवघी १२०० लोकसंख्या असलेल्या या गावात तब्बल २८०० देशी झाडांचा ‘ऑक्सिजन पार्क’ साकारण्यात आला आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि ४७ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचणाऱ्या कडक उन्हाळ्याच्या काळात ग्रामस्थांनी एकत्र येत…

Read More

कापशीच्या निसर्गरम्य तलावाकाठी प्रकटले गणपती मंदिर:15 वर्षांपूर्वी दाट झाडीत झाला होता साक्षात्कार; आज बनले जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान‎

निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य, पाण्याचा संथ प्रवाह आणि मनाला असीम शांती देणारे वातावरण… अकोला जिल्ह्यातील कापशी गावातील ऐतिहासिक इंग्रजकालीन तलावाच्या काठावर वसलेले ‘स्वयंभू गणपती’ मंदिर हजारो भाविकांच्या भक्ती व विश्वासाचा जिवंत वारसा बनले आहे. दैनंद . सन २०११ पूर्वी या परिसरात दाट झाडी होती. तलाव परिसर शांत आणि निर्मनुष्य होता. मात्र, १ ऑक्टोबर २०११ रोजी घडलेल्या…

Read More

महागाई वाढल्याने गणवेशाचा निधी घटला:शासनाकडून यंदा 240 रुपये, जिल्ह्यातील 14 पं.स.च्या 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांसमोर संकट‎

आगामी शैक्षणिक वर्ष (२०२६- २७) सुरू होण्यास अवघे काही दिवस उरलेले असताना, शासनाने मोफत शालेय गणवेशाच्या निधीत थेट २० टक्क्यांची कपात केली आहे. प्रति गणवेश ३०० रुपये देण्याचा प्रघात असताना, यंदा शाळांच्या खात्यात केवळ २४० रुपयेच जमा करण्यात आले आहेत. आधीच गगनाला भिडलेल्या महागाईत ३०० रुपयांत धड कापड मिळत नव्हते, तिथे २४० रुपयांत विद्यार्थ्यांना गणवेश…

Read More

मेळघाटातील पाणीच्या प्रश्नांसाठी आ. कडूंचा मजीप्रा कार्यालयात ठिया:अचलपूर मतदार संघातील रखडलेल्या कामाबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा‎

अचलपूर विधानसभा मतदारसंघासह मेळघाटातील नागरिकांना प्रशासकीय दिरंगाई आणि यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे, असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला. या समस्येसाठी आमदार कडू यांनी गुरूवारी (दि. ४) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिया आंदोलन केले. त्यानंतर मजीप्रा आणि जलजीवन मिशन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार बच्चू कडू यांनी चर्चा केली. दरम्यान मेळघाट संघर्ष…

Read More