महाराष्ट्र सरकार अत्यंत असंवेदनशील:प्रचंड घोडेबाजार होणार म्हणून पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीतून मविआची माघार- सुप्रिया सुळे
महाराष्ट्र सरकार हे कमालीचे असंवेदनशील असून ते राज्यातील जनतेच्या गंभीर प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही. सध्या देश आणि महाराष्ट्र दोन्हीही मोठ्या आर्थिक अडचणीतून जात असून, आगामी काळात राज्यासमोर मोठी आर्थिक आव्हाने उभी ठाकणार आहेत. सरकारने इतर गोष्टींपेक्षा या महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष देणे गरजेचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे….