Headlines

महाराष्ट्र सरकार अत्यंत असंवेदनशील:प्रचंड घोडेबाजार होणार म्हणून पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीतून मविआची माघार- सुप्रिया सुळे

महाराष्ट्र सरकार हे कमालीचे असंवेदनशील असून ते राज्यातील जनतेच्या गंभीर प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही. सध्या देश आणि महाराष्ट्र दोन्हीही मोठ्या आर्थिक अडचणीतून जात असून, आगामी काळात राज्यासमोर मोठी आर्थिक आव्हाने उभी ठाकणार आहेत. सरकारने इतर गोष्टींपेक्षा या महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष देणे गरजेचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे….

Read More

शिवरायांच्या मूळ गावचा राज्याभिषेक सोहळा:वेरुळ येथील मालोजीराजे भोसले गढीवर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ गाव वेरुळ येथील मालोजीराजे भोसले गढीवर आज शनिवारी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट यांच्यासह आमदार-खासदार आणि शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानतर्फे सलग तिसऱ्या वर्षी हा सोहळा अखंडपणे साजरा झाला. सकाळी आठ वाजता 51…

Read More

आष्टे कोळेगाव बंधाऱ्यात 20 दलघमी पाणी सोडले:50 हजार लोकसंख्येच्या मोहोळला मिळणार दिलासा, बंधाऱ्यात साचले 2 मीटर पाणी‎

मोहोळ शहराची सुमारे ५० हजार लोकसंख्या आहे. शहराला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या सिना नदीवरील आष्टे कोळेगाव बंधाऱ्यातील पाणी संपण्या अगोदरच पांटबंधारे विभागाच्या माध्यमातून घाटणे बॅरेज बंधाऱ्यातून मागील ४ दिवसापासून पाणी सोडण्यात आल्याने काही महिन्या पुरते तर मोहोळ शहराचे जलसंकट टळल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मोहोळ शहराला ग्रामपंचायत स्थापनेपासून आजतागायत सीना नदीच्या पात्रामध्ये असणाऱ्या आष्टे…

Read More

कर्मवीर गडसिंग गुरुजी म्हणजे आचार, विचार अन् उच्चारांचा त्रिवेणी संगम:मळेगाव येथे कर्मवीर गडसिंग गुरुजी यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

” मनुष्य देह प्राप्ती दुर्लभ आहे, त्याचा उपयोग सत्कर्म व समाजासाठी करावा. कर्मवीर गडसिंग गुरुजी हे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील थोर ज्ञान तपस्वी होते. गुरुजींच्या संस्कारमय शिक्षणाचे तुम्ही सर्वजण वारसदार आहात. आचार, विचार आणि उच्चार यांचा त्रिवेणी . श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मळेगाव संस्थेचे संस्थापक, जनरल सेक्रेटरी कर्मवीर गडसिंग गुरुजी यांची ९१ वी जयंती ‘प्रेरणा…

Read More

ठाकरे गटाला कोकणात धक्का?:वैभव नाईक एसीबीच्या रडारवर, मालमत्तेची माहिती मागवली; ‘जायंट किलर’ चौकशीच्या फेऱ्यात

कोकणातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख नेते आणि माजी आमदार वैभव नाईक हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रत्नागिरी येथील भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांच्या मालमत्तेबाबत माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय चर्चांना वेग आला आहे. कणकवली नगरपंचायतीला पत्र पाठवून वैभव नाईक यांनी खरेदी केलेल्या मालमत्तांबाबत तपशील…

Read More

मान्सूनची गोव्यात धडक, 48 तासांत कोकणात एन्ट्री:मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग आणि संपूर्ण विदर्भासाठी येलो अलर्ट जारी

देशभरात नैऋत्य मान्सूनची आगेकूच वेगाने सुरू असून आता महाराष्ट्रातही पावसाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनने गोव्यात प्रवेश केला असून तो आता महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीकडे झपाट्याने सरकत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील…

Read More

रोहित पवारांचा सुनेत्रा पवारांना थेट इशारा:भुजबळांनाच राज्यसभेत पाठवा; अन्यथा NCP भाजपसमोर झुकली असा संदेश जाईल

राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील जागेबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. या जागेवर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच भाजपकडून माजी खासदार नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

समस्यांचे तत्काळ निराकरण करा; अन्यथा विधिमंडळात मुद्दा मांडणार:आ. साजीद खान पठाण यांनी अधिकाऱ्यांना सुनावले‎

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आमदार साजीद खान पठाण यांनी बुधवारी महिला व बाल विकास कार्यालयाला अचानक भेट घेत आढावा घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत महिलांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करून कार्यालयीन प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा आदेश दिला. या योजनेअंतर्गत समस्यांचे निराकरण न झाल्यास विधिमंडळात मुद्दा उपस्थित करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. महायुती सरकाराने मुख्यमंत्री लाकडी बहीण…

Read More

‘नीट’चा पेपरलीक विरोधात एनएसयूआयचा मशाल मोर्चा:मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह ‘एनटीए’ बरखास्तीची केली मागणी‎

देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या ‘नीट’ परीक्षा पेपर लीक घोटाळ्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाला धक्का लावणाऱ्या गंभीर घोटाळ्याच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या वतीने शुक्रवारी ५ शहरात मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या निष्काळजीपणाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. सर्वप्रथम…

Read More

तीन दिवस वादळी पावसाच्या तडाख्याचा अंदाज:नंतर मान्सून सरी देणार दिलासा, खरीपपूर्व मशागतीला वेग; शुक्रवारी जिल्ह्याचे कमाल तापमान 37.9 अंशांपर्यंत आले खाली‎

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अवघ्या तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल. पण तत्पूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सर . गेल्या पाच दिवसांत झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून खरीप हंगामासाठी सुरू असलेल्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. अनेक भागांतील…

Read More