Headlines

मान्सूनने पकडला वेग…गोव्यात पोहोचला:महाराष्ट्रात 8 जूनपर्यंत पूर्वमोसमी पाऊस, कर्नाटक-तामिळनाडूही मान्सूनने व्यापला

मार्च 2026 मध्ये राज्यात अवकाळी पावसात झालेल्या शेती व पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून महसूल व वन विभागाने 16 कोटी 71 लाख 59 हजारांचा मदत निधी मंजूर केला. छत्रपती संभाजीनगर, बीड, गोंदिया व गडचिरोलीतील एकूण 22 हजार 123 शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. संभाजीनगर व बीड जिल्ह्यांत 7783 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यात संभाजीनगरमधील 17,216 शेतकऱ्यांना…

Read More

Shivaji Maharaj Coronation: Swarajya Dawn

सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून घुमला विजयाचा नाद, साडेतीनशे वर्षांच्या पारतंत्र्याचा मोडला उन्माद! 32 मणांच्या सुवर्णसिंहासनी विराजमान होत पेटवली क्रांतीची ज्योती स्वराज्याच्या मंगल अभिषेकाने धन्य झाली ही महाराष्ट्राची माती! . ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शालिवाहन शके 1596, आनंदनाम संवत्सर… अर्थात 6 जून 1674. हा केवळ दिनदर्शिकेवरील एक दिवस नाही, तर महाराष्ट्राच्याच नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासातील एक अद्वितीय आणि…

Read More

न्यायालयाचे आदेशावरून कनेरगाव येथील अतिक्रमण जमीनदोस्त:30 वर्षांच्या पाठपुराव्याला यश, मूळ मालकाला मिळाला ताबा

हिंगोली तालुक्यातील कनेरगाव येथे सुमारे 3000 स्क्वेअर फुट पेक्षा अधिक जागेवर बळजबरीने करण्यात आलेले अतिक्रमण न्यायालयाच्या आदेशावरून पोलीस बंदोबस्तात हटविण्यात नुकतेच हटविण्यात आले आहे. सदरील जागेचा तबा मुळ मलकाला मिळाला आहे. यानंतर आता बळजबरीने इतरांच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे याबाबत अधिक माहिती अशी की हिंगोली येथील जितेंद्र साहू यांच्या वडिलांनी तालुक्यातील कनेरगाव नाका…

Read More

चंद्रपूरच्या 15 गावांच्या सीमांकनासाठी उच्चस्तरीय समिती:दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १५ गावांच्या सीमांकनासाठी राज्य शासनाने अखेर उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या गावांचे महसुली अभिलेख उपलब्ध नाहीत. महसूल व वन विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे. या भागाला मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे. सन १९५६ पूर्वी आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुका…

Read More

निदा खानविरोधात आरोपपत्र दाखल:पीडितेचे 'ब्रेनवॉश' करण्यासाठी थेट झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवल्याचे तपासात उघड

नाशिकमधील बहुचर्चित TCS महिला कर्मचारी शोषण आणि धर्मांतर प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. 2022 ते 2026 या चार वर्षांच्या कालावधीत पीडित तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि मानसिक छळाचा संपूर्ण घटनाक्रम यात मांडण्यात आला आहे. पीडितेचे धर्मांतर…

Read More

महाविकास आघाडीचा विश्वासघात झाला:आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शरद पवार गटाने केला- वसंत मोरे

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधानपरिषदेची निवडणूक अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर बिनविरोध झाली आहे. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटल्यानंतर, भाजपमधून ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडे यांनी निष्ठावंतांना डावलून उमेदवारी मिळवली. यादरम्यान, भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार…

Read More

शिवसेना शिंदे गटाचे 2 उमेदवार बिनविरोध:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- ही पुढील विजयाची नांदी; मविआवर जोरदार टोलेबाजी

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या दिवशी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद तसेच बंडखोरी देखील पाहायला मिळाली. मात्र, अर्ज माघारीच्या वेळेस अनेकांनी अर्ज मागे घेतले आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद छत्रपती संभाजीनगर येथे पाहायला मिळाला. मात्र ती जागा भाजपला सोडण्यात आली. त्यानंतर ठाण्यात शिंदे गटाचा उमेदवार…

Read More

काँग्रेसचे उपविभागीय कार्यालयात पेरणी आंदोलन:किनवटच्या बिरसा मुंडा चौकातून काढला मोर्चा, महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी

राज्यातील वाढती बेरोजगारी, महागाई, नीट परीक्षेचा घोटाळा, शेतकरी कर्जमाफी आणि आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वाखाली किनवट येथे काँग्रेसचे डॉ. पुंडलिक आमले यांच्या पुढाकारातून बिरसा मुंडा चौकातून मोर्चा काढण्यात आला व उपविभागीय कार्यालय परिसरात पेरणी आंदोलन करण्यात आले. काँग्रेसने निवेदनाद्वारे राज्यातील वाढत्या बेरोजगारीबाबत चिंता व्यक्त करत युवक-युवतींसाठी…

Read More

LIC चा पैसा मोदींच्या मित्राचा नव्हे जनतेच्या घामाचा:काँग्रेसचा 'राजेश एक्स्पोर्ट'वरून घणाघात; मित्र बचाव योजनेच्या चौकशीची मागणी

राजेश एक्स्पोर्ट नामक कंपनीच्या तब्बल 15 लाख रुपयांच्या कथित घोटाळ्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राजेश एक्स्पोर्ट्स कंपनीवर सेबीने 15 लाख कोटींचा महसूल फुगवून दाखवल्याचा आरोप केला आहे. एलआयसीने जनतेचा पैसा या कंपनीत का गुंतवला? हा पैसा मोदींच्या मित्रांचा नव्हे, तर जनतेच्या घामाचा आहे, असे…

Read More

मोहिते पाटलांनी केसाने गळा कापला:आमदार उत्तमराव जानकर यांचा आरोप; धैर्यशील मोहिते पाटलांनी दिले सावध प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी सोलापूरच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मोहिते पाटलांवर केसाने गळा कापल्याचा आरोप केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत माझ्या मुलाची उमेदवारी फायनल झाली होती. पण नंतर घडलेल्या घडामोडीत मोहिते पाटलांनी आमचा केसाने गळा कापला, असे ते म्हणालेत. विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे माजी आमदार राजेंद्र…

Read More