Headlines

मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये मोठी कारवाई:74 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त, अंमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त; दोन अटकेत

देशभरात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरुद्ध पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत थेट गुजरातमध्ये धडक कारवाई केली आहे. नर्मदा जिल्ह्यातील राजपिपला येथे सुरू असलेला ‘एमडी’ (मेफेड्रॉन) ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करून पोलिसांनी ७४ कोटी ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ एप्रिल २०२६…

Read More

टेकडी गणपतीला 750 किलो चांदीचे सिंहासन:बुधवारी संकष्टी चतुर्थीला होणार लोकार्पण

नागपूर येथील श्री गणेश मंदिर टेकडी, जे विदर्भाचे आराध्य दैवत आहे, त्याच्या धार्मिक वैभवात एका नव्या सिंहासनाच्या लोकार्पणाने भर पडणार आहे. ७५० किलो चांदी आणि अर्धा किलो सोन्याने बनवलेल्या या भव्य सिंहासनाचे लोकार्पण बुधवारी, ३ जून २०२६ रोजी संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर होणार आहे. या सोहळ्यानंतर श्री गणेश भगवान रिद्धी-सिद्धीसह या नव्या सिंहासनावर विराजमान होतील….

Read More

सुप्रिया सुळे यांचे पुणे पोलिस आयुक्तांना आक्रमक पत्र:पुण्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर थेट सवाल

पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या बिघडत चाललेल्या परिस्थितीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिस आयुक्तांना एक खरमरीत पत्र पाठवले आहे. पोलिस प्रशासनाने सादर केलेल्या गुन्हेगारीच्या आकडेवारीवर बोट ठेवत, सुप्रिया सुळे यांनी प्रशासकीय आकडेवारी आणि जमिनीवरील वास्तव यात मोठी तफावत असल्याचे म्हटले आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि सातत्याने घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे पुणेकर दहशतीखाली जगत असल्याचे त्यांनी…

Read More

हातभट्टीची दारू अधिकृत करा:शासनालाही महसूल मिळेल; रामदास आठवलेंची मागणी; मराठा आरक्षण आणि ओबीसी उपवर्गीकरणावरही भाष्य

आपल्या हटके वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी भिवंडी दौऱ्यात एक अजब मागणी केली आहे. राज्यातील विषारी दारूमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सरकारने ‘हातभट्टीची दारू अधिकृत करावी’, असे अजब विधान आठवलेंनी केले आहे. हे आपले वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट करत त्यांनी यातून शासनाला महसूल मिळेल आणि…

Read More

पुणे शहरात अपघातांचे सत्र:4 ठार, 3 गंभीर जखमी; पुणे-सातारा महामार्ग, बाणेर, केसनंद, खराडी येथे वेगवेगळ्या घटना

पुणे शहरात गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या भागांत झालेल्या रस्ते अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनांमध्ये एका तीन वर्षांच्या बालकासह एकूण तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे अपघात पुणे-सातारा रस्ता, बाणेर, पुणे-अहिल्यानगर रस्ता (केसनंद) आणि खराडी या परिसरांमध्ये घडले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून अधिक तपास सुरू आहे. पुणे-सातारा…

Read More

मित्रांसोबत पार्टी करताना काळाची झडप:चुलीवर जेवण शिजवत असतानाच कोसळली वीज, तरुणाचा मृत्यू; कोल्हापुरातील घटना

मित्रांसोबत सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या गटावर निसर्गरम्य चिकोत्रा धरण परिसरात काळाने भीषण घाला घातला. धरण क्षेत्रात पार्टीसाठी जेवण बनवत असताना अचानक अंगावर वीज कोसळून एका २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुदरगड तालुक्यातील आरळगुंडी…

Read More

मुख्यमंत्र्यांचे विधान शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक: राजू शेट्टी:'लाडकी बहीण' योजनेसारखा 'कर्जमाफी'चा खेळ खपवून घेणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतकरी कर्जमाफीवरील विधानावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार असून, ‘लाडकी बहीण’ योजनेसारखा फसवा कर्जमाफीचा खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले होते की, शेतकरी कर्जमाफी योजना मंत्रिमंडळ…

Read More

कॉंग्रेसमध्ये 'प्रदेशाध्यक्ष हटाव'ची मागणी!:हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात गट तयार, दिल्ली हायकमांडची घेणार 8 जूनला भेट

महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता विकोपाला गेली असून, हा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचण्याची चिन्हे आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत पक्षांतर्गत विरोधकांनी आता त्यांच्याविरोधात मोठी आघाडी उघडण्यास सुरुवात केली असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील नाराज नेत्यांचा एक मोठा गट येत्या 8 जून रोजी दिल्लीत जाऊन थेट…

Read More

मोबाईल टॉवरचे केबल चोरी करणाऱ्या चौघांना अटक:औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, 4 मोबाईल, एक दुचाकीसह 95 हजारांचा मुद्देमाल जप्त

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे मोबाईल टॉवरचे केबल चोरी करणाच्या चौघांना पोलिसांच्या पथकाने पकडले असून या प्रकरणी सोमवारी ता. १ औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून चार मोबाईल, एक दुचाकीसह ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून केबल चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्ह्यात…

Read More

हिंगोली जिल्ह्यात 58 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची मोठी कारवाई:पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन यांचा दणका, गुन्हेगारांमध्ये खळबळ

हिंगोली जिल्हयात अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात पोलिस विभागाने कडक कारवाई सुरु केली असून मंगळवारी ता. २ एकाच दिवशी जिल्हयातील तब्बल ५८ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये एक वर्ष ते एक महिन्यापर्यंत हद्दपारीची कारवाई झाली असून याबाबतचे आदेश पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी काढले आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने हद्दपारीची कारवाई होण्याची हि पहिलीच वेळ…

Read More