Headlines

कोसळलेला ‘सिलकॅरा’ही नवयुगनेच बांधला:मिसिंग लिंक बांधणाऱ्या ‘नवयुग’ने भाजपला दिला होता 55 कोटी फंड

मुंबई-पुणे मिसिंग लिंकमधील २,८६५ कोटींचे दोन बोगद्यांची कामे नवयुग इंजिनिअरिंग कंपनीने केलेली आहेत. या कंपनीने भाजपला ५५ कोटींचा निवडणूक निधी दिला होता. १८ एप्रिल २०१९ रोजी प्रत्येकी १ कोटीचे ३० तर १० ऑक्टोबर २०२२ रोजी प्रत्येकी १ कोटीचे २५ असे एकूण ५५ कोटींचे निवडणूक रोखे कंपनीने भाजपसाठी खरेदी केले होते. ऑक्टोबर-२०१८ मध्ये कंपनीला कार्यादेश दिले….

Read More

राज्यातील शेतकरी सुखी होऊ दे- देवेंद्र फडणवीस:माउली व तुकोबांच्या पालख्यांचे घेतले दर्शन

आज माउलींच्या पादुकाचे दर्शन घेतले तो भाग्याचा योग आहे. वारकरी हे माउलींचे जिवंत स्वरूप असून वारकरी एकत्र स्वरूपात माउलींच्या रूपात पाहायला मिळतात. त्यांचे सान्निध्य मिळाल्यामुळे मी आज खूप आनंदित आहे, असे उद््गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दुपारी पालखी मार्गावरील टप्पा येथे संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले….

Read More

Sharad Pawar Meets PM Modi In Delhi; Discusses NEET & Farmers Issue

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी आज सकाळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, कालच जंतरमंतरवर जाऊन शरद पवारांनी ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या . मात्र, या अनपेक्षित भेटीनंतर सोशल मीडियावर विविध राजकीय अर्थ काढले जाऊ लागले, तसेच त्यांच्या या भेटीसाठी ही वेळ…

Read More

कठोरा रोडवर आढळला अज्ञात तरुणाचा कुजलेला मृतदेह:हत्या की आत्महत्या, तपास सुरू

अमरावती येथील कठोरा रोडवर एका शाळेजवळ बुधवारी दुपारी एका अज्ञात तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच झाला असावा. ही घटना हत्या आहे की आत्महत्या, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. तरुणाने पँट आणि बूट परिधान केले…

Read More

Congress Protest in Chhatrapati Sambhajinagar Against NEET Paper Leak

छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आज क्रांती चौकात तीव्र निदर्शने आणि रस्ता रोको आंदोलन केले. देशातील शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी, NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरण आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवरील पोलिस लाठीहल्ल्याच्या निषेधा . या आंदोलनाचे नेतृत्व शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांनी केले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी…

Read More

300 विद्यार्थ्यांना 'देवाभाऊ शिष्यवृत्ती' प्रदान:मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 'पैशांअभावी शिक्षण थांबत नाही'

पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ३०० गरजू विद्यार्थ्यांना ‘देवाभाऊ शालेय शिष्यवृत्ती’ प्रदान करण्यात आली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते एस. पी. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात हा शिष्यवृत्ती वितरण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मंत्री पाटील यांनी, ‘पैशांअभावी शिक्षण मिळत नाही, अशी परिस्थिती आता समाजात नाही,’ असे प्रतिपादन केले. मंत्री पाटील…

Read More

"तुमचे सळसळते रक्त थंड होऊ देऊ नका..":आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर तरुणांसह राष्ट्रगीत गाणार

नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. या आंदोलनाला अनेक राजकीय पक्ष आणि विविध संघटनांसोबतच आता शिवसेना ठाकरे गटानेही आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन जंतरमंतरवरील या आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांना बळ दिले आहे. याचबरोबर, ठाकरे गटाचे…

Read More

'शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या':अण्णा हजारेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मागणी; अहिल्यानगरमध्ये अण्णांचे मौन धरणे आंदोलन

नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचे आंदोलन सध्या चांगलेच तापले असून, या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या या न्याय्य लढ्याला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी अण्णा हजारे उद्या (गुरुवारी) अहिल्यानगर शहरात मौन धरणे आंदोलन करणार आहेत. पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात अण्णा हजारे…

Read More

शासकीय महाआरोग्य शिबिराचे भाजपच्या मेळाव्यात रूपांतर:सत्तेचा गैरवापर झाल्याचा विरोधकांचा आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, विविध आजारांचे निदान, शस्त्रक्रिया आणि उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता. या शिबिरासाठी आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात कार्यरत होते. मात्र, शासकीय कार्यक्रमाचे स्वरूप बाजूला पडून या शिबिरात भाजपच्या नेते, पदाधिकारी…

Read More

"प्रामाणिकपणा माझ्या DNA मध्येच…":तुकाराम मुंढे यांचे उत्तर ऐकून अभिनेत्री काजल अग्रवाल भारावली! श्रेयस तळपदेसह घेतली मुंढेंची भेट

सामाजिक विषय अत्यंत प्रभावीपणे हाताळणारा ‘द इंडिया स्टोरी’ (The India Story) हा बहुचर्चित कोर्टरूम ड्रामा येत्या 24 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अन्नपदार्थांमध्ये होणारी जीवघेणी भेसळ आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम, या चित्रपटातून…

Read More