Headlines

उन्हाचा सामना करत १३.५६ तासांत २६७ किमीचे अंतर पार:चारसायकलप्रेमींची अहिल्यानगर ते रायगड खडतर सायकल वारी यशस्वी

प्रतिनिधी | अहिल्यानगर शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगरमधील सायकलप्रेमी मावळ्यांनी ‘अहिल्यानगर ते किल्ले रायगड’ अशी विशेष सायकल वारी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. भर उन्हाळ्यातील उन्हाचा कहर, विरुद्ध दिशेने वाहणारे प्रचंड वारे आणि तब्बल २,८०० मीटर चढाईचा (एलिव्हेशन) खडतर मार्ग अशा सर्व आव्हानांवर मात करत या सायकलप्रेमींनी १३ तास ५६ मिनिटांच्या प्रत्यक्ष सायकलिंग वेळेत हे अंतर…

Read More

मयत मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना MIDC मध्ये नोकरी:सरकारकडून आदेश जारी, मनोज जरांगे म्हणाले- मी समाधानी नाही

मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे रोजी अंतरवाली सराटी येथे भर उन्हात पुकारलेले आमरण उपोषण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर अखेर मागे घेण्यात आले आहे. सरकारच्या आश्वासनांवर समाधान व्यक्त केल्यावर शासनाने यासंदर्भात नुकताच एक आदेशही जारी केला आहे. मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांना एमआयडीसीमध्ये नोकरी देण्यात येणार आहे. मात्र…

Read More

हट्टा येथे वर्चस्वाच्या वादातून दाेन गटांत ‎हाणामारी:एक ठार, 7 जखमी, 3 गंभीर‎; गावामध्ये तणाव, वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात‎

वसमत तालुक्यातील हट्टा येथे रविवारी‎(३१ मे) मध्यरात्रीच्या सुमारास बाजार‎चौकात दोन गटांत झालेल्या हाणामारीत‎चाकूचा वार झाल्याने रुद्र दस्तके या‎तरुणाचा मृत्यू झाला. यात सात जण‎जखमी झाले आहेत. तिघांची प्रकृती गंभीर‎आहे. त्यांच्यावर परभणी येथील खासगी‎रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावात‎तणावपूर्ण शांतता आहे. वाढीव पोलिस‎बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.‎ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‎वसमत तालुक्यातील हट्टा येथे वर्चस्वाच्या‎वादातून काही दिवसांपासून दोन गटांत…

Read More

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये!:राज्यभर अन्न व औषध प्रशासनाची छापेमारी, 32 जणांना अटक; मिसलिडिंग जाहिरातींवरही कारवाईचा इशारा

अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रशासनाने अवघ्या दोन दिवसांत तब्बल 40 ठिकाणी छापे टाकले असून, यात 32 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईत एकूण 24 गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे 12.16 लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या…

Read More

पैठणला महाराष्ट्राची लोकधाराचे आयोजन,‎ पारंपरिक लोककलेचा अभूतपूर्व उत्साह‎:गुणवंत विद्यार्थी; विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान‎

प्रतिनिधी | पैठण अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पैठण तालुकास्तरीय जन्मोत्सव समितीच्या वतीने यंदा सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक वैभव, शैक्षणिक प्रोत्साहन यांचा सुंदर संगम घडवून आणणारे विविध उपक्रम राबविण्यात आले. दिवसभर झालेल्या कार्यक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अहिल्यादेवींच्या कार्याला अभिवादन केले. जयंती उत्सवाची सुरुवात अहिल्यादेवी होळकर चौकातील पुतळ्याच्या अभिषेक व पूजनाने झाली. नामदेव महाराज पोकळे, दुर्गाताई पोकळे…

Read More

मेंदी, प्री-वेडिंग शूट, बॅनरबाजीवर बंदी:सूर्यवंशी बारी पंच मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक

प्रतिनिधी | सोयगाव बारी समाजातील वाढत्या अनिष्ट चालीरीतींवर नियंत्रण आणण्यासाठी शिरसोली (जि. जळगाव) येथे सूर्यवंशी बारी पंच मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच घेण्यात आली. यात विवाह, साखरपुडा व इतर सार्वजनिक कार्यक्रमांमधील सामाजिकदृष्ट्या घातक प्रथा, अनिष्ट रूढी, परंपरा, अनाठायी खर्च टाळण्यासाठी बारी समाज एकवटला आहे. या प्रथा बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत वेळेवर…

Read More

बोरदहेगाव परिसरात पडला अवकाळी पाऊस:वादळानंतर २२ तास वीज होती गायब, झाडही हटेना

प्रतिनिधी | बोरदहेगाव रविवारी सायंकाळी वैजापूर तालुक्यात बोरदहेगाव परिसरात वादळी वारा व अवकाळी पाऊस झाला. परिसरातील गावांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी घरावरील पत्रे उडाले. काही ठिकाणी वीज पडून पशुधन दगावले. बहुतांश गावांत विद्युत पोल आडवे पडले. विद्युत तारा तुटल्या. रविवारी सायंकाळी ६ वाजता तुफान वारा व पाऊस झाला. शिवराई, परसोडा, बेंदवाडी, गोळवाडी, बोरदहेगाव, राहेगव्हाण,…

Read More

मध्य प्रदेशात सेंधवा टोलजवळ कार-कंटेनरचा‎ अपघात:गंगापूर व महालगावच्या दोघांचा मृत्यू‎

चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित कार गेली दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर‎ मध्य प्रदेशातील सेंधवा येथील‎मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी ‎‎सकाळी झालेल्या भीषण कार-कंटेनर ‎‎अपघातात गंगापूर व महालगाव येथील‎दोन तरुणांचा मृत्यू झाला. अन्य दोघे‎जखमी झाले आहेत.‎ गंगापूर येथील अनिकेत अनिल काळे‎(२९, रा. सिरजगाव, ह.मु. गंगापूर),‎ओंकार साबणे (गंगापूर), बद्रीनाथ प्रमोद‎नांगरे (२६, महालगाव, ता. वैजापूर)‎तसेच त्यांचा पुणे येथील मित्र…

Read More

देशात 90, महाराष्ट्रात 98% पाऊस; पण यंदा खंडही मोठे:नैऋत्य मान्सून येत्या 2 ते ३ दिवसांत केरळममध्ये; संभाजीनगरला वादळी पावसाचा तडाखा

देशाची अर्थव्यवस्था आणि शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला नैऋत्य मान्सून येत्या २ ते ३ दिवसांत केरळमच्या मार्गे देशात प्रवेश करू शकतो. यंदा प्रशांत महासागरातील ‘एल निनो’च्या प्रभावामुळे देशभरात सरासरीपेक्षा कमी (९०%) पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला तरी, महाराष्ट्रासाठी मात्र एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात यंदा सरासरीच्या तब्बल ९८ टक्के पाऊस पडण्याची…

Read More

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी दोन दिवस शिल्लक:3 जून ही प्रवेश निश्चितीची अंतिम मुदत, अमरावतीत एकूण 43 हजार 110 जागा उपलब्ध

केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाच्या पहिल्या सर्वसाधारण यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश निश्चितीसाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. ही यादी दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती, ज्यात विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या महाविद्यालयांचा उल्लेख आहे. जिल्ह्यातील एकूण ३३९ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी ४३ हजार ११० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १८ हजार ५७० जागा, कला शाखेच्या…

Read More