'विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपला फक्त 'अजेंडा'च दिसतो!':हर्षवर्धन सपकाळांची टीका, मुख्यमंत्र्यांच्या विधानाचाही घेतला खरपूस समाचार
नीट प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण व सीबीएसई, नीट परीक्षा पद्धतीतील भोंगळ कारभाराने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा चुराडा केला आहे. या विरोधात देश पेटला आहे, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना, या आंदोलनामागे काही राजकीय पक्षांचा अजेंडा असल्याचे अत्यंत बेजबाबदार व निर्लज्जपणाचे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 2014 साली दिल्लीत अण्णा हजारेंच्या आंदोलनातून फडणवीस यांच्या…