टाकरखेडा संभूमध्ये तीव्र पाणीटंचाई:नवीन जलकुंभ बंद, नागरिक संतप्त; समस्या न सुटल्यास ग्रामस्थांकडून उपोषणाचा इशारा
टाकरखेडा संभू येथे गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या १०५ गावे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत समावेश असूनही, नियोजनाअभावी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून, समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सुमारे सात हजार लोकसंख्या असलेल्या या गावात सध्या दीड लाख…