Headlines

जय पवारांकडून 150 आमदारांची ताकद उभी होत असेल, तर शुभेच्छा:सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्री पदावरुन अक्ष्मण हाकेंचा टोला

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबावर जोरदार टीका करत राज्याच्या राजकारणात नवी चर्चा निर्माण केली आहे. पवार कुटुंब सत्तेशिवाय राहू शकत नाही, असा आरोप करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांवर निशाणा साधला. एका बाजूला रोहित पवार विरोधी पक्षाची भूमिका घेत सरकारवर टीका करतात, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचे कुटुंब सत्तेत सहभागी होऊन पदांचा…

Read More

निर्मल उज्ज्वल सोसायटीला हायकोर्टाचा दणका:ठेवी स्वीकारण्यावरील बंदी कायम; थकबाकी कर्जावरील व्याज नफा दाखवून दिशाभूल केल्याचा ठपका

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने संस्थेवर नवीन ठेवी स्वीकारण्यास केंद्र सरकारने घातलेली बंदी कायम ठेवली असून, ठेवीदारांचे हित सर्वोच्च असल्याचे नमूद केले आहे. संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता आणि निधीचा अपहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे, केंद्रीय सहकारी निबंधकांनी २४ एप्रिल २०२६…

Read More

मुंबईत जवळपास 50 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण:31 मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे बीएमसीला निर्देश– आमदार अमित साटम

पावसाळ्यातील पूरस्थितीमुळे मुंबईकरांना होणारा त्रास कमी करण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सांगितले की, मुंबईतील जवळपास 50 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बीएमसीला देण्यात आले आहेत. आमदार साटम यांनी पश्चिम उपनगरांतील बांद्रा, जुहू, अंधेरी (पश्चिम), वर्सोवा आणि गोरेगाव येथील नाला सफाई कामांची पाहणी केली. यावेळी…

Read More

सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था उरली नाही का?:भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी जनतेने कौल दिलेला नाही, पुण्याची कायदा-सुव्यवस्था रामभरोसे- सुप्रिया सुळे

महाराष्ट्रामध्ये शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत, अवकाळी पाऊस होत आहे. सरसकट कर्जमाफी करू असा शब्द महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे, पण कर्जमाफी झालेली नाही. राज्याच्या कोणत्याही भागात गेलात तरी शेतकऱ्यांचे मोठे हाल होताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांबद्दल सरकारला काही आस्था नाही का असा प्रश्न पडतो, कारण घोषणा मोठ्या झाल्या तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीच भेटत नाही, असे खासदार…

Read More

चंद्रपूर हादरले!:निराधार गतिमंद महिलेवर नराधमाचा अत्याचार; पीडिता पाच महिन्यांची गर्भवती, आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थ आक्रमक

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यातच माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातून समोर आली आहे. एका गतिमंद महिलेच्या परिस्थितीचा फायदा घेत एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. या अमानवीय कृत्यामुळे पीडित महिला पाच महिन्यांची गर्भवती राहिली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे….

Read More

धर्मवीर आनंद दिघेंच्या नावे राज्यात उभारल्या जाणार 60 ट्रॅफिक गार्डन्स:बालपणापासूनच रुजणार वाहतूक शिस्तीचे संस्कार- प्रताप सरनाईक

राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्त आणि नियमांविषयी लहान वयातच जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. राज्यभरात तब्बल 60 ‘ट्रॅफिक गार्डन्स’ (वाहतूक उद्यान) उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असून प्रत्येक उद्यान सुमारे 1 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे 1 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप…

Read More

MP Nilesh Lanke Health Worsens; Shifted to Pune from Ahilyanagar

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांची प्रकृती आज सकाळी अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना पुढील उपचार व वैद्यकीय तपासण्यांसाठी तातडीने पुणे येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. . नीलेश लंके गत काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर अहिल्यानगर येथीलच एका रुग्णालयात मागील 2-3 दिवसांपासून उपचार सुरू होते. पण त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत…

Read More

तळेगावमध्ये ३५ वर्षीय युवकाचा आकस्मिक मृत्यू:उष्माघाताने झाल्याची शक्यता; कुटुंबावर दुःखाचा प्रसंग

तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे एका ३५ वर्षीय युवकाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. प्रदीप शेषराव वाघ असे त्यांचे नाव असून, त्यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप वाघ नेहमीप्रमाणे कामानिमित्त बाहेर गेले होते. तीव्र उष्णतेमुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना चक्कर येऊन पडले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले….

Read More

प्रमोद पोकळे यांची राज्यस्तरीय भजन स्पर्धेसाठी निवड:अमरावतीचे प्रतिनिधित्व करणार, १६-१७ मे रोजी नागपूरमध्ये स्पर्धा

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबईतर्फे आयोजित राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेसाठी येथील हरहुन्नरी कलाकार प्रमोद पोकळे यांची निवड झाली आहे. ही स्पर्धा १६ व १७ मे रोजी नागपूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रामटेक येथे होणार आहे. या निवडीसाठी ऑक्टोबर २०२५ मध्ये स्थानिक छाबडा प्लॉट येथील ललित कला भवन येथे गटस्तरीय भजन स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत प्रमोद…

Read More

नांदगाव पेठेत वारकरी बाल सुसंस्कार निवासी शिबीर:१८ मे पासून प्रारंभ, २८ मे रोजी समारोप

नांदगाव पेठ येथे श्री संत काशिनाथ बाबा संस्थानतर्फे ‘वारकरी आध्यात्मिक बाल सुसंस्कार निवासी शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. १८ मे रोजी सुरू होणारे हे शिबीर २८ मे पर्यंत चालेल. आजच्या युगात मुलांमध्ये संस्कारांची गरज लक्षात घेऊन हे शिबीर महत्त्वाचे मानले जात आहे. श्री संत काशिनाथ बाबा सभागृहात आयोजित या शिबिरात १२ ते १८ वयोगटातील मुले…

Read More