Headlines

अमरावती विभागाला सर्वाधिक 8, तर संभाजीनगरला 5.92 कोटींचा निधी:आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनाराज्य सरकारकडून 25 कोटींची मदत

नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा सततचा तगादा या दुष्टचक्रामुळे मृत्यूला कवटाळणाऱ्या राज्यातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतील शेतकरी कुटुंबांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. शेतकरी आत्महत्याप्रकरणी त्यांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत देण् . या निधी वाटपात शेतकरी आत्महत्येचे सर्वाधिक चटके सहन करणाऱ्या अमरावती विभागाला सर्वाधिक ८ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांनी…

Read More

महाजन यांनी लष्करी कारवाईची तुलना अब्दालीच्या आक्रमणाशी केली:1984 मधील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ हा काळा दिवस, मारले गेले ते शहीद- गिरीश महाजन

१९८४ मध्ये सु‌वर्णमंदिरात शीख अतिरेक्यांविरुद्ध केलेली लष्करी कारवाई ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ म्हणजे हा काळा दिवस असून या कारवाईत आपले बंधू-भगिनी शहीद झाले, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. तसेच सुवर्णमंदिरावर झालेल्या या लष्करी कारवाईची तुलना त्यांनी अफगाण आक्रमक अहमदशहा अब्दालीच्या आक्रमणाशी करुन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींवर त्यांनी टीका…

Read More

लातूरमधील काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग!:बैलाचा मृत्यू झाल्याने हतबल शेतकऱ्याने पत्नीलाच जुंपले नांगराला, VIDEO

एकीकडे शासन पातळीवर शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींच्या कर्जमाफीसह अनेक मोठ्या घोषणा केल्या जात असल्या, तरी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बळीराजाचे वास्तव अद्यापही भीषणच आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे शेतकरी कसा हतबल होतो, याचे मन हेलावणारे आणि तितकेच संतापजनक उदाहरण लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातून एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसात…

Read More

अब्दुल सत्तारांच्या मुलाचा जिल्हा बँकेसाठी अर्ज बाद!:यात काय राजकारण माहीत नाही, देवेंद्रजी योग्य न्याय करतील- सत्तार

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरीची तलवार म्यान करणाऱ्या शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना आता आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत त्यांचे सुपुत्र समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज अत्यंत क्षुल्लक कारणावरून अवैध ठरवण्यात आला आहे. या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत, यामागे नेमके कोणते राजकारण दडले आहे हे सांगणे कठीण…

Read More

'मुख्यमंत्र्यांना भेटायला मुलगा अन् पुतण्याला घेऊन गेले':लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल; नेमका रोख कोणावर? हाके काय म्हणाले?

ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांच्या एका व्हिडिओने खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हाके एका मोठ्या नेत्याविषयी बोलताना दिसून आले आहेत. तसेच हाके यांनी त्या नेत्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. हा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे….

Read More

गुटखा माफियांची गय केली जाणार नाही:संभाजीनगरमधील घटनेवर मंत्री नरहरी झिरवाळ संतप्त, महिला अधिकाऱ्याशी फोनवरून संवाद

छत्रपती संभाजीनगर येथे गुटखा माफियांविरोधात सुरू असलेल्या धडक कारवाईदरम्यान महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेनंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तातडीने दखल घेत संबंधित महिला अधिकाऱ्यांशी थेट फोनवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे…

Read More

पर्यावरणासाठी वृक्षलागवडीसह संवर्धन आवश्यक:डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे प्रतिपादन‎

हवामान बदलाच्या आव्हानात्मक कालखंडात, यंदाच्या उन्हाळ्यातील तापमानाच्या उच्चांकाने जनतेच्या मनात वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. येणाऱ्या पिढ्यांच्या सुरक्षित व उज्ज्वल भवितव्यासाठी पर्यावरण संवर्धन ही आजची प्राथमिक गरज बनली असून, केवळ वृक्ष . विद्यापीठाच्या कृषी पद्धती व पर्यावरण विभागाच्या वतीने त्यांच्या प्रक्षेत्रावर आयोजित वृक्षलागवड कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. विशेषतः गावपातळीवर घरोघरी फळझाडांची लागवड केल्यास…

Read More

Sanjay Raut Challenges Kirit Somaiya on 15.15 Lakh Crore Rajesh Exports Scam

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतून तब्बल पाच कोटी रुपये चोरीला गेल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत, देशातील महत्त्वाच्या संस्था . यावेळी राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कधीही विरोधी…

Read More

उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायकचा विकास:500 कोटींच्या निधीवर सदा सरवणकरांचे स्पष्टीकरण

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराचा उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सर्वांगीण विकास करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि आमदार सदा सरवणकर यांनी दिली. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भाविकांसाठी आधुनिक सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेकडून 500 कोटी रुपयांचा निधी आरक्षित करण्यात…

Read More

साखरपुड्याच्या आनंदावर काळाचा घाला!:अंमळनेरजवळ भीषण तिहेरी अपघात; गुजरातमधील एकाच कुटुंबातील 5 जणांसह 6 ठार

साखरपुड्याच्या आनंदासाठी घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबावर नियतीने काळाचा घाला घातला. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे महामार्गावर मंगरूळ गावाजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. कार, एसटी बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात गुजरातमधील व्यारा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून धरणगाव येथील…

Read More